Connect with us

गावागावातुन

शिक्षकांचा मार आणि शाबासकीची थाप. वाकेश्ववर विद्यालयात माजी विद्यार्थी रंगले आठवणीत.

Published

on

Share

मंचर

शालेय जीवनात शिक्षण घेणारे सर्व जुने विद्यार्थी, मित्र आणि त्यांना शिस्तीचे धडे देणारे तेच शिक्षक तब्बल 23 वर्षानंतर एकत्र आले. ( पेठ ता. आंबेगाव) येथील श्री वाकेश्वर विद्यालयातील सन 2002 या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपला सत्कार करुन आदर व्यक्त करणे, हा जीवनातील सर्वात मोठा आनंद असल्याची भावना तत्कालीन शिक्षक रामचंद्र तरंगे यांनी व्यक्त केली.


दहावीपर्यंत एकाच वर्गात खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण घेणारे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यावेळी विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक आता सेवानिवृत्त झाले आहेत. आपली नोकरी, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनात रमलेल्या 2002 च्या दहावी बॅचचे ते विद्यार्थी तब्बल 23 वर्षांनंतर एकत्र आले होते. आपले विद्यार्थी हे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, याचा आनंद आणि बऱ्याच वर्षाच्या भेटीगाठीने विद्यार्थ्यांसह शिक्षकही भारावले.


कार्यक्रमाच्या सुरवातीस हयात नसलेले शिक्षक व आपले काही वर्गमित्र यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थित शिक्षकांचा सत्कार करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 23 वर्षांनी ऐकमेकांना भेटणाऱ्या मित्रांच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद, मस्ती अशा संमिश्र भावना होत्या.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावी अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.


यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधत पर्यावरणाचे महत्व समजून घेवून त्याचा ऱ्हास होणार नाही अशी काळजी सर्वांनी घ्यावी यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांना एक झाडाचे रोपटे व निसर्गाबद्दल अधिक माहिती सांगणारे एक पुस्तक शिक्षकांच्या हस्ते भेट देण्यात आले.
यावेळी बोलताना शिक्षक रमेश राजगुरू म्हणाले, २3 वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाहून निश्चित आनंद वाटला.

सर्व विद्यार्थी आपआपल्या क्षेत्रात काम करत आहेत, याचा फायदा समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना होण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी ठराविक निधी जमा करून त्या निधीचा उपयोग आपल्या शाळेसाठी किंवा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी करावा असे अवाहन यावेळी रमेश राजगुरू यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन घनवट, अनिस तांबोळी, शोभा गायकवाड, दिपक आदक, संदेश पवळे यांसह सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. यावेळी शिक्षक रामचंद्र तरंगे, रमेश राजगुरू यांसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललिता काळे यांनी केले तर सुत्रसंचालन शोभा गायकवाड यांनी केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक अध्यक्षपदी विशाल वाबळे

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी खडकी ( ता. आंबेगाव) येथील विशाल वाबळे यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद गोतारणे यांनी हे निवडीचे पत्र विशाल वाबळे यांना दिले .मंचर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष मेळाव्यात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, युवक अध्यक्ष प्रमोद सिंह गोतारणे, दामु घोडे व आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर निवडीचे पत्र दिले आहे.

यावेळी सत्काराला उत्तर देताना विशाल वाबळे म्हटले की आंबेगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देवुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम मी करणार आहे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे घराघरात पोहचवणार असल्याचे विशाल वाबळे यांनी निवडीनंतर सांगितले.

विशाल वाबळे यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ अमोल कोल्हेच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासोबत ते सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असतात ‌. विशाल वाबळे यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरात उन अभिनंदन होत आहे.

Continue Reading

गावागावातुन

पारगावच महसूल कार्यालय मोजतोय अखेरच्या घटका

Published

on

Share

मंचर

आंबेगाव च्या पूर्व भागातील पारगाव कारखाना येथील तलाठी व महसूल मंडलाधिकारी कार्यालय शेवटच्या घटका मोजत आहे. दोन्ही कार्यालयाची इमारत नादुरुस्त झाल्याने पारगाव जारकरवाडी तलाठी कार्यालय पारगाव ग्रामपंचायत खोलीमध्ये चालू आहे तर महसूल मंडलाधिकारी कार्यालय खाजगी जागेत चालू आहे. पूर्वीची इमारत चाळीस वर्षाहून अधिक झाली आहे. सदर इमारत जीर्ण स्वरूपाची झाली असून कौलारु इमारत आहे. या इमारतीला तडे गेले असून धोकादायक बनली आहे .


तलाठी सजेसाठी पारगाव जारकरवाडी ही गावे असून महसूल मंडलाधिकारी कार्यालयसाठी एकुण सतरा गावे आहेत त्यामध्ये पारगाव, जारकरवाडी, शिंगवे, वळती, भागडी, काठापूर बुद्रुक, लाखणगाव, पोंदेवाडी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी, खडकवाडी, रानमळा, वाळुंज नगर. ही गावे येत असल्याचे माहिती मिळत आहे. सदर इमारतीचे काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी पोंदेवाडीचे माजी सरपंच अनिल वाळुंज व जारकरवाडीचे उपसरपंच सचिन टाव्हरे यांनी केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

वळती : काटवानवस्तीत घरफोडी; एक लाख रुपये व सोन्या-चांदीचे दागिने चोरीला

Published

on

Share


वळती, ता. २८

वळती येथील काटवानवस्तीत शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे एक लाख रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.ही घटना नकुबाई जयराम भोर (वय ८५) यांच्या घरी घडली असून त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने आपल्या धाकट्या मुलाच्या घरी राहण्यास गेल्या होत्या.

घटनेचा तपशील असा आहे की, वळती गावाच्या पूर्वेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या काटवनवस्तीत नकुबाई भोर यांचे घर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेतीचा खंड शेतकऱ्याने दिला होता. तो खंड रक्कम (रु. १,००,०००) नकुबाई भोर यांनी कपाटात ठेवला होता.

दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रामहरी कोंडीभाऊ भोर व बबन जयराम भोर यांच्या घरांना बाहेरून कडी लावून टाकली. त्यानंतर नकुबाई भोर यांच्या घराचे कुलूप कटरच्या साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट उघडून एक लाख रुपये रोख, पाकिटातील १५०० रुपये, तसेच दीड तोळ्याची सोन्याची बोरमाळ, अर्धा तोळ्याची नथ, तीन तोळ्यांच्या चांदीच्या मासोळ्या असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

शनिवारी सकाळी सहा वाजता बबन भोर यांनी शेजारील शेतकरी रामहरी भोर यांना फोन करून घराच्या कडी उघडण्यास सांगितले. मात्र त्यांच्या घरालाही कडी लावलेली असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ गोविंद भोर यांना याबाबत माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वळती गावाचे पोलीस पाटील प्रकाश लोंढे यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानंतर सहायक फौजदार एस. आर. मांडवे, पोलीस कॉन्स्टेबल पी. एस. गवारी व मोमीन यांनी घटनास्थळी भेट देऊन घरफोडीचा पंचनामा केला.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Continue Reading
Advertisement

Trending