मनोरंजन
२०० प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकरीचा लाभ, खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश
नगर : प्रतिनिधी
राहुरी कृषि विद्यापीठासाठी जमिनी अधिगृहीत करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचा मार्ग शासन निर्णयामुळे मोकळा झाला असून या निर्णयामुळे राहुरी व परिसरातील २०० तरूणांना नोकरीचा लाभ मिळणार आहे. याप्रकरणी खा. नीलेश लंके हे गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते.
या प्रकल्पग्रस्तांनी दाखल्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी शाहूराव मोरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जाचक अटी लादून प्रकल्पग्रस्तांचे दाखल फेटाळून लावले होते. दोन वर्षांपूर्वी राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर प्रभाकर पवार, विकास भिंगारदे, भूषण शेंडगे, जगदीश अडसुरे,कुणाल कर्डक, आरबाज शेख, रवींद्र गिरगुणे आदींनी तत्कालीन आमदार नीलेश लंके यांच्याकडे या प्रश्नाचे गाऱ्हाणे मांडले.
लंके यांनी याप्रश्नी तात्काळ तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रश्नावर तोडगा काढण्याचे साकडे घातले होते. खा. लंके यांच्या पाठपुराव्यादरम्यान या प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र शासन आदेश काढावा लागेल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.
राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर खा. नीलेश लंके यांनी नव्या सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्याशी चर्चा करून या प्रश्नात तोडगा काढण्याची मागणी केली होती. मंत्री जाधव पाटील यांना तसे निवेदनही खा. लंके यांनी सादर केले होते.
या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी शासन निर्णय पारीत केला असून त्यामुळे राहुरी व परिसरातील सुमारे दोनशे प्रकल्पग्रस्तांना आता नोकरीची संधी मिळणार आहे.
या प्रकल्पग्रस्तांना मिळाले दाखले !
खा. नीलेश लंके यांच्या प्रयत्नानंतर शासन निर्णय पारीत झाल्यानंतर दिपक भिंगारदे, विकास भिंगारदे, असिफ शेख, भुषण शेंडगे, शुभम गायकवाड, सोमनाथ मगर, कुणाल कर्डक, नितीन ताकटे, ॠषीकेश देशमुख, विशाल पवार, शैलेश धोंडे, खेडेकर, श्रीकांत पवार, दादासाहेब भिंगारदे, बाळू भिंगारदे, दर्शन गाढवे, प्रविण देठे, दिनेश शेंडगे, प्रविण गिरगुणे, अमोल गिरगुणे.
गावागावातुन
पोंदेवाडी येथे खरीप हंगाम पिक मेळावा संपन्न.
मंचर
पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथे खरीप पूर्व हंगाम शेतकरी मेळावा
( दि. 12 ) रोजी संपन्न झाला. कृषी संकल्प अभियान अंतर्गत खरीप हंगाम पिक नियोजन व शेतकरी मेळावा कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. यावेळी खरीप हंगाम पीक नियोजन व प्रमुख पीक व भाजीपाला पिक विषयक मार्गदर्शन, माती परीक्षण व खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, एकात्मिक कीड व खत व्यवस्थापन बायोचार विषयक मार्गदर्शन के व्ही के नारायणगावचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे सर , राष्ट्रीय द्राक्ष अनु साधन केंद्राच्या शास्त्रज्ञ कविता मॅडम यांनी केले.

तसेच महात्मा गांधी रोगार हमी योजना, अग्रोस्टिक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढणे, पी एम किसान, आणि इतर कृषी विषयक योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी प्रसन्न जाधव यांनी दिली. यावेळी मा. सरपंच संदीप पोखरकर, महेंद्र पोखरकर कृषिविभागाचे सहाय्यक कृषि अधिकारी शेळके निशा व गावांतील शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
गावागावातुन
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची देवदत्त निकम यांनी केली पहाणी
मंचर, प्रतिनिधी २७ मे २०२५ – आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. २६ मे रोजी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर, खडकवाडी आणि पोंदेवाडी या गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

या परिस्थितीची माहिती मिळताच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी २७ मे रोजी सकाळी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर आणि खडकवाडी या गावांचा दौरा केला. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निकम यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची विनंती केली.

अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे, फळबागांचे आणि तरकारी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, विजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
या पाहणी दौऱ्यात लोणीचे माजी सरपंच दिलीप वाळुंज, दीपक वाळुंज, अविनाश वाळुंज, नवनाथ वाळुंज, पंढरीनाथ गोपाळे, अर्जुन वाळुंज आणि राजेश वाळुंज उपस्थित होते.

या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
गावागावातुन
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची देवदत्त निकम यांनी केली पहाणी
मंचर, २७ मे २०२५ – आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. २६ मे रोजी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर, खडकवाडी आणि पोंदेवाडी या गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या परिस्थितीची माहिती मिळताच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी २७ मे रोजी सकाळी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर आणि खडकवाडी या गावांचा दौरा केला. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निकम यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची विनंती केली.

अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे, फळबागांचे आणि तरकारी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, विजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

या पाहणी दौऱ्यात लोणीचे माजी सरपंच दिलीप वाळुंज, दीपक वाळुंज, अविनाश वाळुंज, नवनाथ वाळुंज, पंढरीनाथ गोपाळे, अर्जुन वाळुंज आणि राजेश वाळुंज उपस्थित होते.
या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक11 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
