अकोले प्रतिनिधी
ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीनेही एल्गार पुकारला आहे. इ व्ही एम बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे.ईव्हीएम वर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. सुप्रीम कोर्टाने जी याचिका खारीज केली ती न्यायाला धरून नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, सुप्रीम कोर्टाला कुठली सिस्टीम लागू करावी किंवा लागू करू नये याबाबत अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर नोंदणीकृत पक्षांना कुठली सिस्टीम पाहिजे किंवा नाही त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असता तर मी मान्य केले असते.असे आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
तर काँग्रेसने देशव्यापी यात्रा काढण्याची अजिबात गरज नाही. पार्लमेंटने अनेक रस्ते पक्षांना मोकळे करून दिलेले आहेत. पाहिजे ती सिस्टीम ते वापरू शकतात. जर काँग्रेस ने सर्वांना बोलावलं नाही तर आम्ही पुढाकार घेऊ आणि सर्व पक्षांकडे पर्याय ठेऊ . अशी भुमिका आंबेडकर यांनी मांडली मतदार वाढी संदर्भात सुप्रीम कोर्टात जाणारे हे भाजपचे पिल्लू असल्याचे म्हटले आहे.
ईव्हीएम विरोधात एकत्र येण्यासाठी काँग्रेस ने पुढाकार नाही घेतला तर आम्ही पुढाकार घेऊ 10 तारखेपर्यंत वाट पाहू..?यावर चर्चा तरी करा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तर महापरिनिर्वाण दिना मूळे रेल्वेने जे प्लॅटफॉर्म तिकीट बंद केले आहे .त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले त्यांनी देशाचा मोठा रेव्हेन्यू बुडवला आहे
