महाराष्ट्र
मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता कट..? विनोद तावडे, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा
मुंबई (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली आहे.मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे नेते tविनोद तावडे यांची बंद दाराआडा चर्चा झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ होणार असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता कट होऊन भाजपा मधील मराठा नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे.मराठा चेहरा मुख्यमंत्री करायचे ठरल्यास विनोद तावडे किंवा राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार होऊ शकतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री..
कमी संख्याबळ असताना भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदी संधी देत भाजप दोन पावलं मागे आले होते. त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाली होती .यावेळी मात्र भाजप राज्यातला पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे . म्हणूनच भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा आहे . मुख्यमंत्रीपदी भाजपचा नेता असावा .
सुधीर मुनगंटीवार यांनीही काल अमित शहा यांची भेट घेऊन मुंबईत परतल्यानंतर मोठे वक्तव्य केले होते. वरिष्ठ ठरवतील तो आमचा मुख्यमंत्री असेल असं म्हणत त्यांनी एक प्रकारे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यास विरोध असल्याचे जाहीर केले होते.त्यानंतर अमित शहा व विनोद तावडे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राला देण्यावरुन खलबतं झाल्याची सुत्रांची माहीती आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला आणि विशेषता भाजपला मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा मोठा फटका बसला होता . मनोज जंरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत थेट भाजप विरोधात भूमिका घेतली होती. या विधानसभेला मनोज जंरांगे पाटील निवडणुकीत उमेदवार उतरवतील अशी चर्चा होती. मनोज जंरांगे पाटलांनी ऐनवेळी माघार घेतल्याने मराठा समाजामध्ये मत भिन्नता दिसून आली. आणि त्याचा फायदा महायुतीला मिळाला असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीत पुढे आला आहे .त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा आहे . देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अशी शक्यता असताना विनोद तावडे आणि अमित शहा यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदासोबत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे .दिल्लीमध्ये अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यामध्ये मराठा मुख्यमंत्री केल्यास काय होईल..? त्याचे काय परिणाम होतील का? या बाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे . महाराष्ट्रात सरकार स्थापण्यापूर्वी अमित शहा व विनोद तावडे यांच्यामध्ये जी बैठक झाली. जवळपास 40 मिनिटे बैठक चालली 40 मिनिटांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात मराठा समाजाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री पदावर संधी दिली नाही.तर भाजपला पुढच्या राजकारणात काही फटका बसेल का..? यावर अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे .बिगर मराठा मुख्यमंत्री केला तर मराठा समाजाची मते भाजपापासुन दुरावली जातील का..? याबाबत भाजपमध्ये सध्या चर्चा सुरू आहे.

मराठा मुख्यमंत्री करायचा ठरला तर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाईल. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी विनोद तावडे किंवा राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यावर सोपवली जाऊ शकते .. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे . असे असले तरी अजुन अनेक राजकीय घडामोडी घडणार असल्याची शक्यता आहे.
गावागावातुन
आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सलग चौथा बिबट्या जेरबंद
वळती प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात वनविभागाने मोठी कारवाई करत महिनाभरात सलग चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पवार मळा परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील प्रसिद्ध थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेकडील पवार मळा परिसरात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एक मादी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एक बछडा पिंजऱ्यात अडकला. पुढे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री आणखी एक मादी जेरबंद झाली. तर २ मार्च रोजी अंदाजे १५ महिन्यांचा नर बछडा देखील पिंजऱ्यात सापडला. या सर्व घटनांची माहिती नागापूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला दिली होती.
मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी फुलमाळी व वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी संबंधित बिबट्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून नागापूर परिसरात जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सलग चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
गावागावातुन
फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर दि.१४ प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.
निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
गावागावातुन
दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.
पारनेर दि.१० प्रतिनिधी
जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.
अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.
तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.
आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक12 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
