Connect with us

गावागावातुन

आंबेगाव शिरूर तालुक्यातील राहिलेले पाण्याचे प्रश्न पुर्णपणे सोडवले जातील. प्रत्येक गावात महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल -दिलीपराव वळसे पाटील.

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

मला येथील जनतेने 1990 साली वयाच्या 34 व्या वर्षी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली .त्यावेळी परिस्थिती अवघड होती. तालुक्यातील अनेक लोक तालुक्याबाहेर रोजगार मिळवण्यासाठी जात होते. आज परिस्थिती बदलली आहे शिरूर तालुक्याला सगळ्या नद्यांवरील धरणांचे पाणी येत आहे .शिरूर तालुका बागायती झाला त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका बागायती झाला आंबेगाव शिरूर तालुक्यात फेरफटका मारल्यानंतर येथे झालेली प्रगती लक्षात येते.येथे झालेला बदल दिसून येतो पाण्यामुळे आंबेगाव शिरूर तालुक्यात सुबत्ता आली तालुक्याचा चेहरामोहरा बदलला मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर सरकारी योजना मोठ्या प्रमाणावर आणल्या.असे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील म्हणाले.

मंचर तालुका आंबेगाव या ठिकाणी शिरूर आंबेगाव विधानसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी आयोजित केलेल्या सभेत वळसे पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील भाजपचे आंबेगाव शिरूर विधानसभेचे निरीक्षक अतुल ब्रह्मभट्ट ,पोपटराव गावडे,पुर्वाताई वळसे पाटील,देवेंद्र शहा,बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील,जयसिंग एरंडे उपस्थित होते.


निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षात आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील राहिलेले पाणी प्रश्न पूर्णपणे सोडवले जातील त्याचप्रमाणे प्रत्येक गावोगावी महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल.

डिंभे धरणाचे भूमिपूजन 1978 साली झाले परंतु 2000 सालापर्यंत पाणी मिळाले नव्हते. 90 साली आमदार झाल्यानंतर अधीकचा निधी आणून डिंभे धरणाचे काम पूर्ण केले. त्याचप्रमाणे कुकडी प्रकल्पा अंतर्गत 65 बंधारे आंबेगाव शिरूर जुन्नर तालुक्यात उभे केले. अजूनही सातगाव पठार, आदिवासी भाग व शिरूर तालुक्यातील बारा गावांमध्ये पाणी पोहचवायचे आहे.ही गावे बागायती करायची आहेत. कुकडीची तिसरी मान्यता झाली तेव्हा 65 बंधारे एकदाच भरायचे नियोजन होते.परंतु आपण या निर्णयात बदल केला आणि 65 बंधारे या प्रकल्पांतर्गत आणले.डिंभे धरणाला बोगदा पाडून धरणातील पाणी पलीकडच्या बाजूला न्यायचे होते असे झाले असते तर तीन महिन्यात धरण रिकामे झाले असते. आणि पुन्हा एकदा आंबेगाव शिरूर तालुका हा दुष्काळी झाला असता. माळीनची दुर्घटना झाली त्यानंतर नवीन गाव वसवले तेथील लोकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आसाणे या ठिकाणी तलाव बांधुन त्यांना पाणी उपलब्ध करून दिले.थिटेवाडी बंदरातील गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. कळमोडी चे काम लवकर पूर्णत्वास येईल आणि त्या माध्यमातून शिरूर खेड आंबेगाव तालुक्यातील अनेक गावे बागायती होतील मोठ्या प्रमाणावर इमारती आपण तालुक्यात बांधल्या.आपला भीमाशंकर कारखाना उत्तम सुरू आहे .शेजारील कारखाना बंद पडला पण त्यावर कोणी बोलत नाही आपण 3200 रुपये बाजार भाव दिला.आपण अनेक सरकारी शाळा वसतिगृह इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केला त्याचप्रमाणे खाजगी शिक्षण संस्था सुरू केल्या त्यातून आपण शिक्षणाचे काम करत आहोत इंजिनिअरिंग महाविद्याल सुरु केले.
आरोग्य सेवेसाठी पहिले तीस बेडचे मंचर या ठिकाणी हॉस्पिटल सुरु केली त्यानंतर 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय केले त्यासाठी देवेंद्र शहा अध्यक्ष असलेल्या पांजरपोळ ट्रस्टची जागा त्यांनी सरकारला दिली. तांबडेमळा या ठिकाणी 100 बेडच्या नवीन हॉस्पिटलचे काम सुरू आहे .त्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा आपण देत आहोत .
भीमाशंकर तिर्थक्षेत्रासाठी 148 कोटीचा आराखडा मंजूर आहे. परंतु तेथे वनविभाग व इतर कायदे अडचणीमुळे थोडी अडचण आहे .पण यावरही मार्ग काढून हा विकासाचा आराखडा पुर्ण करु.अनेक देवस्थानांना आपण चांगल्या प्रकारे निधी दिला आहे. मंचर येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधली घोडेगाव तहसील कार्यालय इमारत बांधली ,कोर्टाची इमारत बांधली. पंचायत समिती कार्यालयाची इमारत बांधली. मंचर व घोडेगाव या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या इमारती व पोलीस वसाहत बांधली .भोरवाडी या ठिकाणी एसटी डेपो सुरू केला नवीन बस स्थानक मंचर या ठिकाणी आपल्याला करावयाचे आहे. मंचर ग्रामपंचायत ची नगरपंचायत केली.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून निधी आणला मी अजित दादा पवार यांच्याकडून निधी आणला व मंचरचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले. तालुक्यात अष्टविनायक महामार्ग व बेल्हा जेजुरी महामार्ग उभे केले. तसेच नवीन अवसरी फाटा पारगाव ,टाकळी हाजी ,मलठण गणेगाव खालसा, शिक्रापूर असा नवीन रस्ता मंजूर आहे त्यासाठी 416 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
विजेच्या बाबतीत अनेक कामे केली पाण्यासाठी आपण 135 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सध्या सुरू आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात 63069 महिलांना व शिरूर तालुक्यातील 37390 महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय. बळीराजा योजनेतून 7.5 एचपी पर्यंत मोफत वीज देण्याचे काम आपण केल.असे वळसे पाटील म्हणाले यावेळी मोठ्या प्रमाणाव कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश स्वामी थोरात यांनी केले, सूत्रसंचालन निलेश पडवळ तर आभार अंकीत जाधव यांनी मानले

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सलग चौथा बिबट्या जेरबंद

Published

on

Share

वळती प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात वनविभागाने मोठी कारवाई करत महिनाभरात सलग चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पवार मळा परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील प्रसिद्ध थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेकडील पवार मळा परिसरात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एक मादी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एक बछडा पिंजऱ्यात अडकला. पुढे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री आणखी एक मादी जेरबंद झाली. तर २ मार्च रोजी अंदाजे १५ महिन्यांचा नर बछडा देखील पिंजऱ्यात सापडला. या सर्व घटनांची माहिती नागापूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला दिली होती.


मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी फुलमाळी व वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी संबंधित बिबट्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून नागापूर परिसरात जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सलग चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading

गावागावातुन

दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.

Published

on

Share

पारनेर दि.१० प्रतिनिधी

जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.

अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.

तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.

आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada