गावागावातुन
उद्योगविश्वात ग्रामीण विद्यार्थ्यांची दमदार एन्ट्री – डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयचे ४० प्रशिक्षणार्थी नामांकित कंपन्यांमध्ये निवड
प्लेसमेंट म्हणजेच प्रगती – डॉ. विखे पाटील आयटीआयचा विश्वास वाढवणारा टप्पा”
नगर (प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळाल्यास युवकही उद्योगजगतात आपला ठसा उमटवू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या एमआयडीसी, अहिल्यानगर येथील इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ITI) संस्थेतील विद्यार्थ्यांचे ताजे यश. संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी सलग दोन दिवस झालेल्या कॅंपस मुलाखतींमध्ये आपल्या उत्कृष्ट कौशल्याने औद्योगिक क्षेत्रात यशस्वी प्रवेश करत संस्थेच्या गुणवत्तेची उजळणी केली आहे. या दोन्ही मुलाखतींमध्ये एकूण ४० प्रशिक्षणार्थ्यांची यशस्वी निवड झाल्यामुळे विद्यार्थी, पालक व संस्था परिवारात आनंदाचे वातावरण आहे.
दि. ०३/०६/२०२५ रोजी एपिटोम कॉम्पोनंट्स प्रा. लि., सुपा एमआयडीसी या कंपनीसाठी फिटर, टर्नर, मशिनीस्ट, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी कॅंपस मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एकूण ९५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते, ज्यामधून ७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
दि. ०५/०६/२०२५ रोजी Exide Industries Ltd., MIDC, अहिल्यानगर या देशातील अग्रगण्य कंपनीसाठी फिटर, टर्नर, मशिनीस्ट, वेल्डर, मेकॅनिक डिझेल, एम.एम.व्ही. आणि इलेक्ट्रिशियन या ट्रेडमधून ११० प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामधून ३३ प्रशिक्षणार्थ्यांनी यश मिळवले.

मुलाखतीपूर्वी संस्थेतर्फे आयोजित विशेष मार्गदर्शन सत्रांमध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी सादरीकरण कौशल्य, तांत्रिक ज्ञान आणि संवादकौशल्य मोठ्या आत्मविश्वासाने सादर केले. संस्थेतील शिक्षक, प्लेसमेंट अधिकारी आणि प्रशिक्षण समन्वयकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले.
ही निवड संस्थेच्या प्रगत कार्यशाळा, अनुभवी मार्गदर्शक, डिजिटल शिक्षण प्रणाली तसेच ऑन-द-जॉब ट्रेनिंग या सर्वांगीण उपक्रमांचे फलित मानले जात आहे.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले, “ग्रामीण भागातील युवकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे हे आमचे ध्येय आहे, आणि हे यश त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
याप्रसंगी जलसंपदा मंत्री व संस्थेचे चेअरमन मा. राधाकृष्ण विखे पाटील, डायरेक्टर जनरल डॉ. पी. एम. गायकवाड, डायरेक्टर (टेक्निकल) श्री. सुनील कोल्हापुरे, डायरेक्टर (मेडिकल) डॉ. अभिजीत दिवटे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे प्राचार्य प्रा. ए. व्ही. सूर्यवंशी, उपप्राचार्य श्री. काकडे, गटनिदेशक श्री. पठारे, श्री. भुसे, व प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी श्री. अरुण म्हस्के यांनीही विद्यार्थ्यांचे तसेच संपूर्ण आयटीआय टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
ही निवड डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयचे नाव गौरवाने उजळवणारी ठरली असून, भविष्यातील अनेक प्रशिक्षणार्थ्यांसाठी ती निश्चितच प्रेरणादायी ठरेल, याबाबत शंका नाही!
गावागावातुन
फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर दि.१४ प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.
निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
गावागावातुन
दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.
पारनेर दि.१० प्रतिनिधी
जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.
अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.
तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.
आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
गावागावातुन
डॉ. विद्या कावरे पारनेरच्या नगराध्यक्ष, महाविकास आघाडीची बाजी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब
महायुतीचा घोडेबाजार फसला
पारनेर : प्रतिनिधी
पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवला आहे. आघाडीच्या डॉ. विद्या बाळासाहेब कावरे यांनी ११ विरुद्ध ६ मतांनी विजय संपादन करत नगराध्यक्षपद पटकावले. त्यांच्या विजयाने महायुतीच्या राजकीय घोडेबाजाराला चपराक बसली असून, खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशीया यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. १० नोव्हेंबर) विशेष सभा घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. हात वर करून मतदान पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत डॉ. कावरे यांनी सहज विजय मिळवला.
महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकदिलाने मतदान करून पक्षनिष्ठा अबाधित ठेवली. नितीन अडसूळ, जायदा शेख, सुरेखा भालेकर, योगेश मते, भूषण शेलार, प्रियंका औटी, निता औटी, सुप्रिया शिंदे, हिमानी नगरे, विद्या गंधाडे आणि स्वतः डॉ. कावरे यांनी मतदान करून डॉ. कावरे यांचा विजय निश्चित केला.
विरोधी उमेदवार अशोक चेडे यांना विजय सदाशीव औटी, युवराज पठारे, निता ठुबे, नवनाथ सोबले आणि कांताबाई ठाणगे या नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला.
महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना ‘गळाला लावण्यासाठी’ मोठे आर्थिक आमिष दाखवण्यात आले. लाखो रुपयांच्या ऑफर्स देत मतदानावर परिणाम करण्याचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते. तरीसुद्धा आघाडीचे नगरसेवक ठाम राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते योगेश मते यांनी शनिवारी ९ नगरसेवकांना व्हिप बजावत “डॉ. विद्या कावरे यांनाच मतदान करावे” असे निर्देश दिले होते. या व्हिपचे काटेकोर पालन करत आघाडीने एकजुटीचा नमुना दाखवला.
नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डॉ. विद्या कावरे यांचा नगरपंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. समर्थकांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. महाविकास आघाडीच्या या विजयाने पारनेरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक11 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
