Connect with us

गावागावातुन

बापांसाठी लेकी.. राजकीय मैदानात , आ.दिलीप वळसे पाटील ,देवदत्त निकम यांच्या मुलींच्या पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल…

Published

on

Share

मंचर (प्रतिनिधी)

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातुन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांचा पराभव केला.थोड्या मंतांनी देवदत्त निकम यांचा झालेला पराभव आणि ट्रम्पेट चिन्हावर लढलेल्या देवदत्त निकम यांना पडलेल्या मतांमुळे सोशल मिडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली असताना

आता विजयी उमेदवार आ.दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पुर्वा वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्या कन्या निलीमा निकम यांच्या पोस्ट ही सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत.

महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या नागापूर गावामध्ये त्यांनी आभार मेळावा घेतला. या मेळाव्यात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केल्याची चर्चा झाली. त्याला उत्तर म्हणून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी भावनिक पोस्ट लिहीत देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांना उत्तर दिले. त्यानंतर देवदत्त निकम यांच्या कन्या नीलिमा देवदत्त निकम यांनी पूर्वा वळसे पाटील यांच्या पोस्टला उत्तर दिले असून या दोन्ही पोस्ट सोशल मीडियामध्ये कार्यकर्ते शेअर करत आहेत.

पुर्वा दिलीपराव वळसे पाटील यांची पोस्ट

राज्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनात त्यांनी आजवर विरोधकांबद्दल कधीही वाईट शब्द काढला नाही, राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली परंतु त्यांच्याबद्दल देखील कोणीही कधी वाईट बोलले नाही.

आपल्या सर्वांना माहीतच आहे की, काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक दुर्दैवी अपघात झाला. एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर ते या दुखापतीतून जिद्दीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही संपूर्ण कुटुंब या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्यावर झालेल्या मोठ्या शस्त्रक्रियेमुळे त्यांची प्रकृती थोडीशी खालावलेली असते. थोड्याच दिवसात ते या संकटावर सुद्धा मात करून नक्कीच पूर्वीसारखे व्हावेत अशी आम्ही रोज परमेश्वराकडे प्रार्थना करतो.

परंतु काही दिवसांपूर्वी विरोधकांच्या आभार मेळाव्यात त्यांच्या प्रकृती बद्दल बोलताना “लवकरच विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागेल” असे अभद्र वक्तव्य केले गेले..

हे ऐकल्यानंतर काय बोलावे मला सुचत नाही. काही दिवसांपूर्वी वळसे पाटील साहेबांचा फोटो ज्यांनी आपल्या घरातील देव्हाऱ्यात लावला होता तेच आज साहेबांच्या अंताची प्रार्थना करीत आहेत? तुम्ही नक्की निवडणुका लढा, जिंका, त्यात हरकत असण्याचे काही कारण नाही परंतु या सर्व गोष्टी करत असताना उन्माद किती असावा? सत्ता मिळवण्याच्या नादात आपण किती खालच्या पातळीला जात आहोत?

शत्रुत्व करण्याच्या नादात आपण कोणतीच मर्यादा ठेवली नाही का? सुसंस्कृतपणाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या तालुक्यातील राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय का ? तालुक्यात पस्तीस वर्षे जनतेची अविरत सेवा केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल असे बोलताना आपली जीभ जराही कचरली नाही का? ज्या आदरणीय साहेबांनी आम्हाला कुटुंब म्हणून नेहमी कमी वेळ दिला परंतु या तालुक्यातील जनतेसाठी ते अहोरात्र उपलब्ध राहिले त्यांच्या मरणाची वाट पाहेपर्यंत काही लोकांची या तालुक्यात मजल गेली आहे का? आणि त्याच जोरावर काही लोक आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत का ? भविष्यात यांच्यासारख्याच लोकांना आपला सुसंस्कृत तालुका आपले प्रतिनिधी म्हणून स्वीकारणार आहे का? ज्यांनी तुम्हाला मोठे केले घडवले त्यांच्याबद्दल तुमच्या मनात असे विचार आहेत का?

कृतघ्नपनाचा कळस गाठलेल्या या लोकांसाठी राजकारण आणि निवडणुका हेच सर्वस्व आहे का? एखाद्या आजारी व्यक्तीची तुम्ही मरणाची कामना करणार का? माणूस आणि माणुसकीला काहीच किंमत उरली नाही का? अशा असंख्य प्रश्नांचे काहूर माझ्या मनात दाटून आले आहे. असे काही ऐकून त्यावर उत्तर देण्यापेक्षा मला नकोच ते राजकारण असे वाटू लागले आहे.

  • पूर्वा दिलीप वळसे पाटील.

पुर्वा वळसे पाटील यांना उत्तर दिलेली निलीमा देवदत्त निकम यांची पोस्ट

देवदत्त निकम यांच्या लेकीचे प्रत्युत्तर..!👇🏻

अहो मोठ्ठ्या ताई…!

आज तुम्हाला बाप आठवलाच आहे म्हणून…

📌तुम्ही पोसलेल्या गावगुंडांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभेत शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या माझ्या बापाला ढकललं तेव्हा तुम्ही स्वतः कौतुकाने त्याची व्हिडिओ काढत होतात आणि DJ वर ठेका धरला होता.

तिथं नाही का हो तुम्हाला बाप आठवला ❓

📌शेतकरी संघटनेचा गावगाड्यातला एक साधा कार्यकर्ता पिंपळगावचा प्रभाकर बांगर, तुमच्याच इशाऱ्यावरून तुम्ही पोसलेल्या गावगुंडांनी प्रभाकर बांगर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रक्तबंबाळ होईपर्यंत त्यांना मारलं…
तो कार्यकर्ता प्रभाकर बांगरही कुणाचा तरी बाप होता…

तिथं नाही का हो तुम्हाला बाप आठवला

📌ऑगस्ट महिन्यात आदिवासी लेकरांच्या दुधात अळ्या सापडल्या. आदिवासीं मुलांच्या जेवणात आळ्या निघाल्या त्याच्यावर कारवाई करायची सोडून तुम्ही आवाज उठवणाऱ्यांवरच गुन्हे दाखल केले. आपल्या मुलांना अळ्यांचे दूध प्यावे लागते, जेवण जेवावे लागते हे बघून त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या बापाची काय ओ हालत झाली असेल.

तिथं नाही का तुम्हाला बाप आठवला…

📌५ मे २०२४ रोजी तुम्ही देवदत्त निकम यांना (माझ्या वडिलांना) एका खोट्या आरोपात अडकवण्यासाठी तुमचे वडील प्रयत्नांची पराकाष्टा करत होते, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते. मंचर पोलीस स्टेशन येथे मोर्चा काढून माझ्या वडिलांच्या नावाने नको नको ते फ्लेक्स फडकावले. तिथं माझा बाप एकटा तुमच्या कटकारस्थानाविरोधात लढत होता.

तेव्हा नाही का हो तुम्हाला बाप आठवला…

📌घरातील देव्हाऱ्यात जो फोटो माझ्या वडिलांनी वळसे पाटील साहेब यांचा 25 वर्ष लावला होता तो फोटो ज्या दिवशी तूम्ही सर्वांनी माझ्या वडिलांना जेल मध्ये घालण्यासाठी जे प्रयत्न केले ते पाहून आमच्या घरच्या सगळ्या लोकांच्या विचाराने तो फोटो आम्ही उतरवला
माझ्या वडिलांना जेल मध्ये घालण्याचे जे प्रयत्न तूम्ही सगळे करत होतात ते पाहून मला काय वाटल असेल याचा विचार तूम्ही कधी केलाय का? आणि चुकून त्या दिवशी तूम्ही त्या डावात यशस्वी झाल्या असत्या तर, आमच्या कुटुंबाचं काय झाल असत, एक मुलगी म्हणून मला जे दुःख झालं असत त्याचा विचार केलाय का तूम्ही कधी?
तिथं नाही का हो तुम्हाला बाप आठवला.❗*

📌उगाच राईचा पर्वत करू नका, आज पर्यंत माझ्या वडिलांनी एकदाही श्री.वळसे पाटील साहेब, स्वतः तुमच्यावर आणि सौ.किरणताईंवर कोणतीच व्यक्तिगत टीका केली नाही हे सारा आंबेगाव शिरूर जाणतो.तुम्ही मात्र माझ्या बापाच्या बदनामीसाठी किती खालच्या थराला गेला होतात, आठवा !

तुमच्या वडिलांना (वळसे पाटलांना) हृदयविकाराचा धक्का आला भीमाशंकर कारखान्याच्या गेस्ट हाऊसला, तुमच्या आधी तिथं माझा बाप देवदत्त निकम हजर होता. ॲम्बुलन्सपासून हॉस्पिटलपर्यंत सगळं नियोजन एकटा करत होता. तुम्ही तिथं किती तासानंतर अवतरल्या ते आठवा..!

तुम्ही आभार सभेतील माझ्या वडिलांचं भाषण स्वतः ऐकल असत तर तुम्हाला समजल असत ते अस कधीच म्हणाले नव्हतेच.
त्याची लिंक तुम्हाला पाठवत आहे नक्की ऐका.आणि माझे वडिल अस कुठे बोलले आहेत त्याची लिंक तुमच्याकडे असेल तर नक्की पाठवा.

तुमच्या बाबांनी स्वतः कबूल केलं आहे की ते देवदत्त निकम यांच्या पिपाणीमुळे आमदार झाले आहेत. त्यामुळे तुम्ही हे सहानुभूतीच राजकारण बंद करा!


📝 निलिमा देवदत्त निकम

दोन्ही नेत्यांच्या लेकी आंबेगावच्या राजकीय मैदानात दिसणार..?

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी पुर्वा वळसे पाटील यांनी जबाबदारी घेतली आहे. त्यांनी वळसे पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत केलेले भाषण चांगलेच गाजले होते. आपले वडील कसे ग्रेट आहेत ते त्यांनी लोकांना समजावून सांगितले होते.शिवाय प्रचारात जिथे कमी तिथे मी अशी जबाबदारी पुर्वा वळसे पाटील यांनी पार पाडली आहे.

तर निलीमा निकम या राजकारणात नवख्या आहेत.तरी कमी वयात त्यांनी आपल्या वडीलांची निवडणुक प्रतिनिधी म्हणून पार पाडलेली जबाबदारी उल्लेखनीय आहे.
सहकार मंत्री वळसे पाटील यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबण्यासाठी अनेक अनुभवी लोक महत्वाची जबाबदारी पार पाडत होते.मात्र देवदत्त निकम यांच्याकडे जबाबदारी पार पाडण्यासाठी राजकीय अनुभव असणारे लोकच नव्हते. त्यामुळे देवदत्त निकम यांची कन्या निलीमा निकम यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. बाप देवदत्त निकम आणि लेक निलीमा निकम या दोघांनीच विधानसभा निवडणुकीचे अनेक डावपेच आखले आणि यशस्वी करुन दाखवले. या विधानसभा निवडणुकीतील अनेक गुपीतेही बाप लेकींमध्येच आहेत. एकंदरित बापाची राजकीय जबाबदारी निलीमा यांनीही या विधानसभा निवडणुकीत पेलवली आहे.

आगामी काळात या दोन्ही आंबेगावच्या लेकी आपल्या पित्याच्या राजकारणात सहभागी होतील. वेळेला राजकीय आखाड्यात समोरासमोर दिसतील आणि सुसंस्कृतपणा जोपासत आंबेगावच्या राजकीय वैभवात भर घालतील अशी आशा आंबेगावकर करत आहेत.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सलग चौथा बिबट्या जेरबंद

Published

on

Share

वळती प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात वनविभागाने मोठी कारवाई करत महिनाभरात सलग चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पवार मळा परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील प्रसिद्ध थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेकडील पवार मळा परिसरात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एक मादी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एक बछडा पिंजऱ्यात अडकला. पुढे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री आणखी एक मादी जेरबंद झाली. तर २ मार्च रोजी अंदाजे १५ महिन्यांचा नर बछडा देखील पिंजऱ्यात सापडला. या सर्व घटनांची माहिती नागापूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला दिली होती.


मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी फुलमाळी व वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी संबंधित बिबट्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून नागापूर परिसरात जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सलग चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading

गावागावातुन

दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.

Published

on

Share

पारनेर दि.१० प्रतिनिधी

जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.

अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.

तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.

आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada