Connect with us

गावागावातुन

अतिवृष्टीग्रस्त गावांना आपत्ती व्यवस्थापनातून निधी द्या खा. नीलेश लंके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Published

on

Share

अहिल्यानगर : प्रतिनिधी

     नगर तालुक्यातील विविध गावांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पायाभूत सुविधांची हानी झाली असून त्याची दुरूस्ती व सुशोभीकरणासाठी आपत्ती व्यवस्थापनातून निधी मंजूर करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
      यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना  देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, नगर तालुक्यातील गावांमध्ये झालेली अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पूरस्थिती निर्माण होउन सार्वजनिक मालमत्तेस मोठया प्रमाणात नुकसान पोहोचले आहे. या आपत्तीमध्ये रस्ते, पुल, स्मशानभुमी, बंधारे, घाट, वस्ती जोड रस्ते इ. पायाभुत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे सबंधित ग्रामस्थ मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
 
    सादर करण्यात आलेली ग्रामपातळीवरील कामे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पूर, चक्रीवादळ इत्यादी आपत्ती व्यवस्थापन, पूर नियंत्रण व दुरूस्तीअंतर्गत प्रस्तावित करता येतील याकडे खा. लंके यांनी या निवेदनात जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 
    ही कामे मार्गी लावल्यानंतर या गावांतील ग्रामस्थांना सोयी-सुविधा मिळणार असून ग्रामस्थांचे पुनर्वसन, सुरक्षित प्रवास आणि अंत्यसंस्कार, धार्मिक विधींसाठी सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे या कामांच्या निधीसाठी आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत तातडीने मंजुरी देण्यात यावी व कार्यवाहीस गती देण्यात यावी अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे. 
     या निवेदनामध्ये खा. लंके यांनी पुढील गावांमध्ये विविध कामे प्रस्तावित केली आहेत. 

सारोळा कासार

स्मशानभूमी दुरूस्ती व सुशोभीकरण, काळे वस्ती येथील दोन पुलांची दुरूस्ती, दशक्रिया विधी घाट दुरूस्ती व सुशोभिकरण, बारे मळा शाळेसमोरील परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, दत्त मंदिरासमोरील परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, सारोळा गावठाण ते कडूस वस्ती रस्ता दुरूस्ती करणे.

अस्तगांव

स्मशानभूमी दुरूस्ती व सुशोभिकरण

स्मशानभूमीशेजारील रस्ता व सीडी वर्क, अस्तगांव गावठाण ते तरोडी रस्ता दुरूस्ती, गावठाण ते गाढवे वस्ती रस्ता दुरूस्ती.

खडकी

स्मशानभुमी दुरूस्ती व सुशोभिकरण, खडकी ते जाधव मळा रस्ता व सीडी वर्क, खडकी सोसायटी ते नगर दौंड महामार्ग रस्त्याचे काँक्रीटीकरण.

वाळकी

वाळकी ते गुंडेगाव रस्ता व सीडी वर्क, गावठाण ते अमरधाम रस्ता दुरूस्ती, जुंदरे मळा रस्ता दुरूस्ती, बोठे वस्ती, जुंदरे वस्ती, अमरधाम जवळील बंधारे दुरूस्ती.

भोरवाडी

वडवस्ती ते खैरे वस्ती रस्ता दुरूस्ती, नवीन खडकवाडी पूल दुरूस्ती व सीडी वर्क, गावठाण ते घुले वस्ती रस्ता दुरूस्ती.

अकोळनेर

गावठाण ते मेहेत्रे वस्ती रस्ता व ३ ठिकाणी सीडी वर्क, जाधववाडी रस्त्यावर २ ठिकाणी सीडी वर्क, दरोडी मळा, थोरात वस्ती, देशमुख मळा रस्ते दुरूस्ती.

सोनेवाडी

सोनेवाडी-जाधववाडी रस्त्यावरील पुल, सीडी वर्क, बोगरे हॉस्पिटल ते कुबाडे मळा रस्त्यावरील सीडी वर्क, दरेवस्ती, पाटील मळा, गोपळ वस्ती, दळवी वस्ती येथे सीडी वर्क.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सलग चौथा बिबट्या जेरबंद

Published

on

Share

वळती प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात वनविभागाने मोठी कारवाई करत महिनाभरात सलग चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पवार मळा परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील प्रसिद्ध थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेकडील पवार मळा परिसरात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एक मादी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एक बछडा पिंजऱ्यात अडकला. पुढे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री आणखी एक मादी जेरबंद झाली. तर २ मार्च रोजी अंदाजे १५ महिन्यांचा नर बछडा देखील पिंजऱ्यात सापडला. या सर्व घटनांची माहिती नागापूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला दिली होती.


मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी फुलमाळी व वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी संबंधित बिबट्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून नागापूर परिसरात जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सलग चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading

गावागावातुन

दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.

Published

on

Share

पारनेर दि.१० प्रतिनिधी

जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.

अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.

तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.

आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada