Connect with us

गावागावातुन

पुणे जिल्हा परिषदेचा गलथान कारभार .. गावाला त्रास , सरपंच दिपक पोखरकर यांचे अर्धनग्न होत आंदोलन

Published

on

Share

मंचर (प्रतिनिधी)

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मंचर निरगुडसर रस्त्यावर पिंपळगाव तर्फे महाळुंगे गावाच्या लगत मंजूर असणारे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे कामाची सुरुवात केली. गावानजीक असणारा उतार कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ता खोदाई करून तो मुरूम व माती काढून टाकली आहे .त्यानंतर गेले एक ते दीड महिना काम बंद असल्याने या रस्त्यावर उडणार्या धुळीचा त्रास पिंपळगाव ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे . तक्रारी करुन पाठपुरावा करुनही रस्त्याचे काम सुरू होत नाही.

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानेच या रस्ताचे काम रखडल्याचे सांगत पिंपळगाव खडकी गावचे सरपंच दिपक पोखरकर यांनी अर्ध नग्न होत आज ग्रामस्थां समवेत आंदोलन केले. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे .या गलथान कारभारामुळे पिंपळगाव ग्रामस्थांना रोज होत असणारा त्रास कधी बंद होणार आहे. असा प्रश्न सरपंच दिपक पोखरकर व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे

मंचर निरगुडसर रस्त्यावर तुकानाना चौक ते पिंपळगाव खडकी जिल्हा मार्ग क्रमांक २४ या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दीड कोटी रुपये निधी मंजूर केला आहे .सदर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होणार आहे . त्यासाठी निविदा होऊन ठेकेदार ठरविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सदर ठेकेदाराने पिंपळगाव गावालगतच्या रस्त्यावर असणारा चढ कमी करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे.

या केलेल्या खोदकामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गावात राहणाऱ्या नागरिकांना व शाळेत येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर उडणार्या धुळीमुळे त्रास सहन करावा लागत आहे .

गेली एक ते दीड महिना त्रास सहन करून थकलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केल्याने सरपंच दिपक पोखरकर यांनी बांधकाम विभाग जिल्हा परिषद पुणे यांचे उपअभियंता महेश परदेशी यांच्याशी वारंवार संपर्क करुन रस्ता दुरुस्त करण्याचे काम लवकरात लवकर सुरू करा अशी विनंती केली .मात्र उपअभियंता परदेशी यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा सरपंच दिपक पोखरकर यांनी आरोप केला आहे.

ठेकेदाराची अरेरावी.. सरपंचांचा आरोप

सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे तेथे दररोज पाणी मारण्यात यावे . या रस्त्याचे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करावे असे ठेकेदाराला सांगूनही संबंधित कामाचा ठेकेदार अरेरावी करत आहे. वारंवार सांगुणही काम सुरू करत नाही. रस्त्यावर धुळ उडत आहे. तेथे पाणी मारायला सांगुणही ठेकेदार पाणी मारत नाही. पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारीही ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत.असा आरोपही सरपंच दिपक पोखरकर यांनी केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या अडचणी

पिंपळगाव खडकी येथील खोदाई केलेल्या रस्त्यालगत काही ग्रामस्थांच्या हरकती आहेत त्यामुळे काम सुरू होत नाही. उप अभियंता महेश परदेशी यांनी या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असताना ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सरपंच दिपक पोखरकर यांनी आंदोलन करतेवेळी सांगितले

खोदाई केल्यानंतर निघालेल्या माती व मुरुमाचे जिल्हा परिषदने काय केले..?

पिंपळगाव खडकी गावादरम्यान काँक्रीट रस्ता करण्यासाठी उतार कमी करण्यासाठी खोदाई करून निघालेले माती व मुरूम याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने काय केले..? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सदर खोदाई करताना जिल्हा परिषदेने महसूल विभागाची परवानगी घेतली होती का..? सदर खोदाई मधून निघालेल्या माती मुरमाची रॉयल्टी शासनाला जमा करण्यात आली आहे का..? सदर माती मुरूम वाहतूक करताना महसूल विभागांने परवानगी दिली होती का..? याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

कोण आहेत उपअभियंता महेश परदेशी ..?

पिंपळगाव खडकी येथील कामात उपअभियंता हलगर्जीपणा करत आहेत असा आरोप केला आहे. सरपंच दिपक पोखरकर यांनी आरोप केलेले उपअभियंता महेश परदेशी नक्की कोण आहेत…? असा प्रश्न उपस्थित केला ‌.तेव्हा माहीती घेतली असता


महेश परदेशी हे अहील्यानगर जिल्ह्यातून आंबेगाव सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून 2018-19 मध्ये रुजू झाले. त्यांनी आंबेगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून अंदाजे तीन वर्षे काम केले. आंबेगाव तालुक्यात काम करत असताना त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील कामाची ही जबाबदारी दिली जायची.त्यानंतर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून बढती मिळाली विशेष म्हणजे बढती मिळाल्यानंतरही त्यांना उपअभियंता म्हणून जुन्नर आंबेगाव पंचायत समितीचा कार्यभार मिळाला अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना बढती मिळाल्यानंतर त्यांची बदली कार्यरत जिल्ह्याबाहेर होत असते.

मात्र महेश परदेशी आंबेगाव तालुक्यात शाखा अभियंता होते आणि पुन्हा लगेचच त्यांची उपअभियंता म्हणून आंबेगाव मध्येच बढती झाली. त्यांचे शासकीय पातळीवर अधिकाऱ्यांमध्ये चांगले संबंध आहेत त्यांना राजकीय पाठबळ असल्याचीही चर्चा आहे .त्यामुळे ते आंबेगाव तालुक्यात व जुन्नर तालुक्यात उप अभियंता म्हणून राजे शाही पणे काम करत असल्याची चर्चा आहे. त्यांच्या सोबतीला नेहमी विशेष राजकीय लोकांचाही गराडा असतो.

सरपंच पोखरकर यांचे अर्धनग्न आंदोलन पिंपळगावकरांना त्रासापासून वाचवेल का ..?

खराब रस्ता चांगला होईल आणि आपल्या गावांमधून जाणाऱ्या वाहन चालकांना व ग्रामस्थांना चांगला रस्ता तयार होईल.. अशा अपेक्षेने सरपंच दिपक पोखरकर यांनी सदर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी शासन दरबारी व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. रस्त्याचे काम सुरू झाले मात्र ते शासनातील काही अधिकार्यांच्या अनास्थेमुळे बंद पडले आहे का? चांगला रस्ता मिळावा यासाठी केलेला अट्टाहास पुर्ण होण्याऐवजी मिळण्याऐवजी मानसिक त्रास आणि धुळीचा त्रास पिंपळगावकरांना सोसावा लागला आहे. त्यामुळे अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ सरपंचांवर आली आहे. सरपंच दिपक पोखरकर व ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन करूनही हा रस्ता कधी सुरू होणार याबाबत पिंपळगाव ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करत आहेत.

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या रखडलेल्या कामाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे.अशी अपेक्षाही पिंपळगाव ग्रामस्थांनी आंदोलनावेळी बोलून दाखवली आहे. त्यामुळे पिंपळगाव करांना सरपंचाच्या आंदोलनानंतर तरी त्रास बंद होईल का? हे आगामी काळात पहावे लागेल.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

व्हर्लपूल ऑफ इंडिया लि च्या वरिष्ठ व्यस्थापक यांची केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई येथील जल संसाधन विकास उपक्रमांना सदिच्छा भेट

Published

on

Share

शिरूर / आंबेगाव: उपजीविका विकासासाठी जल संसाधन विकास ह्या प्रकल्पा अंतर्गत शिरूर तालुक्यात लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन व व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 07 गावा मध्ये तसेच इलीका पी बी व्हर्लपूल आप्लायन्सेस प्रा. लि अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील 06 गावा मध्ये सिमेंट नाला बंधारा, माती बंधारा दुरुस्ती व गाळ काढणे, सूक्ष्म व तुषार सिंचन व रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवणे असे उपक्रम राबविले जात आहेत

व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापक सुश्री श्वेता श्रीवास्तव व लुपीन फाउंडेशन चे वर्क साईड हेड श्री वेंकटेश सर यांनी शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील जल संसाधन विकास प्रकल्पातील केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई या गावातील विविध उपक्रमांना भेट दिली. गावातील शेतकरी व ग्राम पंचायत सदस्य यांच्याशी संवाद साधून उपक्रमांच्या माध्यमातून होणाऱ्या व झालेल्या परिणामांना समजावून घेण्यात आले तसेच त्यांनी मार्गदर्शन केले.

सुश्री श्वेता यांनी समुदायाच्या मजबूत सहभागाबद्दल आणि लाभार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात लुपिन फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

सदर भेटी दरम्यान केंदूर च्या विद्यमान सरपंच सौ. मंगलताई पऱ्हाड, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, माजी सरपंच सूर्यकांत थिटे, भाऊसाहेब थिटे, लोणीचे माजी सरपंच उद्धव लंके, अशोक आदक, बाळशीराम वाळुंज तसेच शेतकरी उपस्थित होते.

सदर प्रकल्प भेटीचे नियोजन लुपिन फाउंडेशन चे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनात शिरूर,आंबेगाव व जुन्नर चे तालुका व्यवस्थापक प्रताप मोटे व बाळासाहेब बोराडे यांनी केले.

Continue Reading

गावागावातुन

भीमाशंकरचा एफ.आर.पी.नुसार रु. ३,२७३/- प्रती मे.टन दर

Published

on

Share

दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. रक्कम रु. ३२७२.१४ येत असून त्यानुसार रु. ३२७३/- प्रती मे.टन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन पंधरवड्याकरीता अदा केलेला प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे.टन वजा जाता उर्वरित रु. १७३/- प्रती मे.टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार शेतक-यांच्या बँक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, मा. उच्च न्यायालय व शासनाचे निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे. त्यानुसार गाळप हंगाम २०२५-२६ करीता देय एफ.आर.पी. रु.३२७२.१४ प्रती मे.टन येत आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसास प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे. टनाप्रमाणे अदा केलेला आहे. प्रथम हप्ता अदा करतेवेळी रक्कम उपलब्धतेनुसार एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार इथेनॉल विक्री, इथेनॉल व्याज परतावा व आयकर परताव्याची रक्कम जमा झाल्याने एफ.आर.पी.चे उर्वरित पेमेंटसाठी रक्कम उपलब्ध झाली आहे.


गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर २ लाख १२ हजार ५८६ मे.टन ऊस गाळप झाले असून रु. १७३/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बॅंक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असून यापुढे होणारे पंधरवडा ऊस पेमेंट रु. ३२७३/- प्रती मे.टन प्रमाणे वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे. तरी उस उत्पादक शेतक-यांनी आपला उत्पादित केलेला ऊस भीमाशंकर कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada