Connect with us

गावागावातुन

पुणे जिल्हा परिषदेचा गलथान कारभार .. गावाला त्रास , सरपंच दिपक पोखरकर यांचे अर्धनग्न होत आंदोलन

Published

on

Share

मंचर (प्रतिनिधी)

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मंचर निरगुडसर रस्त्यावर पिंपळगाव तर्फे महाळुंगे गावाच्या लगत मंजूर असणारे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे कामाची सुरुवात केली. गावानजीक असणारा उतार कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ता खोदाई करून तो मुरूम व माती काढून टाकली आहे .त्यानंतर गेले एक ते दीड महिना काम बंद असल्याने या रस्त्यावर उडणार्या धुळीचा त्रास पिंपळगाव ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे . तक्रारी करुन पाठपुरावा करुनही रस्त्याचे काम सुरू होत नाही.

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानेच या रस्ताचे काम रखडल्याचे सांगत पिंपळगाव खडकी गावचे सरपंच दिपक पोखरकर यांनी अर्ध नग्न होत आज ग्रामस्थां समवेत आंदोलन केले. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे .या गलथान कारभारामुळे पिंपळगाव ग्रामस्थांना रोज होत असणारा त्रास कधी बंद होणार आहे. असा प्रश्न सरपंच दिपक पोखरकर व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे

मंचर निरगुडसर रस्त्यावर तुकानाना चौक ते पिंपळगाव खडकी जिल्हा मार्ग क्रमांक २४ या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दीड कोटी रुपये निधी मंजूर केला आहे .सदर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होणार आहे . त्यासाठी निविदा होऊन ठेकेदार ठरविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सदर ठेकेदाराने पिंपळगाव गावालगतच्या रस्त्यावर असणारा चढ कमी करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे.

या केलेल्या खोदकामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गावात राहणाऱ्या नागरिकांना व शाळेत येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर उडणार्या धुळीमुळे त्रास सहन करावा लागत आहे .

गेली एक ते दीड महिना त्रास सहन करून थकलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केल्याने सरपंच दिपक पोखरकर यांनी बांधकाम विभाग जिल्हा परिषद पुणे यांचे उपअभियंता महेश परदेशी यांच्याशी वारंवार संपर्क करुन रस्ता दुरुस्त करण्याचे काम लवकरात लवकर सुरू करा अशी विनंती केली .मात्र उपअभियंता परदेशी यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा सरपंच दिपक पोखरकर यांनी आरोप केला आहे.

ठेकेदाराची अरेरावी.. सरपंचांचा आरोप

सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे तेथे दररोज पाणी मारण्यात यावे . या रस्त्याचे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करावे असे ठेकेदाराला सांगूनही संबंधित कामाचा ठेकेदार अरेरावी करत आहे. वारंवार सांगुणही काम सुरू करत नाही. रस्त्यावर धुळ उडत आहे. तेथे पाणी मारायला सांगुणही ठेकेदार पाणी मारत नाही. पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारीही ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत.असा आरोपही सरपंच दिपक पोखरकर यांनी केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या अडचणी

पिंपळगाव खडकी येथील खोदाई केलेल्या रस्त्यालगत काही ग्रामस्थांच्या हरकती आहेत त्यामुळे काम सुरू होत नाही. उप अभियंता महेश परदेशी यांनी या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असताना ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सरपंच दिपक पोखरकर यांनी आंदोलन करतेवेळी सांगितले

खोदाई केल्यानंतर निघालेल्या माती व मुरुमाचे जिल्हा परिषदने काय केले..?

पिंपळगाव खडकी गावादरम्यान काँक्रीट रस्ता करण्यासाठी उतार कमी करण्यासाठी खोदाई करून निघालेले माती व मुरूम याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने काय केले..? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सदर खोदाई करताना जिल्हा परिषदेने महसूल विभागाची परवानगी घेतली होती का..? सदर खोदाई मधून निघालेल्या माती मुरमाची रॉयल्टी शासनाला जमा करण्यात आली आहे का..? सदर माती मुरूम वाहतूक करताना महसूल विभागांने परवानगी दिली होती का..? याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

कोण आहेत उपअभियंता महेश परदेशी ..?

पिंपळगाव खडकी येथील कामात उपअभियंता हलगर्जीपणा करत आहेत असा आरोप केला आहे. सरपंच दिपक पोखरकर यांनी आरोप केलेले उपअभियंता महेश परदेशी नक्की कोण आहेत…? असा प्रश्न उपस्थित केला ‌.तेव्हा माहीती घेतली असता


महेश परदेशी हे अहील्यानगर जिल्ह्यातून आंबेगाव सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून 2018-19 मध्ये रुजू झाले. त्यांनी आंबेगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून अंदाजे तीन वर्षे काम केले. आंबेगाव तालुक्यात काम करत असताना त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील कामाची ही जबाबदारी दिली जायची.त्यानंतर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून बढती मिळाली विशेष म्हणजे बढती मिळाल्यानंतरही त्यांना उपअभियंता म्हणून जुन्नर आंबेगाव पंचायत समितीचा कार्यभार मिळाला अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना बढती मिळाल्यानंतर त्यांची बदली कार्यरत जिल्ह्याबाहेर होत असते.

मात्र महेश परदेशी आंबेगाव तालुक्यात शाखा अभियंता होते आणि पुन्हा लगेचच त्यांची उपअभियंता म्हणून आंबेगाव मध्येच बढती झाली. त्यांचे शासकीय पातळीवर अधिकाऱ्यांमध्ये चांगले संबंध आहेत त्यांना राजकीय पाठबळ असल्याचीही चर्चा आहे .त्यामुळे ते आंबेगाव तालुक्यात व जुन्नर तालुक्यात उप अभियंता म्हणून राजे शाही पणे काम करत असल्याची चर्चा आहे. त्यांच्या सोबतीला नेहमी विशेष राजकीय लोकांचाही गराडा असतो.

सरपंच पोखरकर यांचे अर्धनग्न आंदोलन पिंपळगावकरांना त्रासापासून वाचवेल का ..?

खराब रस्ता चांगला होईल आणि आपल्या गावांमधून जाणाऱ्या वाहन चालकांना व ग्रामस्थांना चांगला रस्ता तयार होईल.. अशा अपेक्षेने सरपंच दिपक पोखरकर यांनी सदर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी शासन दरबारी व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. रस्त्याचे काम सुरू झाले मात्र ते शासनातील काही अधिकार्यांच्या अनास्थेमुळे बंद पडले आहे का? चांगला रस्ता मिळावा यासाठी केलेला अट्टाहास पुर्ण होण्याऐवजी मिळण्याऐवजी मानसिक त्रास आणि धुळीचा त्रास पिंपळगावकरांना सोसावा लागला आहे. त्यामुळे अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ सरपंचांवर आली आहे. सरपंच दिपक पोखरकर व ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन करूनही हा रस्ता कधी सुरू होणार याबाबत पिंपळगाव ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करत आहेत.

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या रखडलेल्या कामाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे.अशी अपेक्षाही पिंपळगाव ग्रामस्थांनी आंदोलनावेळी बोलून दाखवली आहे. त्यामुळे पिंपळगाव करांना सरपंचाच्या आंदोलनानंतर तरी त्रास बंद होईल का? हे आगामी काळात पहावे लागेल.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सलग चौथा बिबट्या जेरबंद

Published

on

Share

वळती प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात वनविभागाने मोठी कारवाई करत महिनाभरात सलग चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पवार मळा परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील प्रसिद्ध थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेकडील पवार मळा परिसरात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एक मादी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एक बछडा पिंजऱ्यात अडकला. पुढे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री आणखी एक मादी जेरबंद झाली. तर २ मार्च रोजी अंदाजे १५ महिन्यांचा नर बछडा देखील पिंजऱ्यात सापडला. या सर्व घटनांची माहिती नागापूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला दिली होती.


मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी फुलमाळी व वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी संबंधित बिबट्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून नागापूर परिसरात जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सलग चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading

गावागावातुन

दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.

Published

on

Share

पारनेर दि.१० प्रतिनिधी

जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.

अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.

तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.

आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada