पर्यटन
परभणी येथे संविधान प्रतीकृतीच्या झालेल्या विटंबनेचा राजगुरुनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध
राजगुरुनगर( प्रतिनिधी )
परभणी येथे संविधान प्रतीकृतीच्या झालेल्या विटंबनेचा व
त्यानंतर झालेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यावर प्रशासनाने केलेल्या भ्याड लाठीहल्ला व कोंबिंग ऑपरेशन विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला
वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष विक्रांत आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुका कार्याध्यक्ष दत्ता कांबळे युवा तालुका अध्यक्ष दत्ता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर येथे भव्य रास्ता रोको व निषेध सभा घेण्यात आली. परभणी येथील सरकार व पोलीस प्रशासन यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना दत्ता कांबळे सर्व नवनिर्वाचित आमदार व खासदार यांच्यावर प्रखर शब्दात टीका केली . काही आमदार
शपथ देताना जय भीम जय संविधान म्हणतात परंतु आत्ता मात्र सर्व मूग गिळून गप्प आहेत. परभणीच्या विषयावरती एकही आमदार खासदार बोलायला तयार नाही सर्व सत्ताधारी व विरोधकांच्या मुह मे राम बगल में सुरी ही वृत्ती आहे असे म्हणत जाहीर निषेध केला .
जिल्हा अध्यक्ष विक्रांत आल्हाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जातीयवादी असल्याची टीका करून मुख्यमंत्री यांना संविधान बदलून मनुस्मृती आणायची आहे का? असा प्रश्न उपस्थित केला.व मुख्यमंत्री यांच्यावर कडक शब्दात टीका केली.
जिल्हा युवा उपाध्यक्ष रवींद्र रांधवे म्हणाले एकी नसल्याने हे भ्याड हल्ले होत आहेत एकत्र येऊन बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करा व एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले. खेड तालुका युवा अध्यक्ष दत्ता सोनवणे म्हणाले आम्ही रस्त्यावरती उतरतो त्यात आमचा स्वार्थ नाही तर आम्ही समाजासाठी काम करतो परंतु त्याला म्हणाव असा प्रतिसाद मिळत नाही खरंतर समाजाने हजारोनच्या संख्येने उपस्थित राहणे गरजेचे होते अशी खंत व्यक्त केली
उपाध्यक्ष दिनेश गोतारने काँग्रेसचे भास्कर तुळवे खेड पुतळा संवर्धन समितीचे अध्यक्ष अशोक कडलक यांनी आपल्या मनोगतातून जाहीर निषेध केला यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती उतरून रस्ता रोको करत परभणी येथे झालेल्या कृत्याचा जाहीर निषेध केला यावेळी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
गावागावातुन
मंचर बस स्थानकांमध्ये खड्डेच खड्डे, प्रवाशांचे हाल
मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील मंचर बस स्थानकांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
मॉन्सूनपूर्व पावसाचे आंबेगाव तालुक्यात जोरदार आगमन झाल्याने . या पावसाने मंचर बसस्थानक आणि परिसरात चिखल आणि जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामधून मार्गक्रमण करणे प्रवाशांसाठी जिकिरीचे झाले आहे.यामध्ये एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

बसस्थानकाच्या परिसरातील कामे करताना गटारे बुजली गेल्याने पाण्याचा निचरा न होता चिखल व खड्डे तयार होत आहेत .यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केली आहे. दहा-बारा दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे.हे पाणी प्रवाशांच्या कपड्यांवर उडत आहे.त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आंबेगाव
आंबेगाव तालुक्यातील मंचर हे तालुक्याचे केंद्रबिंदू असून तसेच या बस स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. शालेय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी परिसरातील गावातील शेकडो विद्यार्थी येथील बस स्थानकात दररोज येत असतात.
पावसाळ्याच्या दिवसात बसस्थानकातील या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने प्रवाशांना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खड्ड्यातून वाट शोधावी लागते आहे . बस स्थानकात प्रवेश करताना अनेक बसचालकांना खड्डा वाचविताना कसरत करावी लागते आहे. परिवहन विभागाने याबाबत लक्ष घालून बस स्थानकातील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी व तालुक्यातील नागरिकांनी केली आहे

गावागावातुन
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची देवदत्त निकम यांनी केली पहाणी
मंचर, प्रतिनिधी २७ मे २०२५ – आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. २६ मे रोजी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर, खडकवाडी आणि पोंदेवाडी या गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

या परिस्थितीची माहिती मिळताच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी २७ मे रोजी सकाळी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर आणि खडकवाडी या गावांचा दौरा केला. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निकम यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची विनंती केली.

अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे, फळबागांचे आणि तरकारी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, विजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
या पाहणी दौऱ्यात लोणीचे माजी सरपंच दिलीप वाळुंज, दीपक वाळुंज, अविनाश वाळुंज, नवनाथ वाळुंज, पंढरीनाथ गोपाळे, अर्जुन वाळुंज आणि राजेश वाळुंज उपस्थित होते.

या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
गावागावातुन
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची देवदत्त निकम यांनी केली पहाणी
मंचर, २७ मे २०२५ – आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. २६ मे रोजी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर, खडकवाडी आणि पोंदेवाडी या गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या परिस्थितीची माहिती मिळताच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी २७ मे रोजी सकाळी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर आणि खडकवाडी या गावांचा दौरा केला. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निकम यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची विनंती केली.

अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे, फळबागांचे आणि तरकारी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, विजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

या पाहणी दौऱ्यात लोणीचे माजी सरपंच दिलीप वाळुंज, दीपक वाळुंज, अविनाश वाळुंज, नवनाथ वाळुंज, पंढरीनाथ गोपाळे, अर्जुन वाळुंज आणि राजेश वाळुंज उपस्थित होते.
या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक1 year agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
