सामाजिक
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार..
मुंबई (प्रतिनिधी)
महायुतीने महाराष्ट्रात एक हाती सत्ता मिळवल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार..? हे महाराष्ट्रातील जनतेला अद्याप समजलेलं नाही. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही. असेच बोलले जाते आहे. आज रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यामध्ये खलबते सुरू असून दिल्लीत आज रात्री उशिरा मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एकमत होणार असल्याची शक्यता आहे .तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तगडी व जास्त मंत्रीपदे मिळतील. अजित पवारांनी बिनशर्त पाठिंबा दर्शविला असल्याने त्यांना चांगल्या खात्यांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार करत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आपला पाठिंबा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना दिलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये किंवा त्यांची बार्गेनिग पावर कमी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने डाव करत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दर्शवला आहे .
२०१९च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी रिस्क घेत उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेतली आणि मोठे पाऊल उचलत चाळीस आमदारांसह पक्ष सोडला.शिंदेमुळे भाजपा पक्ष सत्तेत आला. महाविकास आघाडी भरभक्कम असताना पुन्हा महाराष्ट्रात भाजपा सत्तेत येऊ शकणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे भाजपाच्या मदतीला धावले त्यांनी भाजपाला महाराष्ट्रात साथ देत सत्ताही मिळवून दिली.
त्याच्या बदल्यात शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिले गेले 2024 च्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवल्या गेल्या आणि त्या बहुमताने जिंकले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील .अशी शक्यता असताना त्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे .
दिल्लीत तोडगा निघणार
आता गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यामध्ये बैठक सुरू असून या बैठकीत मुख्यमंत्री पदावर एकमत होऊन देवेंद्र फडणवीस यांचेच नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. ही घोषणा थोड्याच वेळात होईल किंवा अधिकृतरित्या भाजपाकडून उद्या सकाळी जाहीर केली जाईल
एकनाथ शिंदे घेणार मोठी खाती
भाजपाने मुख्यमंत्री पद स्वतःकडे घेत देवेंद्र फडणवीस यांना या पदावर बसवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली ताकद पणाला लावून मुख्यमंत्रीपद सोडल्याच्या बदल्यात गृह किंवा अर्थ, सार्वजनिक बांधकाम, नगर विकास, महसूल यासारख्या तगड्या खात्यांना आग्रह धरतील आणि तो आग्रह भाजपाला पूर्ण करावा लागेल. नाहीतर उद्धव ठाकरेंना ज्याप्रमाणे भाजपाने फसवले त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेनाही फसवले अशी चर्चा रंगू शकते .
अजित पवारांना फटका
अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजपाला देत देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करा. अशी घोषणा केल्याने आता सुरू असणाऱ्या बैठकीत अजित पवार यांना फटका बसू शकतो. कारण त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्यांच्याकडे सध्या असलेल्या सगळ्या खात्यांपैकी काही खाती त्यांना शिवसेना पक्षाला सोडायला लागू शकतात
देवेंद्र फडणवीसच बॉस..
आज सर्वच बाबींवर चर्चा होऊन महायुती मधला गोंधळ मिटवला जाईल. देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून घोषित केले जाईल.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकलेल्या डावामुळे ते बार्गेनिंग करून जास्तीची वजनदार खाते स्वतःच्या पदरात पाडून घेतील. मुख्यमंत्रीपद भेटत असल्याने भाजपा त्यांच्या तडजोडीला मान्यता देईल. आणि महाराष्ट्राला पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच भेटतील अशी चर्चा आहे.
सामाजिक
शिवनेरी मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील धावपटूंचा सहभाग; १५ फेब्रुवारीला शिवनेरी पायथ्याशी जल्लोष
जुन्नर, प्रतिनिधी –
शिवजयंती महोत्सवानिमित्त शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन, मोरडे फूड्स व पोल्ट्री ब्रिडर्स कोऑर्डिनेशन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील ‘शिवनेरी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या मॅरेथॉनचे चौथे वर्ष असून देश-विदेशातील तीन हजारांहून अधिक धावपटू यात सहभागी होणार आहेत. केनियाच्या धावपटूंचा संघ हे स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरणार असल्याची माहिती शिवनेरी ट्रेकर्सचे अध्यक्ष निलेश खोकराळे यांनी दिली.
