Connect with us

गावागावातुन

काठापुर बुद्रुक मधे माघील पाच दिवसात उस जळण्याच्या तिन घटना घडल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

Published

on

Share

लोणी धामणी प्रतिनिधी-राजु देवडे

काठापुर बुद्रुक मधे माघील पाच दिवसात उस जळण्याच्या तिन घटना घडल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

काठापूर बुद्रुक या ठिकाणी विजेच्या तारांमध्ये झखलेल्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत पांडुरंग सिताराम करंडे यांचा सव्वा एकर ऊस जळाला असून ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मागील पाच दिवसात तिसरी तर महिनाभरातील ही चौथी घटना आहे.

काठापूर बुद्रुक मध्ये विजेच्या तारांमुळे उस जळण्याचे वाढलेले प्रमाणाने येथील ऊस उत्पादक शेतकरी धास्तावला असून वीज वितरण कंपनीने पुढील दोन ते तीन दिवसात गावातील सर्वच विज वाहक तारा आणि खांबळे यांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी. अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

काठापूर बुद्रुक गावातील गट नंबर 89 मध्ये 50 गुंठे क्षेत्रावर पांडुरंग सिताराम करंडे यांनी ऊस पिकाची लागवड केली होती. या उसाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे उस जळून गेला आहे.त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अजून एक महिनाभर कारखाने सुरू होणार नाही त्यामुळे हा ऊस तोडून ही जाणार नाही .परिणामी एक महिन्यात ऊस वाळून जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होनार आहे एकंदरीत काठापुर बुद्रुक गावातील असणारे खांबा व त्यामधील जास्त अंतर त्यामुळे पडलेले झोळ. तसेच मोठ्या संख्येने असनारे विजेचे खांब व विजेच्या तारांची मोठ्या प्रमाणावर असलेले संख्या यामुळे अपघात होत असतात. परंतु मागील पाच दिवसात तिसरी घटना झाल्याने नक्की वीज पुरवठा होत असताना तांत्रिक बिघाड तर होत नाही ना. अशी शंका नागरिकांना येत आहे. कारण लाईट जाण्याचे प्रमाणही वाढले आहे .

सध्यातरी ऊस जळण्याचे प्रमाण वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.काठापुर बुद्रुक बारमाही बागायती गाव असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उसाची शेती केली जाते.आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होतो. परंतु मागील पाच दिवसात तिसरी तर महिन्यातील चौथी घटना असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.वीज वितरण कंपनीने पुढील दोन ते तीन दिवसात काठापुर गावात सर्वेक्षण करून विजेच्या तारांची उंची वाढवावी ज्या ठिकाणी खांबळयातिल अंतर जास्त आहे तेथे नवीन खांब बसवावे जर वीज वितरण कंपनीने यावर तोडगा काढला नाही.तर काठापूर बुद्रुक ग्रामस्थ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने वीज कंपनीवर मोर्चा नेण्यात येईल.असे शेतकऱ्यांनी सांगितले.
सदर ठिकाणी सरपंच अशोक करंडे, माझी उपसरपंच विशाल करंडे, पोलीस पाटील अमोल करंडे,यांनी भेट दिली.उस उत्पादक शेतकरी पांडुरंग करंडे व नवनाथ करंडे यांनी संबंधित विभागाने पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

व्हर्लपूल ऑफ इंडिया लि च्या वरिष्ठ व्यस्थापक यांची केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई येथील जल संसाधन विकास उपक्रमांना सदिच्छा भेट

Published

on

Share

शिरूर / आंबेगाव: उपजीविका विकासासाठी जल संसाधन विकास ह्या प्रकल्पा अंतर्गत शिरूर तालुक्यात लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन व व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 07 गावा मध्ये तसेच इलीका पी बी व्हर्लपूल आप्लायन्सेस प्रा. लि अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील 06 गावा मध्ये सिमेंट नाला बंधारा, माती बंधारा दुरुस्ती व गाळ काढणे, सूक्ष्म व तुषार सिंचन व रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवणे असे उपक्रम राबविले जात आहेत

व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापक सुश्री श्वेता श्रीवास्तव व लुपीन फाउंडेशन चे वर्क साईड हेड श्री वेंकटेश सर यांनी शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील जल संसाधन विकास प्रकल्पातील केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई या गावातील विविध उपक्रमांना भेट दिली. गावातील शेतकरी व ग्राम पंचायत सदस्य यांच्याशी संवाद साधून उपक्रमांच्या माध्यमातून होणाऱ्या व झालेल्या परिणामांना समजावून घेण्यात आले तसेच त्यांनी मार्गदर्शन केले.

सुश्री श्वेता यांनी समुदायाच्या मजबूत सहभागाबद्दल आणि लाभार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात लुपिन फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

सदर भेटी दरम्यान केंदूर च्या विद्यमान सरपंच सौ. मंगलताई पऱ्हाड, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, माजी सरपंच सूर्यकांत थिटे, भाऊसाहेब थिटे, लोणीचे माजी सरपंच उद्धव लंके, अशोक आदक, बाळशीराम वाळुंज तसेच शेतकरी उपस्थित होते.

सदर प्रकल्प भेटीचे नियोजन लुपिन फाउंडेशन चे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनात शिरूर,आंबेगाव व जुन्नर चे तालुका व्यवस्थापक प्रताप मोटे व बाळासाहेब बोराडे यांनी केले.

Continue Reading

गावागावातुन

भीमाशंकरचा एफ.आर.पी.नुसार रु. ३,२७३/- प्रती मे.टन दर

Published

on

Share

दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. रक्कम रु. ३२७२.१४ येत असून त्यानुसार रु. ३२७३/- प्रती मे.टन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन पंधरवड्याकरीता अदा केलेला प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे.टन वजा जाता उर्वरित रु. १७३/- प्रती मे.टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार शेतक-यांच्या बँक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, मा. उच्च न्यायालय व शासनाचे निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे. त्यानुसार गाळप हंगाम २०२५-२६ करीता देय एफ.आर.पी. रु.३२७२.१४ प्रती मे.टन येत आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसास प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे. टनाप्रमाणे अदा केलेला आहे. प्रथम हप्ता अदा करतेवेळी रक्कम उपलब्धतेनुसार एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार इथेनॉल विक्री, इथेनॉल व्याज परतावा व आयकर परताव्याची रक्कम जमा झाल्याने एफ.आर.पी.चे उर्वरित पेमेंटसाठी रक्कम उपलब्ध झाली आहे.


गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर २ लाख १२ हजार ५८६ मे.टन ऊस गाळप झाले असून रु. १७३/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बॅंक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असून यापुढे होणारे पंधरवडा ऊस पेमेंट रु. ३२७३/- प्रती मे.टन प्रमाणे वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे. तरी उस उत्पादक शेतक-यांनी आपला उत्पादित केलेला ऊस भीमाशंकर कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada