राजकीय
देवदत्त निकम यांच्या पराभवांने आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हळहळला, अनेकांना अश्रु अनावर..
मंचर-निलीमा खळे
आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल घोषित झाला आणि अवघ्या १५६६ मतांनी देवदत्त निकम हे पराभूत झाले. सात टर्म चढत्या मताधिक्याने विजयी होणारे महायुतीचे उमेदवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय झाला. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विजयापेक्षा देवदत्त शिवाजीराव निकम यांच्या ट्रंपेट ने घेतलेल्या मतांमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त जयवंतराव निकम यांचा१५६६ मतांनी पराभव झाला या पराभवाची खंत व्यक्त करत संपूर्ण मतदारसंघील महीला, शेतकरी,मतदार हळहळले..
गेली सात टर्म आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीत 1990 साली पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या मताधिक्यामध्ये भर टाकत विजय संपन्न केला आहे. राजकारणात दिग्गज नेते माजी खासदार किसनराव बाणखेले, अविनाश रहाणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, राजाराम बाणखेले यांचा पराभव केला आहे.
दिलीप वळसे पाटील नेहमी विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे गेले. त्यांनी आपल्या विरोधकांना नेहमीच धोबीपछाड देत आंबेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. त्यांचे एकेकाळाचे सहकारी असणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या विरोधात जाऊन शिवसेना पक्षाकडून खासदार म्हणून आपला नावलौकिक केला होता. शिवाजी आढळराव पाटील यांनी अनेक राजकीय डाव टाकले तरीही त्यांना दिलीप वळसे पाटील यांना आव्हान देणे शक्य झाले नव्हते.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कडून देवदत्त निकम यांनी महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना कडवे आव्हान दिले. थोडक्या मतांनी देवदत्त निकम यांचा पराभव झाला.
हा पराभव होण्यास मुख्य कारण ठरले ते वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांच्या विरोधात टाकलेला राजकीय डाव ..? या निवडणुकीत देवदत्त जयवंतराव निकम हे महाविकास आघाडीचे उमेदवार तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उमेदवार होते तर त्यांच्याच नावात साधर्म्य असणारे दुसरे उमेदवार होते. देवदत्त शिवाजीराव निकम आणि त्यांचे चिन्ह होते ट्रंपेट.. या दोन नावांमध्ये आणि चिन्हांमध्ये काही अंशी साधर्म्य असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांना पडणारी मते देवदत्त शिवाजीराव निकम यांच्या ट्रंपेट चिन्हाला पडली. ट्रंपेट चिन्हाला २९६५ मते मिळाली आणि देवदत्त जयवंतराव निकम यांचा १५६६ मतांनी पराभव झाला.
हा पराभव ट्रंपेटला पडलेल्या मतांमुळे झाल्याची चर्चा आंबेगाव तालुक्यात आहे. देवदत्त निकम यांनी महायुतीचे बलाढ्य नेते दिलीपराव वळसे पाटील यांचा पराभव केलाच होता.. मात्र ट्रंपेट यांनी मते घेतल्याने तो शक्य झाला नाही. हे शल्य आंबेगाव तालुक्यातील अनेक मतदारांमध्ये असल्याचे दिसून आले. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देवदत्त निकम यांच्या नागापुर येथील निवासस्थानी लोकांनी भेटी देऊन अक्षरशा डोळ्यांमध्ये पाणी आणून हळहळ व्यक्त केली. गावागावातील चौकांमध्ये शेतामध्ये देवदत्त निकम यांचा पराभव ट्रंपेट मुळेच झाला. अशी खंत व्यक्त करून लोक हळहळ व्यक्त करत आहेत .खरंच देवदत्त निकम यांना आपण थोडी साथ दिली असती किंवा त्यांच्यासाठी थोडे काम केले असते तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आंबेगाव विधानसभेचा आमदार झाला असता अशी सर्वत्र चर्चा असल्याची दिसून आली.
देवदत्त निकम खंबीर
संपुर्ण तालुका हळहळ करत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम हे खंबीर असल्याचे दिसले. या निवडणुकीत आंबेगाव विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मलाच निवडुण दिले आहे. विरोधकांनी माझा हा विजय कटकारस्थान करुन हिरावुन घेतला आहे. त्याचा वचपा आगामी काळात मतदार घेतील.
मी सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी होण्यास सुरुवात केली आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सरकार विरोधात ठाम भूमिका घेणार असल्याचे वास्तव मराठीशी बोलताना त्यांनी व्यक्त केली आहे.
गावागावातुन
फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर दि.१४ प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.
निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
गावागावातुन
दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.
पारनेर दि.१० प्रतिनिधी
जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.
अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.
तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.
आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
गावागावातुन
डॉ. विद्या कावरे पारनेरच्या नगराध्यक्ष, महाविकास आघाडीची बाजी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
महायुतीचा घोडेबाजार फसला
पारनेर : प्रतिनिधी
पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवला आहे. आघाडीच्या डॉ. विद्या बाळासाहेब कावरे यांनी ११ विरुद्ध ६ मतांनी विजय संपादन करत नगराध्यक्षपद पटकावले. त्यांच्या विजयाने महायुतीच्या राजकीय घोडेबाजाराला चपराक बसली असून, खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशीया यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. १० नोव्हेंबर) विशेष सभा घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. हात वर करून मतदान पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत डॉ. कावरे यांनी सहज विजय मिळवला.
महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकदिलाने मतदान करून पक्षनिष्ठा अबाधित ठेवली. नितीन अडसूळ, जायदा शेख, सुरेखा भालेकर, योगेश मते, भूषण शेलार, प्रियंका औटी, निता औटी, सुप्रिया शिंदे, हिमानी नगरे, विद्या गंधाडे आणि स्वतः डॉ. कावरे यांनी मतदान करून डॉ. कावरे यांचा विजय निश्चित केला.
विरोधी उमेदवार अशोक चेडे यांना विजय सदाशीव औटी, युवराज पठारे, निता ठुबे, नवनाथ सोबले आणि कांताबाई ठाणगे या नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला.
महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना ‘गळाला लावण्यासाठी’ मोठे आर्थिक आमिष दाखवण्यात आले. लाखो रुपयांच्या ऑफर्स देत मतदानावर परिणाम करण्याचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते. तरीसुद्धा आघाडीचे नगरसेवक ठाम राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते योगेश मते यांनी शनिवारी ९ नगरसेवकांना व्हिप बजावत “डॉ. विद्या कावरे यांनाच मतदान करावे” असे निर्देश दिले होते. या व्हिपचे काटेकोर पालन करत आघाडीने एकजुटीचा नमुना दाखवला.
नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डॉ. विद्या कावरे यांचा नगरपंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. समर्थकांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. महाविकास आघाडीच्या या विजयाने पारनेरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन1 year agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन1 year agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक10 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
