Connect with us

गावागावातुन

महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचा पराभव.. या कारणांमुळे

Published

on

Share

जुन्नर प्रतिनिधी

जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा पराभव झाला.महायुतीचाही पराभव झाला. या ठिकाणावरून अपक्ष माजी आमदार शरद सोनवणे हे विजयी झाले. महाविकास आघाडीचे सत्यशील शेरकर व महायुतीचे आमदार अतुल बेनके यांनी विजयाचे दावे केले होते .ते फोल ठरले आहेत. गुरुवारी जुन्नर येथे पराभवाचे चिंतन करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक नारायणगाव येथे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा पराभव ईव्हीएम घोटाळ्यामुळे न होता सत्यशील शेरकर यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी नियोजन न केल्याने झाला .अशी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जाहीर रित्या बोलून दाखवली. राज्यात महाविकास आघाडी पराभवाचा ठपका ईव्हीएम ठेवत असताना जुन्नरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावी यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आग्रही होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी ताकद लावून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवली‌ राष्ट्रवादी काँग्रेसकडे
सक्षम उमेदवार नसल्याने त्यांनी काँग्रेस मधून सत्यशील शेरकर यांना घेऊन उमेदवारी दिली. सत्यशील शेरकर हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असल्याने ते शेतकऱ्यांशी जोडलेले आहेत. त्यांचा संपर्क आहे असे सांगितले जात होते. त्यामुळे ते विजय होतील असा विश्वास खासदार कोल्हे यांना होता. त्यांच्या विरोधात असणारे महायुतीचे उमेदवार अतुल बेनके ,अपक्ष शरद सोनवणे यांनीही प्रचाराचे नियोजन योग्य केलं होते. त्यांच्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचे नियोजन कमकुवत असल्याची तक्रार आज आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या आभार सभेत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

राज्यात महाविकास आघाडी ईव्हीएम वर ठपका ठेवत असताना जुन्नर विधानसभेत मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांवर ठपका ठेवून आपल्या पराभवाला आपणच जबाबदार असल्याचे कबूल केले आहे.

महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची झालेली दयनीय अवस्था आणि त्या अवस्थेत हक्काच्या मतदारसंघांमध्ये झालेला पराभव यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जुन्नर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद मोठी आहे. जागावाटपाच्या गोंधळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा ताकद असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावी लागली त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या पराभवमध्ये झाल्याचे चित्र दिसत आहे.

सत्यशील शेरकर ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने त्यांचा चेहरा चांगला असूनही निवडणुकीचा अनुभव नाही कार्यकर्त्यांचे फळी त्यांच्याकडे नव्हती. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारामध्ये जुन्नर मध्ये उत्साह आणि नियोजन होते ते विधानसभा निवडणुकीत दिसले नाही. त्याचा परिणाम अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांना जुन्नरकरांनी पसंती दिली

सत्यशील शेरकर यांनी मानले आभार

महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या आभार सभेत महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सत्यशील शेरकर यांनी आज उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व निर्माण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. मन लावून काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे शेरकर यांनी आभार मानले

शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनीही मानले आभार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जुन्नर तालुक्यात मजबूत असल्याने या पक्षाला उमेदवारी मिळाली असती तर माऊली खंडागळे सारखा निष्ठावंत शिवसैनिक आमदार म्हणून जुन्नर विधानसभेमध्ये दिसले असते. अशा आशयाची चर्चा दबक्या आवाजात मेळाव्यामध्ये आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत होती. सत्यशिल शेरकर यांच्याकडे असलेला कमी अनुभव त्या तुलनेत माऊली खंडागळे यांच्याकडे असलेला प्रदीर्घ राजकीय अनुभव त्याचा फायदा त्यांना झाला असता. सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी म्हणून माऊली खंडागळे यांना जुन्नरकरांनी स्वीकारले असते अशी उपस्थितांमध्ये चर्चा होती. या चर्चेला माऊली खंडागळे यांनी उत्तर देत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झाला त्या निर्णयाला अनुसरून आपण चांगल्या प्रकारे निवडणूक लढवून नियोजन केले या नियोजनामध्ये आपण कमी पडलो असलो तरी त्याचा दोष कोणालाही देता येणार नाही. असे म्हणत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले .

खासदार अमोल कोल्हे यांची उणीव

जुन्नर येथे विधानसभा निवडणूक सुरू असताना खासदार अमोल कोल्हे यांच्यावर राज्यातील स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी निश्चित होती. त्यामुळे ते मतदारसंघात कमी दिसले त्याचा परिणामही जुन्नर येथील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवाला जबाबदार आहे का ..? अशी चर्चा सध्या जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. खासदार कोल्हे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी सत्यशील शेरकर माऊली खंडागळे यांनी जीवाचे रान करून लोकसभेला त्यांच्या प्रचाराचे काम केले होते. विधानसभा निवडणुकीत मात्र खासदार कोल्हे यांनी विधानसभा मतदारसंघांमध्ये अगदी कमी वेळ दिल्यामुळे त्याचाही महाविकास आघाडीचा उमेदवारांच्या पराभवांमध्ये वाटा असल्याचे राजकीय विश्लेषक बोलत आहेत.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सलग चौथा बिबट्या जेरबंद

Published

on

Share

वळती प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात वनविभागाने मोठी कारवाई करत महिनाभरात सलग चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पवार मळा परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील प्रसिद्ध थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेकडील पवार मळा परिसरात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एक मादी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एक बछडा पिंजऱ्यात अडकला. पुढे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री आणखी एक मादी जेरबंद झाली. तर २ मार्च रोजी अंदाजे १५ महिन्यांचा नर बछडा देखील पिंजऱ्यात सापडला. या सर्व घटनांची माहिती नागापूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला दिली होती.


मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी फुलमाळी व वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी संबंधित बिबट्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून नागापूर परिसरात जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सलग चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading

गावागावातुन

दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.

Published

on

Share

पारनेर दि.१० प्रतिनिधी

जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.

अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.

तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.

आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada