गावागावातुन
महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचा पराभव.. या कारणांमुळे
जुन्नर प्रतिनिधी
जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा पराभव झाला.महायुतीचाही पराभव झाला. या ठिकाणावरून अपक्ष माजी आमदार शरद सोनवणे हे विजयी झाले. महाविकास आघाडीचे सत्यशील शेरकर व महायुतीचे आमदार अतुल बेनके यांनी विजयाचे दावे केले होते .ते फोल ठरले आहेत. गुरुवारी जुन्नर येथे पराभवाचे चिंतन करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक नारायणगाव येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा पराभव ईव्हीएम घोटाळ्यामुळे न होता सत्यशील शेरकर यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी नियोजन न केल्याने झाला .अशी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जाहीर रित्या बोलून दाखवली. राज्यात महाविकास आघाडी पराभवाचा ठपका ईव्हीएम ठेवत असताना जुन्नरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे.
जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळावी यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आग्रही होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी ताकद लावून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवली राष्ट्रवादी काँग्रेसकडे
सक्षम उमेदवार नसल्याने त्यांनी काँग्रेस मधून सत्यशील शेरकर यांना घेऊन उमेदवारी दिली. सत्यशील शेरकर हे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असल्याने ते शेतकऱ्यांशी जोडलेले आहेत. त्यांचा संपर्क आहे असे सांगितले जात होते. त्यामुळे ते विजय होतील असा विश्वास खासदार कोल्हे यांना होता. त्यांच्या विरोधात असणारे महायुतीचे उमेदवार अतुल बेनके ,अपक्ष शरद सोनवणे यांनीही प्रचाराचे नियोजन योग्य केलं होते. त्यांच्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचे नियोजन कमकुवत असल्याची तक्रार आज आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या आभार सभेत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
राज्यात महाविकास आघाडी ईव्हीएम वर ठपका ठेवत असताना जुन्नर विधानसभेत मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांवर ठपका ठेवून आपल्या पराभवाला आपणच जबाबदार असल्याचे कबूल केले आहे.
महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची झालेली दयनीय अवस्था आणि त्या अवस्थेत हक्काच्या मतदारसंघांमध्ये झालेला पराभव यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जुन्नर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद मोठी आहे. जागावाटपाच्या गोंधळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा ताकद असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावी लागली त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या पराभवमध्ये झाल्याचे चित्र दिसत आहे.
सत्यशील शेरकर ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने त्यांचा चेहरा चांगला असूनही निवडणुकीचा अनुभव नाही कार्यकर्त्यांचे फळी त्यांच्याकडे नव्हती. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारामध्ये जुन्नर मध्ये उत्साह आणि नियोजन होते ते विधानसभा निवडणुकीत दिसले नाही. त्याचा परिणाम अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांना जुन्नरकरांनी पसंती दिली
सत्यशील शेरकर यांनी मानले आभार
महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या आभार सभेत महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सत्यशील शेरकर यांनी आज उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व निर्माण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. मन लावून काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे शेरकर यांनी आभार मानले
शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनीही मानले आभार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जुन्नर तालुक्यात मजबूत असल्याने या पक्षाला उमेदवारी मिळाली असती तर माऊली खंडागळे सारखा निष्ठावंत शिवसैनिक आमदार म्हणून जुन्नर विधानसभेमध्ये दिसले असते. अशा आशयाची चर्चा दबक्या आवाजात मेळाव्यामध्ये आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत होती. सत्यशिल शेरकर यांच्याकडे असलेला कमी अनुभव त्या तुलनेत माऊली खंडागळे यांच्याकडे असलेला प्रदीर्घ राजकीय अनुभव त्याचा फायदा त्यांना झाला असता. सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी म्हणून माऊली खंडागळे यांना जुन्नरकरांनी स्वीकारले असते अशी उपस्थितांमध्ये चर्चा होती. या चर्चेला माऊली खंडागळे यांनी उत्तर देत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झाला त्या निर्णयाला अनुसरून आपण चांगल्या प्रकारे निवडणूक लढवून नियोजन केले या नियोजनामध्ये आपण कमी पडलो असलो तरी त्याचा दोष कोणालाही देता येणार नाही. असे म्हणत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले .
खासदार अमोल कोल्हे यांची उणीव
जुन्नर येथे विधानसभा निवडणूक सुरू असताना खासदार अमोल कोल्हे यांच्यावर राज्यातील स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी निश्चित होती. त्यामुळे ते मतदारसंघात कमी दिसले त्याचा परिणामही जुन्नर येथील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवाला जबाबदार आहे का ..? अशी चर्चा सध्या जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. खासदार कोल्हे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी सत्यशील शेरकर माऊली खंडागळे यांनी जीवाचे रान करून लोकसभेला त्यांच्या प्रचाराचे काम केले होते. विधानसभा निवडणुकीत मात्र खासदार कोल्हे यांनी विधानसभा मतदारसंघांमध्ये अगदी कमी वेळ दिल्यामुळे त्याचाही महाविकास आघाडीचा उमेदवारांच्या पराभवांमध्ये वाटा असल्याचे राजकीय विश्लेषक बोलत आहेत.
गावागावातुन
व्हर्लपूल ऑफ इंडिया लि च्या वरिष्ठ व्यस्थापक यांची केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई येथील जल संसाधन विकास उपक्रमांना सदिच्छा भेट
शिरूर / आंबेगाव: उपजीविका विकासासाठी जल संसाधन विकास ह्या प्रकल्पा अंतर्गत शिरूर तालुक्यात लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन व व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 07 गावा मध्ये तसेच इलीका पी बी व्हर्लपूल आप्लायन्सेस प्रा. लि अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील 06 गावा मध्ये सिमेंट नाला बंधारा, माती बंधारा दुरुस्ती व गाळ काढणे, सूक्ष्म व तुषार सिंचन व रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवणे असे उपक्रम राबविले जात आहेत
व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापक सुश्री श्वेता श्रीवास्तव व लुपीन फाउंडेशन चे वर्क साईड हेड श्री वेंकटेश सर यांनी शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील जल संसाधन विकास प्रकल्पातील केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई या गावातील विविध उपक्रमांना भेट दिली. गावातील शेतकरी व ग्राम पंचायत सदस्य यांच्याशी संवाद साधून उपक्रमांच्या माध्यमातून होणाऱ्या व झालेल्या परिणामांना समजावून घेण्यात आले तसेच त्यांनी मार्गदर्शन केले.
सुश्री श्वेता यांनी समुदायाच्या मजबूत सहभागाबद्दल आणि लाभार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात लुपिन फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
सदर भेटी दरम्यान केंदूर च्या विद्यमान सरपंच सौ. मंगलताई पऱ्हाड, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, माजी सरपंच सूर्यकांत थिटे, भाऊसाहेब थिटे, लोणीचे माजी सरपंच उद्धव लंके, अशोक आदक, बाळशीराम वाळुंज तसेच शेतकरी उपस्थित होते.
सदर प्रकल्प भेटीचे नियोजन लुपिन फाउंडेशन चे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनात शिरूर,आंबेगाव व जुन्नर चे तालुका व्यवस्थापक प्रताप मोटे व बाळासाहेब बोराडे यांनी केले.
गावागावातुन
भीमाशंकरचा एफ.आर.पी.नुसार रु. ३,२७३/- प्रती मे.टन दर
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. रक्कम रु. ३२७२.१४ येत असून त्यानुसार रु. ३२७३/- प्रती मे.टन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन पंधरवड्याकरीता अदा केलेला प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे.टन वजा जाता उर्वरित रु. १७३/- प्रती मे.टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार शेतक-यांच्या बँक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, मा. उच्च न्यायालय व शासनाचे निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे. त्यानुसार गाळप हंगाम २०२५-२६ करीता देय एफ.आर.पी. रु.३२७२.१४ प्रती मे.टन येत आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसास प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे. टनाप्रमाणे अदा केलेला आहे. प्रथम हप्ता अदा करतेवेळी रक्कम उपलब्धतेनुसार एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार इथेनॉल विक्री, इथेनॉल व्याज परतावा व आयकर परताव्याची रक्कम जमा झाल्याने एफ.आर.पी.चे उर्वरित पेमेंटसाठी रक्कम उपलब्ध झाली आहे.
गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर २ लाख १२ हजार ५८६ मे.टन ऊस गाळप झाले असून रु. १७३/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बॅंक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असून यापुढे होणारे पंधरवडा ऊस पेमेंट रु. ३२७३/- प्रती मे.टन प्रमाणे वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे. तरी उस उत्पादक शेतक-यांनी आपला उत्पादित केलेला ऊस भीमाशंकर कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले
गावागावातुन
फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर दि.१४ प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.
निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन1 year agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन1 year agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक10 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
