वाल्मीक कराड सापडला पण… मयत सरपंच संतोष देशमुख यांना मृत्यूनंतर ही न्याय मिळेल का?

Share

पुणे प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.आणि त्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण आणि समाजकारण दोन्हीही ढवळून निघाले आहे. पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्यापही देशमुख यांचे मारेकरी सापडले नाहीत. या मारेकरांचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला असताना आज वाल्मीक कराड सीआयडीकडे पुणे येथे हजर झाले आहेत

वाल्मीक कराड हेच मयत संतोष देशमुख यांचे मारेकरी आहेत का? जनता विचारते आहे? कारण आमदार सुरेश धस यांनी अप्रत्यक्षरीत्या वाल्मीक कराड यांच्यावरच आरोप केले आहेत. मात्र वाल्मीक कराड यांच्यावर पोलिस स्टेशनला फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

त्यामुळे संतोष देशमुख यांच्या खुनाशी संबंध नाही. असा बीडमधील एक मतप्रवाह आहे. तर दुसरा मतप्रवाह वाल्मीक कराड हेच या खुनाचे सूत्रधार आहेत .आणि त्यामुळेच ते पोलिसांपासून दूर पळत होते असा आहे .


आज वाल्मीक कराड यांनी पुणे शहरात सीआयडी कार्यालयात स्वतः आत्मसमर्पण केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गृह विभाग वाल्मीक कराड यांची कसून चौकशी करून संतोष देशमुख यांचे यांच्या खुनातील मुख्य सूत्रधार आहेत का याचा शोध घेतील आणि वाल्मीक कराड यांच्यावर दाखल असलेली खंडणीचा गुन्हा याबाबतही चौकशी करून पोलीस वाल्मीकरांवर योग्य ती कारवाई करतीलच अशी अपेक्षा बाळगू या..


वाल्मीक कराड याला सापडणं पोलिसांना का शक्य झालं नाही??
*सरकारमधील काही मंत्र्यांनी वाल्मीक कराडला जाणीवपूर्वक पोलिसांपासून दूर ठेवले का?

*मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब न्यायालयात गेल्याने वाल्मीक कराड पोलिसात हजर झाला आहेत का?
*आणि संतोष देशमुख यांना मृत्यूनंतर ही न्याय मिळेल का? यावर या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पुढील काळात आपणाला वाटच पहावी लागेल…

Related Articles

ताज्या बातम्या