५, १० व २१.१ किलोमीटर अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. शिवजयंतीच्या आदल्या रविवारी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या मॅरेथॉनला यंदा उत्तर पुणे जिल्ह्यातील विविध संस्था व संघटनांचा सक्रिय सहभाग लाभला आहे. मोरडे फूड्स, वेकिज, शिवाई देवी मंदिर ट्रस्ट तसेच कुसूर, वडज, पारुंडे व काटेडे ग्रामपंचायतींसह आरोग्य विभाग, वन विभाग, तहसील कार्यालय, पोलिस प्रशासन, जुन्नर पंचायत समिती व नगर परिषद यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
१५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून धावपटू शिवनेरी पायथ्याशी दाखल होण्यास सुरुवात करतील. झुंबा, पारंपरिक ढोल-झांज वादनाने वातावरण भारावून जाईल. सकाळी ६.१५ वाजता भगव्या झेंड्याने स्पर्धेला सुरुवात होईल. लोकनेते, वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकारी तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू यावेळी उपस्थित राहणार आहेत.
ऐतिहासिक परिसरातून स्पर्धा मार्ग शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून स्पर्धेला प्रारंभ होऊन कुसूर–तलाखी–वडज–पारुंडे–काटेडे असा मार्ग असणार आहे. सर्व गटांच्या शर्यतींचा प्रारंभ व समारोप कुसूर येथील दत्त मंदिरासमोरील मैदानात होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण ज्या परिसरात गेले, त्या ऐतिहासिक व निसर्गरम्य वातावरणातून धावण्याची संधी सहभागी धावपटूंना मिळणार आहे.
धावपटूंना विविध सुविधा स्पर्धा मार्गावर झुंबा, पारंपरिक लोकवाद्य, नाश्ता, पाणी व एनर्जी ड्रिंक, द्राक्षे, संत्री, अंजीर, चिक्की आदी पोषणपूरक पदार्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रथमोपचार, फिजिओथेरपी, कार्डियाक रुग्णवाहिका, फिरती शौचालये आदी सुविधा उपलब्ध असतील. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दुतर्फा मशालींच्या प्रकाशात उजळलेला स्पर्धामार्ग हे या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
शिवनेरीच्या पायथ्याशी होणाऱ्या या भव्य क्रीडा सोहळ्यामुळे शिवजयंती महोत्सवात यंदा क्रीडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे.
गावागावातुन
“सेवाभावातून वयोवृद्धांना नवसंजीवनी..!” ब्राह्मणी येथे ‘वयोश्री योजना’ अंतर्गत आरोग्य तपासणी व मोफत सहाय्यक साधन शिबिर यशस्वी संपन्न..!
ब्राह्मणी (ता. राहुरी) : (प्रतिनिधी)
समाजसेवेचा अखंड ध्यास आणि वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्य व स्वावलंबनासाठीची बांधिलकी जपत, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, अहिल्यानगर संचलित प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र यांच्या वतीने ‘वयोश्री योजना’ अंतर्गत दोन दिवसीय भव्य आरोग्य तपासणी व सहाय्यक साधन वितरण शिबिर नुकतेच ब्राह्मणी येथे यशस्वीपणे पार पडले.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार), अॅलिम्को, कानपूर आणि ग्रामपंचायत ब्राह्मणी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर २ व ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरादरम्यान एकूण ७२१ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, ते ‘वयोश्री योजना’चे पात्र लाभार्थी ठरले आहेत. या लाभार्थ्यांना व्हीलचेअर, कमोड चेअर, श्रवणयंत्र, पाठीचा पट्टा, कमरेचा पट्टा, मानपट्टा, काठी इत्यादी विविध सहाय्यक साधनांचे विनामूल्य वितरण लवकरच करण्यात येणार आहे. या साधनांची एकूण अंदाजित किंमत ₹४७,१३,२३८ इतकी आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून मा. खा. डॉ. सुजय (दादा) विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र हे पुन्हा एकदा समाजसेवेचे आदर्श उदाहरण ठरले आहे. या केंद्रामार्फत दररोज अनेक वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य सल्ला, वैद्यकीय मदत आणि सहाय्यक साधनांची सुविधा पुरविली जाते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत ब्राह्मणीचे सरपंच सुरेश मानकर तसेच अॅलिम्को, कानपूर यांचे विशेष सहकार्य लाभले. या योजनेमुळे वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आणि स्वाभिमानाचे तेज पुन्हा झळकले.
“सेवाभावातून समाजसेवा” हे ब्रीद जपत,
डॉ. विखे पाटील फाउंडेशन, अहिल्यानगर यांनी
वयोवृद्ध नागरिकांसाठी पुन्हा एकदा
‘आशेचा किरण’ निर्माण केला आहे.
गावागावातुन
पारनेर, कान्हूर मंडळातील शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवा राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांना मागणी
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान न दिल्यास आक्रोश मोर्चाचा इशारा
पारनेर : प्रतिनिधी
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही, पारनेर महसूल मंडळ आणि कान्हूर पठार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीबाबतचे अनुदान न देणे हा अन्यायकारक निर्णय असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, यांच्या वतीने शुक्रवारी महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की “तालुक्यातील इतर महसूल मंडळांप्रमाणेच पारनेर व कान्हूर पठार महसूल मंडळांमध्येही अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, शासनाच्या निकषांनुसार या दोन विभागांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, हे अन्यायकारक आहे.”

निवेदनात तहसील प्रशासनाने शासन दरबारी सकारात्मक अहवाल पाठवून, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच “जर आठ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तर तहसील कार्यालयावर मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल,” असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित युवा शेतकऱ्यांनी सांगितले की, पारनेर व कान्हूर पठार भागात सलग पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, भुईमूग, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, पावसाच्या निकषांच्या चुकीच्या गणनेमुळे या भागातील शेतकरी शासन मदतीपासून वंचित राहिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि नीलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी पुढाकार घेतला गेला आहे. “शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला मदत मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे, दया नाही,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
जर पुढील काही दिवसांत शासनाकडून ठोस निर्णय झाला नाही, तर पारनेर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोठा आक्रोश मोर्चा नेण्यात येणार असून, तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी मारुती रेपाळे, दीपक लंके,जितेश सरडे,संदीप गाडेकर,योगेश मते, भूषण शेलार, अर्जुन भालेकर, बापू चत्तर,चंद्रभान ठुबे,दीपक पाडळकर, किरण ठुबे, सुभाष रेपाळे, मोहन रेपाळे, बबन डमरे, राहुल चेडे,प्रसाद नवले, विनोद उदार, नीलेश दुश्मन, प्रशांत बोरुडे, हिरामण चेडे,शहाजी थोरात, सुरेश झगडे, एकनाथ पवार, मयूर गायकवाड, प्रमोद वाखारे, शिवाजी शिंदे, सुहास साळवे, भाऊसाहेब शिंदे, सुरेश पवार, प्रवीण थोरात, प्रशांत साळवे, राजेंद्र शेरकर, अंकुश शेरकर, शरद खोडदे, प्रसन्ना मोरे, सागर जपे, नंदू सोनवणे, दादाभाऊ ठोंबरे, बाळू लोंढे, दत्तात्रय गुंड, भाऊसाहेब गुंड, सरदार शेख, गणेश तांबे, धनंजय व्यवहारे, सुभाष नवले, अभिजीत झावरे, अमित जाधव, सावकार शिंदे, विजय शेरकर, नवनाथ वाळुंज, सचिन औटी, दत्तात्रय निमसे, बाळासाहेब नगरे, कारभारी पोटघन,दादाभाऊ चेडे आदी उपस्थित होते.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक12 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
