Connect with us

महाराष्ट्र

मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू , काही इच्छुक हवेत. ..?

Published

on

Share


मंचर प्रतिनिधी

नुकत्याच विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या असून आगामी काळात त सहकार क्षेत्रातील निवडणुका जाहीर होतील आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होण्याची कुणकुण लागली की काय..? त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

पुणे जिल्ह्यातील मंचर नगरपंचायत निवडणूक लवकरच जाहीर होईल अशी चर्चा आहे त्या दृष्टीने इच्छुकांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मंचर शहरांमधून महायुतीचे उमेदवार माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे .

त्यामुळे महायुतीकडून अनेक इच्छुक दावे करत आहेत. तर महाविकास आघाडीकडून कमी मतदान पडल्याने इच्छुकांची संख्या कमी आहे. महायुतीकडून भाजपाचे किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय थोरात राष्ट्रवादी काँग्रेसकडुन सुहास बाणखेले माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बेंडे पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप उर्फ लक्ष्मण थोरात भक्ते पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य धनेश मोरडे हे इच्छुक आहेत.तर महाविकास आघाडीकडुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडुन माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले,माजी सरपंच शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता गांजाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत बाणखेले, काँग्रेस पक्षाकडून तालुकाध्यक्ष राजु इनामदार इच्छुक आहेत.

मंचर नगरपंचायत निवडणुका कधी लागणार हे अद्याप निश्चित नसले तरी नगराध्यक्ष होण्यासाठी आप आपल्या पक्षांच्या नेत्यांकडे सेटिंग लावण्यासाठी कार्यकर्ते वेगवेगळ्या आयडिया लढवत आहेत . नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे काही उमेदवार हवेत आहेत.. तर काही उमेदवार जमिनीवर राहुन मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत.

महायुतीकडुन नगराध्यक्ष पदाचे प्रबळ इच्छुक असणारे भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय थोरात यांनी कामाला सुरुवात केली आहे .ते लोकांची कामे करुन आपला प्रचार करत आहेत.महायुतीची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी संजय थोरात यांना मिळाल्यास ते भाजपाचा झेंडा मंचर नगरपंचायतवर फडकवु शकतात..? तर महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे दुसरे इच्छुक स्वप्निल बेंडे पाटील यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा शब्द दिला आहे का? याबाबतही चर्चा सुरू आहे.

महायुतीकडुन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी तिसरे इच्छुक सुहास बाणखेले यांचेही काम सुरू आहे. सुहास बाणखेले नेहमीच लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असतात. महायुतीचे चौथे इच्छुक सुनिल बाणखेले यांनीही जुळवा जुळव सुरू केली आहे.

तर महाविकास आघाडीकडुन माजी सरपंच शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता गांजाळे व शिवसेनेचे नेते माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडुन मुख्य दावेदार आहेत. असे असले तरी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांना पडलेली कमी मते आणि निसटत्या मतांनी देवदत्त निकम यांचा झालेला पराभव यांचा फटका शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवारांना बसणार असल्याची चर्चा मंचर शहरांमध्ये चौकाचौकांमध्ये होताना दिसते आहे.

शिवसैनिक ठरवणार मंचरचा नगराध्यक्ष..?

शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या मंचर शहरामध्ये लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात जोमाने काम करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत देवदत्त निकम यांचा प्रचार जोमाने करताना दिसले नाहीत. त्यामुळे देवदत्त निकम यांना मंचर शहरांमधून फटका बसला अशी चर्चा आहे. त्यामुळे नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत या निवडणुकीत कोणत्या इच्छुकांने काय भूमिका घेतली त्यावर त्यांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे.असे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील निवडून यावे यासाठी प्रयत्न करणारे शिंदेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक अमोल कोल्हे यांना मंचर शहरांमधून चांगले मतदान झाल्याने अमोल कोल्हे यांचे काम करणार्या, कार्यकर्त्यांवर नाराज आहेत.


तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम निवडून यावे यासाठी प्रयत्न करणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक यावेळी मंचर शहरांमध्ये देवदत्त निकम यांना कमी मते मिळाल्याने निकम यांच्याशी दगाफटका करणार्या कार्यकर्त्यांवर नाराज आहेत. हे दोन्ही शिवसेनेतील नाराज मंचरचा नगराध्यक्ष ठरवताना योग्य ठिकाणी मतदान करतील अशी चर्चा आहे.दोनही शिवसेनेचे शिवसैनिक ज्या उमेदवाराला मतदान करतील तोच उमेदवार निवडून येईल अशी राजकीय गणिते मंचर शहरांमध्ये सध्या तरी दिसत आहेत.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सलग चौथा बिबट्या जेरबंद

Published

on

Share

वळती प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात वनविभागाने मोठी कारवाई करत महिनाभरात सलग चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पवार मळा परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील प्रसिद्ध थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेकडील पवार मळा परिसरात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एक मादी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एक बछडा पिंजऱ्यात अडकला. पुढे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री आणखी एक मादी जेरबंद झाली. तर २ मार्च रोजी अंदाजे १५ महिन्यांचा नर बछडा देखील पिंजऱ्यात सापडला. या सर्व घटनांची माहिती नागापूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला दिली होती.


मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी फुलमाळी व वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी संबंधित बिबट्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून नागापूर परिसरात जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सलग चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading

गावागावातुन

दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.

Published

on

Share

पारनेर दि.१० प्रतिनिधी

जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.

अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.

तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.

आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada