Connect with us

गावागावातुन

राजकीय नेत्यांनी कंत्राटदारांच्या हिताचे प्रकल्प शेतकऱ्यांवर लादू नये अन्यथा महामार्ग संघर्ष समिती काढणार मोर्चा

Published

on

Share

निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे

राज्य सरकारने कोणाचीही मागणी नसताना पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग बनविण्याचा घाट घातला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा पर्यायी रस्ता असून नव्याने औद्योगिक महामार्ग अनावश्यक असून त्यात पिकाऊ, बागायत क्षेत्रातून जात असून या महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध असून शासनाने महामार्गाला तात्पुरती स्थगिती दिलेले आहे परंतु येत्या आठ दिवसात महामार्ग कायमस्वरूपी रद्द केल्याचे शासनाने परिपत्रक काढावे. अन्यथा बाधित शेतकऱ्यांच्या वतीने मंत्रालयावरती प्रचंड मोर्चा तसेच सर्व संबंधित मंत्री व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन केले जाईल. असा इशारा महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांनी व्यक्त केले
काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) या ठिकाणी पुणे- नाशिक महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांचा विरोध हा शासन दरबारा पर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त काठापूर बुद्रुक या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला औद्योगिक महामार्गात जमिन जाणारे बाधित शेतकरी उपस्थित होते.यावेळी माझी उपसरपंच विशाल करंडे,कान्हु करंडे, संतोष करंडे, नवनाथ करंडे, पंढरीनाथ करंडे,धनंजय करंडे,फकीर करंडे,शिवाजी करंडे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.काठापूर बुद्रुक हे गाव पूर्णपणे 100% बागायती आहे. परंतु या गावच्या सातबारा उतारा वर हंगामी बागायती चा शेर आहे. त्याचप्रमाणे शासनाचा रेडी रेकनरचा दर हा अत्यल्प आहे. आणि त्यामुळेच कुठल्याही परिस्थितीत बागायती जमीन ही महामार्गासाठी जाऊ देणार नाही. असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.2013 च्या कायद्यानुसार बागायती जमीन कोणत्याही महामार्गासाठी घेऊ नये.अशा सूचना असतानाही शासनाने चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून काठापूर बुद्रुक गावातील क्षेत्र या महामार्गासाठी घेतले आहे. त्यामुळे या रस्त्याला काठापूर बुद्रुक मधील बाधीत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. हा मार्ग गावातुन नेऊ देणार नाही.शासनाने हा महामार्ग अधिसूचना काढून रद्द करावा. अन्यथा येणाऱ्या कालखंडामध्ये सर्वच लोकप्रतिनिधींच्या घरासमोर हट्टाग्र आंदोलन करण्यात येणार आहे.
राजकीय नेत्यांनी कंत्राटदारांच्या हिताचे प्रकल्प जनतेवर लादू नयेत.लोकांना विश्वासात न घेता प्रकल्प पुढे रेटु नये. लोकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन सदर प्रस्तावित महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी 21 सप्टेंबर पासून काठापूर येथील बाधित शेतकऱ्यांकडुन उपोषण करण्यात येणार आहे.
शिवाजी करंडे,हेमंत करंडे
(बाधित शेतकरी)

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

व्हर्लपूल ऑफ इंडिया लि च्या वरिष्ठ व्यस्थापक यांची केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई येथील जल संसाधन विकास उपक्रमांना सदिच्छा भेट

Published

on

Share

शिरूर / आंबेगाव: उपजीविका विकासासाठी जल संसाधन विकास ह्या प्रकल्पा अंतर्गत शिरूर तालुक्यात लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन व व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 07 गावा मध्ये तसेच इलीका पी बी व्हर्लपूल आप्लायन्सेस प्रा. लि अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील 06 गावा मध्ये सिमेंट नाला बंधारा, माती बंधारा दुरुस्ती व गाळ काढणे, सूक्ष्म व तुषार सिंचन व रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवणे असे उपक्रम राबविले जात आहेत

व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापक सुश्री श्वेता श्रीवास्तव व लुपीन फाउंडेशन चे वर्क साईड हेड श्री वेंकटेश सर यांनी शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील जल संसाधन विकास प्रकल्पातील केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई या गावातील विविध उपक्रमांना भेट दिली. गावातील शेतकरी व ग्राम पंचायत सदस्य यांच्याशी संवाद साधून उपक्रमांच्या माध्यमातून होणाऱ्या व झालेल्या परिणामांना समजावून घेण्यात आले तसेच त्यांनी मार्गदर्शन केले.

सुश्री श्वेता यांनी समुदायाच्या मजबूत सहभागाबद्दल आणि लाभार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात लुपिन फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

सदर भेटी दरम्यान केंदूर च्या विद्यमान सरपंच सौ. मंगलताई पऱ्हाड, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, माजी सरपंच सूर्यकांत थिटे, भाऊसाहेब थिटे, लोणीचे माजी सरपंच उद्धव लंके, अशोक आदक, बाळशीराम वाळुंज तसेच शेतकरी उपस्थित होते.

सदर प्रकल्प भेटीचे नियोजन लुपिन फाउंडेशन चे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनात शिरूर,आंबेगाव व जुन्नर चे तालुका व्यवस्थापक प्रताप मोटे व बाळासाहेब बोराडे यांनी केले.

Continue Reading

गावागावातुन

भीमाशंकरचा एफ.आर.पी.नुसार रु. ३,२७३/- प्रती मे.टन दर

Published

on

Share

दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. रक्कम रु. ३२७२.१४ येत असून त्यानुसार रु. ३२७३/- प्रती मे.टन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन पंधरवड्याकरीता अदा केलेला प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे.टन वजा जाता उर्वरित रु. १७३/- प्रती मे.टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार शेतक-यांच्या बँक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, मा. उच्च न्यायालय व शासनाचे निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे. त्यानुसार गाळप हंगाम २०२५-२६ करीता देय एफ.आर.पी. रु.३२७२.१४ प्रती मे.टन येत आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसास प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे. टनाप्रमाणे अदा केलेला आहे. प्रथम हप्ता अदा करतेवेळी रक्कम उपलब्धतेनुसार एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार इथेनॉल विक्री, इथेनॉल व्याज परतावा व आयकर परताव्याची रक्कम जमा झाल्याने एफ.आर.पी.चे उर्वरित पेमेंटसाठी रक्कम उपलब्ध झाली आहे.


गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर २ लाख १२ हजार ५८६ मे.टन ऊस गाळप झाले असून रु. १७३/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बॅंक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असून यापुढे होणारे पंधरवडा ऊस पेमेंट रु. ३२७३/- प्रती मे.टन प्रमाणे वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे. तरी उस उत्पादक शेतक-यांनी आपला उत्पादित केलेला ऊस भीमाशंकर कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada