Connect with us

Published

on

Share
Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

पोंदेवाडी येथे खरीप हंगाम पिक मेळावा संपन्न.

Published

on

Share

मंचर

पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथे खरीप पूर्व हंगाम शेतकरी मेळावा

( दि. 12 ) रोजी संपन्न झाला. कृषी संकल्प अभियान अंतर्गत खरीप हंगाम पिक नियोजन व शेतकरी मेळावा कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. यावेळी खरीप हंगाम पीक नियोजन व प्रमुख पीक व भाजीपाला पिक विषयक मार्गदर्शन, माती परीक्षण व खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, एकात्मिक कीड व खत व्यवस्थापन बायोचार विषयक मार्गदर्शन के व्ही के नारायणगावचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे सर , राष्ट्रीय द्राक्ष अनु साधन केंद्राच्या शास्त्रज्ञ कविता मॅडम यांनी केले.

तसेच महात्मा गांधी रोगार हमी योजना, अग्रोस्टिक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढणे, पी एम किसान, आणि इतर कृषी विषयक योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी प्रसन्न जाधव यांनी दिली. यावेळी मा. सरपंच संदीप पोखरकर, महेंद्र पोखरकर कृषिविभागाचे सहाय्यक कृषि अधिकारी शेळके निशा व गावांतील शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Continue Reading

गावागावातुन

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची देवदत्त निकम यांनी केली पहाणी

Published

on

Share

मंचर, प्रतिनिधी २७ मे २०२५ – आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. २६ मे रोजी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर, खडकवाडी आणि पोंदेवाडी या गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

या परिस्थितीची माहिती मिळताच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी २७ मे रोजी सकाळी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर आणि खडकवाडी या गावांचा दौरा केला. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निकम यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची विनंती केली.

अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे, फळबागांचे आणि तरकारी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, विजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

या पाहणी दौऱ्यात लोणीचे माजी सरपंच दिलीप वाळुंज, दीपक वाळुंज, अविनाश वाळुंज, नवनाथ वाळुंज, पंढरीनाथ गोपाळे, अर्जुन वाळुंज आणि राजेश वाळुंज उपस्थित होते.

या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

Continue Reading

गावागावातुन

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची देवदत्त निकम यांनी केली पहाणी

Published

on

Share

मंचर, २७ मे २०२५ – आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. २६ मे रोजी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर, खडकवाडी आणि पोंदेवाडी या गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या परिस्थितीची माहिती मिळताच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी २७ मे रोजी सकाळी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर आणि खडकवाडी या गावांचा दौरा केला. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निकम यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची विनंती केली.

अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे, फळबागांचे आणि तरकारी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, विजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

या पाहणी दौऱ्यात लोणीचे माजी सरपंच दिलीप वाळुंज, दीपक वाळुंज, अविनाश वाळुंज, नवनाथ वाळुंज, पंढरीनाथ गोपाळे, अर्जुन वाळुंज आणि राजेश वाळुंज उपस्थित होते.

या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

Continue Reading
Advertisement

Trending