Connect with us

गावागावातुन

पारनेरमध्ये मस्साजोगची पुनरावृत्ती ..?

Published

on

Share

अपहरण करून बेदम मारहाण झाल्याची तक्रार,

नगरसेवक युवराज पठारेसह पाच जणांविरोधात गुन्हा

पारनेर : प्रतिनिधी

     गणपती देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केल्याच्या रागातून पारनेर नगरपंचायतीचा नगरसेवक युवराज पठारे व इतरांनी देवस्थान समितीच्या सदस्याचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याची घटना गुरूवारी घडली. मस्साजोग प्रकरणाला साजेशा या घटनेमुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली  आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी नगरसेवक युवराज पठारे हा भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पारनेरचे आमदार अजित पवार गटाचे आमदार काशिनाथ दाते यांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे.

    यासंदर्भात सुनिल भाऊसाहेब चौधरी रा. डिकसळ, हल्ली राहणार गणपती फाटा, गौरीनंदन मंगल कार्यालय, पारनेर यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले  आहे. की, चौधरी हे लोकजागृती सामाजिक संस्थेमध्ये सामाजिक काम करतात. पारनेर शहरातील गणपती देव देवस्थानचे ते सदस्य आहेत. पारनेर शहरात पारनेर-सुपा रस्त्यालगत या देवस्थानची तब्बल ३६ एकर जमीन आहे. 

    फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे की, देवस्थानच्या जागेवर युवराज कुंडलीक पठारे, नामदेव पठारे व बाळासाहेब पठारे व इतरांनी अतिक्रमण केलेले आहे. अतिक्रमण काढावे म्हणून सन २०१८ मध्ये देवस्थानच्या ट्रस्टींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होउन न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पारनेर नगरपंचायतकडे हे  अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. सात दिवसांपूर्वी नगरपंचायतीच्या वतीने अतिक्रमणधारकांना या नोटीस बजाण्यात आल्या होत्या. नोटीस बजावल्यानंतर पारनेरच्या न्यायालयात युवराज पठारे याची भेट झाली त्यावेळी त्याने आपणास भेटून यात पडू नकोस नाहीतर तुला जीवे मारून अशी धमकी दिली होती. असे सुनिल चौधरी यांनी फिर्यादीमध्ये नमुद केले आहे. 

       सात दिवसांची नोटीस देण्यात येऊनही अतिक्रमण न काढल्याने गुरूवार दि.२६ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सचिव सुधीर देवीदास पाठक यांच्या सांगण्यावरून सुनील चौधरी हे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्याकडे गेले होते. शिपाई यांच्या दालनामध्ये अतिक्रमणासंदर्भात चर्चा सुरू असताना युवराज पठारे व इतर दोन इसम तिथे आले व तुझा इथे येण्याचा काय संबंध ? तु यामध्ये पडू नको नाहीतर मी तुला जीवे मारील अशी धमकी मुख्याधिकारी शिपाई यांच्यासमोर युवराज पठारे याने दिल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. 

       युवराज पठारे याच्या धमकीनंतर सुनिल चौधरी याने मी देवस्थानचा ट्रस्टी आहे असे सांगताच मुख्याधिकारी शिपाई यांच्यासमक्ष मी याला आता उचलून घेऊन जाणार आहे, त्याला तिकडेच मारून टाकतो, आज याचा विषय संपवितो अशी धमकी देत युवराज याने सुनिल याची गचांडी धरली तर इतर दोघांनी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांसमक्ष उचलून कार्यालयाबाहेर आणले. 

     सुनिल चौधरी यास कार्यालयाबाहेर आणल्यानंतर तिथे उभ्या असलेल्या काळया रंगाच्या थार जीपमध्ये बसविण्यात आले. त्याला युवराज पठारेसह इतरांनी जीपमध्येच मारहाण करण्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर जीप युवराज पठारे याच्या घराकडे नेण्यास चालकाला सांगण्यात आले. पठारे यांच्या घरी गेल्यानंतर एका खोलीत कोंडून मारहाण करण्यास सुरूवात करण्यात आली. जवळचा मोबाईल काढून पोलीसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता युवराज याने मोबाईल हिसकावून घेतला. मोटारसायकलची चावी, पैशांचे पाकीटही काढून घेण्यात येऊन युवराज कुंडलिक पठारे, त्याचा भाऊ यशवंत उर्फ आबा कुंडलिक पठारे, चुलते बाळासाहेब पठारे, युवराजचे वडील कुंडलिक पठारे व युवराजची पत्नी व इतर सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली. 

      मारहाण सुरू असताना युवराज पठारे हा याला जिवंत सोडू नका असे म्हणत होता. मारहाणीत सुनिल चौधरी याच्या तोंडास, डोक्यास, उजवा हात, उजव्या पायाचा गुढगा, पोटरी, छाती व पाठीस मार लागलेला आहे. मारहाणीनंतर युवराज पठारे याने तुझा वकील भाऊ उन्मेश हा आमच्या विरोधात कोर्टात केसेस लढतो आता तुला व तुझ्या भावालाही संपवतो असा दम दिल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. 

     सुनिल चौधरी याचे अपहरण करून त्यास मारहाण सुरू असल्याची माहीती पोलीसांना समजल्यानंतर पोलीसांनी युवराज पठारे याच्या घरी येत सुनिल चौधरी यास ताब्यात घेण्यात आले. पोलीस आल्यानंतर याने घरात चोरी केली आहे त्याला घेऊन जा असे पठारे परिवारातील सदस्य सांगत होते असेही या फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.
Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सलग चौथा बिबट्या जेरबंद

Published

on

Share

वळती प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात वनविभागाने मोठी कारवाई करत महिनाभरात सलग चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पवार मळा परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील प्रसिद्ध थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेकडील पवार मळा परिसरात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एक मादी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एक बछडा पिंजऱ्यात अडकला. पुढे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री आणखी एक मादी जेरबंद झाली. तर २ मार्च रोजी अंदाजे १५ महिन्यांचा नर बछडा देखील पिंजऱ्यात सापडला. या सर्व घटनांची माहिती नागापूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला दिली होती.


मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी फुलमाळी व वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी संबंधित बिबट्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून नागापूर परिसरात जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सलग चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading

गावागावातुन

दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.

Published

on

Share

पारनेर दि.१० प्रतिनिधी

जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.

अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.

तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.

आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada