Connect with us

गावागावातुन

पोंदेवाडी(ता.आंबेगाव)गावासाठी असणाऱ्या तलाठी कार्यालयात केलेला बदल रद्द करुन. खडकवाडी ऐवजी लाखणगाव येथेच तलाठी कार्यालय ठेवावे अशी सरपंच निलम वाळुंज व पोंदेवाडी ग्रामस्थांची मागणी

Published

on

Share

निरगुडसर( राजु देवडे)

पोंदेवाडी (ता. आंबेगाव)या गावाला नवीन नियमानुसार.महसूल विभागाने तलाठी कार्यालयाच्या ठिकाणात बदल केले असून.पोंदेवाडी गावाला पूर्वी असणारा लाखणगाव सजा तलाठी कार्यालय या ऐवजी खडकवाडी सजा तलाठी कार्यालय देण्यात आलेले आहे. परंतु दळणवळणाच्या दृष्टीने खडकवाडी गाव अडचणीचे ठरत असल्याने. महसूल विभागाने केलेला बदल रद्द करुन .जुन्याच पद्धतीने लाखनगाव सजा तलाठी कार्यालय ठेवावे अशी मागणी पोंदेवाडीच्या सरपंच निलम वाळुंज यांनी उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव यांच्याकडे केली आहे.

आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी या गावाचे तलाठी महसुली कार्यालय बदलण्यात आले असून पोंदेवाडी गावासाठी पुर्वी लाखनगाव येथे तलाठी कार्यालय होते व पारगाव या ठिकाणी मंडळ अधिकारी कार्यालय होते.परंतु नवीन बदलानुसार पोंदेवाडी गावाला खडकवाडी या ठिकाणी तलाठी सजा कार्यालय देण्यात आले असुन पारगाव मंडल कार्यालय ठेवण्यात आले आहे. परंतु खडकवाडी गाव हे पोंदेवाडी ग्रामस्थांच्या दृष्टीने दळणवळणाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच लाखनगाव तलाठी कार्यालय पोंदेवाडीसाठी असावे.अशी माघणी पोंदेवाडी ग्रामस्थांची आहे.

पुर्वी लाखनगाव व पोंदेवाडी एकच गाव होते नंतर ग्रामपंचायत वेगळी झाल्याने पोंदेवाडी स्वतंत्र झाले. परंतु पोंदेवाडेचा सबंध दळणवळण व सर्व गोष्टींनी लाखनगावशी आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या पोंदेवाडी व लाखनगाव अशा दोन्ही ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रशासनाने केलेला बदल रद्द करून पुर्वी प्रमाणेच पोंदेवाडी गावासाठी तलाठी महसुली कार्यालय लाखनगाव येथे ठेवावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. याबाबतचे निवेदन पोंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच निलम अनिल वाळुंज यांनी उपविभागीय अधिकारी आंबेगाव जुन्नर व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात चौथा बिबट्या जेरबंद

Published

on

Share

वळती प्रतिनिधी

नागापूर तालुका आंबेगाव गावातील पवार मळा परिसरात शुक्रवारी दिनांक २७ तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. महीना भरात हा चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे. नागपूर गावातील प्रसिद्ध देवस्थान थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेला पवार मळ्यात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते पैकी १३ फेब्रुवारीला मादी जेरबंद झाली. त्यानंतर २५ फेब्रुवारीला बछडा जेरबंद झाला. त्यानंतर पुन्हा २७ मध्यरात्रीच्या दरम्यान बिबट मादी जेरबंद झाली २ मार्चला पुन्हा नर जातीचा बछडा अंदाजे वय १५ पिंजऱ्यात जर बंद झाला नागापूर गावचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला ही माहिती दिली.


मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडल अधिकारी फुलमाळी वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी मादीला सुखरूपरीत्या ताब्यात घेऊन जुन्नर तालुक्यातील माणिकडोह निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. सलग तीन बिबटे जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे.

सलग चौथा बिबटे जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील काही दिवसांपासून जनावरांवर हल्ल्यांच्या घटना व बिबट्यांच्या हालचालीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाणे, लहान मुलांना घराबाहेर एकटे न सोडणे तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading

गावागावातुन

दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.

Published

on

Share

पारनेर दि.१० प्रतिनिधी

जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.

अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.

तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.

आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada