गावागावातुन
शरदचंद्र नागरी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न
जांबूत वार्ताहर, दि. १५- शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरी (ता.जुन्नर) या संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि. २४) रोजी संस्थेचे अध्यक्ष एम. डी. घंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरी (ता. जुन्नर ) येथील श्रीराम मंगल कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेच्या सर्व सभासदांना २०२४-२५ या आर्थिक वर्षात १० टक्के प्रमाणे लाभांश व दिवाळी भेट देऊन सभासदांची दिवाळी गोड करणार असल्याचे अध्यक्ष एम. डी. घंगाळे यांनी सांगितले.
प्रसंगी सभेपुढे आलेल्या सभासद, खातेदारांच्या प्रश्नांना संचालक मंडळाने समर्पक माहिती देत उपस्थितांचे समाधान केले. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्रासह १२ शाखांत विस्तार असून शरदचंद्र पतसंस्थेचा सुमारे ४४२ कोटींहून अधिकचा एकत्रित व्यवसाय आहे. मार्च २०२५ अखेर सुमारे १६५७७ ग्राहकांनी या पतसंस्थेचे सभासदत्व स्वीकारले असून २४५ कोटी २२ लाखांहून अधिकच्या ठेवी व १९७ कोटी ६२ लाखांहून अधिकचे कर्जवाटप संस्थेने केलेले आहे. सभासद , खातेदारांच्या विश्वासावर पतसंस्थेला नेहमीच ऑडीट वर्ग “अ” प्राप्त झालेल्या असून या आधीच्या काळात संस्थेने पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून विविध स्तरावरील अनेक पुरस्कारही प्राप्त केलेले आहेत.
शरदचंद्र गौरव पुरस्काराच्या माध्यमातून पतसंस्था सामाजिक , कृषी, अध्यात्मिक , शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रात नामांकन प्राप्त असलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत आहे असून या पारदर्शक कारभाराबद्दल उपस्थितांनी संचालक मंडळाचे कौतुक केले.
आजच्या डिजिटल युगाचा विचार करता शरदचंद्र पतसंस्थेकडून ग्राहकांना बँकिंग सुविधा, मनी ट्रान्स्फर , एसएमएस प्रणाली, वीजबिल स्वीकृती , सेफ लॉकर ,NEFT/RTGS या सुविधांसह सभासदांना सुमारे ३ लाखांचे अपघाती विमा संरक्षण देण्यात येत आहे.
संस्थेचे अध्यक्ष म्हणून एम.डी.घंगाळे, उपाध्यक्ष राजेंद्र औटी , सेक्रेटरी दत्तात्रय गंधट, खजिनदार भिमाजी मालुसकर, तर जी.के.औटी सर , अनंतराव गटकळ , नरेंद्र गटकळ , तुळशीराम हाडवळे, प्रमोद पाटील औटी , संजय पिंगळे , अशोक औटी, विवेक शेळके ,संदिप औटी , संतोष चव्हाण , शालिनी हाडवळे, वैशाली औटी, शांता गवळी, अशोक कणसे , रज्जाक सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शाम आर्विकर तर वसुली अधिकारी म्हणून महावीर व्हनुरे हे कार्यरत आहेत. संस्थेचा राजुरी, आळेफाटा, नारायणगाव, आणे, पारगाव तर्फे मढ , नारायणगाव, निळवंडे, जांबूत , सावरगाव , भोसरी,घाटकोपर , वाशी तुर्भे ,ओतूर आदी शाखांत विस्तार झालेला आहे.
प्रसंगी या सर्वसाधारण सभेसाठी जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दिपक आवटे, ग्राहक पंचायतचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर,समर्थ पॉलिटेक्निकचे विश्वस्त वल्लभ शेळके, खरेदी विक्री संघांचे संचालक लक्ष्मण घंगाळे, तुळशिराम भोईर, एकनाथ शिंदे, राजुरीच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके , माजी उपसरपंच संजय गवळी, नंदकुमार हाडवळे, भरत घंगाळे, गणेश दूध संस्थेचे चेअरमन सुभाष औटी, डी. बी गटकळ, गोविंद औटी, यांचेसह विविध शाखांचे सल्लागार, खातेदार व सभासद, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे प्रस्ताविक संस्थेचे संचालक जी. के. औटी सर यांनी केले. सभावृत्तांत वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी शाम अर्विकर यांनी तर तुळशीराम हाडवळे यांनी सूत्रसंचालन केले , अनंतराव गटकळ यांनी आभार मानले.
गावागावातुन
आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सलग चौथा बिबट्या जेरबंद
वळती प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात वनविभागाने मोठी कारवाई करत महिनाभरात सलग चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पवार मळा परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील प्रसिद्ध थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेकडील पवार मळा परिसरात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एक मादी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एक बछडा पिंजऱ्यात अडकला. पुढे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री आणखी एक मादी जेरबंद झाली. तर २ मार्च रोजी अंदाजे १५ महिन्यांचा नर बछडा देखील पिंजऱ्यात सापडला. या सर्व घटनांची माहिती नागापूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला दिली होती.
मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी फुलमाळी व वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी संबंधित बिबट्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून नागापूर परिसरात जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सलग चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
गावागावातुन
फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर दि.१४ प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.
निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
गावागावातुन
दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.
पारनेर दि.१० प्रतिनिधी
जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.
अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.
तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.
आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक1 year agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
