Connect with us

शैक्षणिक

वीणा सदगीर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कशिंबेग ( ता . आंबेगाव) येथील मुख्याध्यापिका विणा सदगीर यांना साने गुरुजी कथा माला प्रतिष्ठान तर्फे ‘साने गुरुजी शिक्षक रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४’ या गुणवंत शिक्षक पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचे हस्ते ( दि. २२ ) रोजी मंचर येथे सन्मानित करण्यात आले या प्रसंगी उपस्थित साने गुरुजी कथामालेचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.


पुणे जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी भरीव योगदान असणाऱ्या, पूज्य साने गुरुजींचा वसा व वारसा जपणाऱ्या , कथामाले द्वारे संस्कारक्षम विद्यार्थी घडवत उत्तम नागरिकत्वाची जडण घडण करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो.


श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग या शाळेत कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापिका सदगीर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रेय पिंगळे व सर्व सहकारी शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

नागापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Published

on

Share

वळती, नागापूर (ता. आंबेगाव)

(दि. १५) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर येथील विद्यार्थ्यांनी मंथन आणि NSSE (नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा) या स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य गुणवत्ता व जिल्हा गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळवले आहे. या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची नावे :

  • निशांत विकास पवार — इयत्ता : ३ री
  • NSSE : राज्यात ८ वा
  • मंथन : राज्यात ९ वा
  • युवराज गणेश यादव
  • NSSE : राज्यात १२ वा
  • आरोही किरण मंचरे
  • मंथन : राज्यात ७ वी
  • सिद्धी अशोक लोखंडे
  • मंथन : केंद्रात ५ वी

या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार भीमाशंकर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास सरपंच गणेश यादव, उपसरपंच सुनील शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भरत म्हस्के, मनिषा निकम, बबुशा निकम, शालेय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पवार, वैजयंती मंचरे, विकास पवार, अशोक लोखंडे, पोलीस पाटील संजय पोहकर यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना पवार यांनी केले तर आभारप्रदर्शन बोऱ्हाडे मॅडम यांनी मानले.

राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे नागापूर ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले. नागापूरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. भविष्यात शाळेसाठी लागणाऱ्या भौतिक व शैक्षणिक सुविधा कमी पडू दिल्या जाणार नाहीत, असे लोकनियुक्त सरपंच गणेश यादव यांनी सांगितले.

Continue Reading

मनोरंजन

२०० प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकरीचा लाभ, खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश

Published

on

Share

नगर : प्रतिनिधी

राहुरी कृषि विद्यापीठासाठी जमिनी अधिगृहीत करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचा मार्ग शासन निर्णयामुळे मोकळा झाला असून या निर्णयामुळे राहुरी व परिसरातील २०० तरूणांना नोकरीचा लाभ मिळणार आहे. याप्रकरणी खा. नीलेश लंके हे गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते.


या प्रकल्पग्रस्तांनी दाखल्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी शाहूराव मोरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जाचक अटी लादून प्रकल्पग्रस्तांचे दाखल फेटाळून लावले होते. दोन वर्षांपूर्वी राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर प्रभाकर पवार, विकास भिंगारदे, भूषण शेंडगे, जगदीश अडसुरे,कुणाल कर्डक, आरबाज शेख, रवींद्र गिरगुणे आदींनी तत्कालीन आमदार नीलेश लंके यांच्याकडे या प्रश्नाचे गाऱ्हाणे मांडले.

लंके यांनी याप्रश्नी तात्काळ तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रश्नावर तोडगा काढण्याचे साकडे घातले होते. खा. लंके यांच्या पाठपुराव्यादरम्यान या प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र शासन आदेश काढावा लागेल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.

राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर खा. नीलेश लंके यांनी नव्या सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्याशी चर्चा करून या प्रश्नात तोडगा काढण्याची मागणी केली होती. मंत्री जाधव पाटील यांना तसे निवेदनही खा. लंके यांनी सादर केले होते.

या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी शासन निर्णय पारीत केला असून त्यामुळे राहुरी व परिसरातील सुमारे दोनशे प्रकल्पग्रस्तांना आता नोकरीची संधी मिळणार आहे.
या प्रकल्पग्रस्तांना मिळाले दाखले !

खा. नीलेश लंके यांच्या प्रयत्नानंतर शासन निर्णय पारीत झाल्यानंतर दिपक भिंगारदे, विकास भिंगारदे, असिफ शेख, भुषण शेंडगे, शुभम गायकवाड, सोमनाथ मगर, कुणाल कर्डक, नितीन ताकटे, ॠषीकेश देशमुख, विशाल पवार, शैलेश धोंडे, खेडेकर, श्रीकांत पवार, दादासाहेब भिंगारदे, बाळू भिंगारदे, दर्शन गाढवे, प्रविण देठे, दिनेश शेंडगे, प्रविण गिरगुणे, अमोल गिरगुणे.

Continue Reading

महाराष्ट्र

धामणी येथील प्रमिला सासवडे यांचे निधन

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी
धामणी (ता आंबेगाव )येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला ज्ञानेश्वर सासवडे (वय – ८० ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . धामणीच्या सामाजिक,शैक्षणिक ,धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता.


त्यांच्यामागे मुलगा मुलगी, दोन सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार असून वृत्तपत्र विक्रेते ( स्व ) विनायक सासवडे व निवृत्त पोस्ट कर्मचारी सुनील सासवडे यांच्या त्या आई तर अभियंता योगेश ,,गणेश महेश व प्रज्ञेश सासवडे यांच्या त्या आजी होत

Continue Reading
Advertisement

Trending