गावागावातुन
महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचा पराभव.. या कारणांमुळे
जुन्नर प्रतिनिधी
जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा पराभव झाला.महायुतीचाही पराभव झाला. या ठिकाणावरून अपक्ष माजी आमदार शरद सोनवणे हे विजयी झाले. महाविकास आघाडीचे सत्यशील शेरकर व महायुतीचे आमदार अतुल बेनके यांनी विजयाचे दावे केले होते .ते फोल ठरले आहेत. गुरुवारी जुन्नर येथे पराभवाचे चिंतन करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक नारायणगाव येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा पराभव ईव्हीएम घोटाळ्यामुळे न होता सत्यशील शेरकर यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी नियोजन न केल्याने झाला .अशी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जाहीर रित्या बोलून दाखवली. राज्यात महाविकास आघाडी पराभवाचा ठपका ईव्हीएम ठेवत असताना जुन्नरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे.
जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावी यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आग्रही होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी ताकद लावून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवली राष्ट्रवादी काँग्रेसकडे
सक्षम उमेदवार नसल्याने त्यांनी काँग्रेस मधून सत्यशील शेरकर यांना घेऊन उमेदवारी दिली. सत्यशील शेरकर हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असल्याने ते शेतकऱ्यांशी जोडलेले आहेत. त्यांचा संपर्क आहे असे सांगितले जात होते. त्यामुळे ते विजय होतील असा विश्वास खासदार कोल्हे यांना होता. त्यांच्या विरोधात असणारे महायुतीचे उमेदवार अतुल बेनके ,अपक्ष शरद सोनवणे यांनीही प्रचाराचे नियोजन योग्य केलं होते. त्यांच्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचे नियोजन कमकुवत असल्याची तक्रार आज आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या आभार सभेत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
राज्यात महाविकास आघाडी ईव्हीएम वर ठपका ठेवत असताना जुन्नर विधानसभेत मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांवर ठपका ठेवून आपल्या पराभवाला आपणच जबाबदार असल्याचे कबूल केले आहे.
महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची झालेली दयनीय अवस्था आणि त्या अवस्थेत हक्काच्या मतदारसंघांमध्ये झालेला पराभव यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जुन्नर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद मोठी आहे. जागावाटपाच्या गोंधळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा ताकद असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावी लागली त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या पराभवमध्ये झाल्याचे चित्र दिसत आहे.
सत्यशील शेरकर ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने त्यांचा चेहरा चांगला असूनही निवडणुकीचा अनुभव नाही कार्यकर्त्यांचे फळी त्यांच्याकडे नव्हती. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारामध्ये जुन्नर मध्ये उत्साह आणि नियोजन होते ते विधानसभा निवडणुकीत दिसले नाही. त्याचा परिणाम अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांना जुन्नरकरांनी पसंती दिली
सत्यशील शेरकर यांनी मानले आभार
महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या आभार सभेत महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सत्यशील शेरकर यांनी आज उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व निर्माण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. मन लावून काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे शेरकर यांनी आभार मानले
शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनीही मानले आभार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जुन्नर तालुक्यात मजबूत असल्याने या पक्षाला उमेदवारी मिळाली असती तर माऊली खंडागळे सारखा निष्ठावंत शिवसैनिक आमदार म्हणून जुन्नर विधानसभेमध्ये दिसले असते. अशा आशयाची चर्चा दबक्या आवाजात मेळाव्यामध्ये आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत होती. सत्यशिल शेरकर यांच्याकडे असलेला कमी अनुभव त्या तुलनेत माऊली खंडागळे यांच्याकडे असलेला प्रदीर्घ राजकीय अनुभव त्याचा फायदा त्यांना झाला असता. सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी म्हणून माऊली खंडागळे यांना जुन्नरकरांनी स्वीकारले असते अशी उपस्थितांमध्ये चर्चा होती. या चर्चेला माऊली खंडागळे यांनी उत्तर देत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झाला त्या निर्णयाला अनुसरून आपण चांगल्या प्रकारे निवडणूक लढवून नियोजन केले या नियोजनामध्ये आपण कमी पडलो असलो तरी त्याचा दोष कोणालाही देता येणार नाही. असे म्हणत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले .
खासदार अमोल कोल्हे यांची उणीव
जुन्नर येथे विधानसभा निवडणूक सुरू असताना खासदार अमोल कोल्हे यांच्यावर राज्यातील स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी निश्चित होती. त्यामुळे ते मतदारसंघात कमी दिसले त्याचा परिणामही जुन्नर येथील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवाला जबाबदार आहे का ..? अशी चर्चा सध्या जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. खासदार कोल्हे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी सत्यशील शेरकर माऊली खंडागळे यांनी जीवाचे रान करून लोकसभेला त्यांच्या प्रचाराचे काम केले होते. विधानसभा निवडणुकीत मात्र खासदार कोल्हे यांनी विधानसभा मतदारसंघांमध्ये अगदी कमी वेळ दिल्यामुळे त्याचाही महाविकास आघाडीचा उमेदवारांच्या पराभवांमध्ये वाटा असल्याचे राजकीय विश्लेषक बोलत आहेत.
गावागावातुन
साहेबराव जगताप यांचे निधन
निंबवी ता. श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) : निंबवी (ता.श्रींगोदां जि अहिल्या नगर)येथील ठाणे परिवहन विभागातील निवृत्त कर्मचारी साहेबराव हौसेराम जगताप यांचे शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले.
साहेबराव जगताप हे शांत, मनमिळावू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या जाण्याने एक जेष्ठ मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी . मीना जगताप, मुलगी निलिमा खळे, रजनी मिरके, भाऊ बाजीराव जगताप, मुलगा आकाश जगताप असा परिवार आहे.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता निंबवी येथे जलदान विधी व पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समस्त जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

गावागावातुन
मंचर बस स्थानकाचा कायापालट: ५ कोटी ३६ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी
माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; बसस्थानक परिसर होणार चकाचक
मंचर (प्रतिनिधी):
आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंचर बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मोठी घोषणा झाली आहे. राज्याचे माजी मंत्री व आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंचर बस स्थानकाच्या विविध कामांसाठी ५ कोटी ३६ लाख २९ हजार ५५९ रुपयांच्या निधीला जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने ‘जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६’ अंतर्गत हे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.
मंजूर झालेली प्रमुख कामे आणि निधी:
मंचर बस स्थानकाच्या आवारात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पावसाळ्यात होणारा चिखल व धुळीचा त्रास कायमचा संपवण्यासाठी खालील दोन महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत:
१. सिमेंट काँक्रीटीकरण: बस स्थानक परिसरात सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ कोटी १६ लाख २९ हजार ९७० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे स्थानकाचा संपूर्ण परिसर सुसज्ज आणि स्वच्छ होणार आहे.
२.संरक्षक भिंत: स्थानकाच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला १९ लाख ९९ हजार ५८९ रुपये मंजूर झाले आहेत.
मंचर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. बस स्थानकाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन दिलीपरावजी वळसे पाटील यांनी या कामांसाठी विशेष निधी मिळावा म्हणून शासनाकडे आणि जिल्हा नियोजन समितीकडे विशेष आग्रह धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.
“मंचर बस स्थानकाचा परिसर सुसज्ज असावा ही नागरिकांची जुनी मागणी होती. या निधीमुळे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळतील. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.”
— दिलीपरावजी वळसे पाटील (माजी मंत्री तथा आमदार, आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ)
गावागावातुन
रांजणी येथे भव्य रोजगार मेळावा; टाटा मोटर्सकडून ५५ युवकांना जागेवर नियुक्तीपत्र
रांजणी (ता. आंबेगाव) – स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रांजणी येथे शनिवार, दिनांक २१ मार्च रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पंचायत समिती सदस्या सौ. प्रियांका केतन वाघ आणि केतन वाघ यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला होता.
या मेळाव्यात देशातील अग्रगण्य वाहननिर्मिती कंपनी टाटा मोटर्स सहभागी झाली होती. कंपनीकडून अरविंद काळे, गोवर्धन पांचाळ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे मुलाखत पथक उपस्थित राहून उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली.
या रोजगार मेळाव्यास सुमारे २५० हून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५५ पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना टाटा मोटर्सकडून जागेवरच नियुक्तीपत्र (जॉइनिंग लेटर) देण्यात आले. त्यामुळे अनेक युवकांच्या रोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
रांजणी व परिसरातील पंचक्रोशीत प्रथमच अशा प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याने स्थानिक युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका अध्यक्ष धोंडीभाऊ भोर, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रवीण थोरात, जिल्हा परिषद सदस्या प्रीती थोरात, तालुका कार्याध्यक्ष गणेश यादव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष केतन वाघ यांनी उपस्थित मान्यवर, टाटा मोटर्सचे अधिकारी तसेच सहभागी युवक-युवती यांचे आभार मानले.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक1 year agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
