Connect with us

पर्यटन

शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा सोहळा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

Published

on

Share

शिर्डी (प्रतिनिधी):
ग्रीन एन क्लिन शिर्डी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या १३ फेब्रुवारीपासून शिर्डी महापरिक्रमा २०२५ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर आज शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा सोहळा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह परिसरातील असंख्य नागरिक व भाविकांनी उपस्थिती दर्शविली.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते महापरिक्रमेची विधिवत उद्घोषणा करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी महापरिक्रमेच्या माध्यमातून अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. तसेच या कार्यक्रमादरम्यान भजनांच्या सुरेल तालावर तयार झालेल्या आनंदमय वातावरणात मान्यवर आणि ग्रामस्थांसमवेत सहभाग घेत पाहुली या पारंपरिक नृत्याचा आनंद घेतला व सोहळ्याची रंगत वाढविली.

शिर्डी महापरिक्रमेचे वैशिष्ट्य म्हणजे गव्हाच्या पिकांची पाहणी आणि चित्रीकरण करणे. त्यामुळे सोहळ्यास उपस्थित सर्वांनी शिर्डी परिक्रमेच्या निमित्ताने शेतांमधील गव्हाच्या पिकांची पाहणी केली. तसेच परिक्रमेदरम्यानच्या दृश्यांचे चित्रीकरण देखील करण्यात आले. त्याद्वारे या अनोख्या परंपरेचा अनुभव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.

या सोहळ्याला श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिरीष वमने (उपविभागीय पोलीस अधिकारी), महंत काशिकानंदजी सरस्वती महाराज, ग्रीन एन क्लीन शिर्डीचे अजित पारख, तसेच अभयभैय्या शेळके, गोपीनाथ बापू गोंदकर, विजयराव जगताप, दिगंबर कोते, ॲड. अनिल शेजवळ, गणेश कोते, डॉ. जितेंद्र शेळके, नितिन शेळके, प्रताप जगताप यांसारख्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

यावेळी डॉ. सुजय विखे यांनी शिर्डी महापरिक्रमा हा उपक्रम केवळ धार्मिक सोहळा नसून, तो सामाजिक एकात्मता आणि निसर्गप्रेमाचा संदेश देणारा सोहळा आहे, असे स्पष्ट केले. तसेच सर्व उपस्थितांनी शिर्डी महापरिक्रमेला भविष्यात अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या संकल्पाने सदरील कार्यक्रमाची सांगता केली.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

पारनेर तालुक्यात विक्रमी ४ हजार १४७ घरकुले मंजुर !खासदार नीलेश लंके यांची माहिती

Published

on

Share

पारनेर : प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यात विक्रमी ४ हजार १४७ घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा क्र. ३ मध्ये ७९९ व टप्पा क्र.४ मध्ये ३ हजार ५२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून ३०० घरकुले मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.

आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या गरजू नागरीकांचे घराचे स्वप्न घरकुले मंजुर झाल्याने होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या कुटूंबाला घर मिळवून देणे, दारित्रय रेषेखालील कुटूंबांना स्थिर आणि सुरक्षित घरांची सुविधा पुरविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यात घरकुलांची मोठया प्रमाणावर मागणी होती. यापूर्वी काही घरकुलांना मंजुरी मिळाली. यावर्षी मोठया प्रमाणावर घरकुलांना मंजुरी मिळाल्याने हजारो कुटूंबांच्या घरकुलाचे स्वप्न आता दृष्टीपथात आले असून त्यांचे जीवन साकार होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. त्यांच्या जीवनात स्थैर्य येणार आहे यात समाधान असल्याचे लंके यांनी सांगितले.

एकूण मंजुर घरकुलांपैकी ३०० घरकुले मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील, इतर काही अडचणी असतील तर आपल्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन खा. लंके यांनी केले आहे.

पारनेर तालुक्यातील सर्व सरपंच, लाभार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, गृहनिर्माण अभियंता, पंचायत समितीमधील सर्व संगणक चालक, विस्तार अधिकारी यांनी या घरकुलांच्या मंजुरीसाठी परीश्रम घेतले.

प्रथमच ४ हजारांवर घरकुले !

दुष्काळी पारनेर तालुक्यात घरकुलांची मागणी मोठी असणे साहाजिक असून आजवर मोठया प्रमाणावर घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली नव्हती. घरकुलांबाबत केंद्र सरकारने धोरण घेतल्यानंतर आपण प्रत्येक ग्रामपंचायतीशी संपर्क करून घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आपल्या संपर्क कार्यालयाकडूनही वारंवार घरकुलांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत विविध ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करण्यात येत होता. एकत्रीत प्रयत्नांतून तालुक्यात प्रथमच तब्बल ४ हजारांवर घरकुलांना मंजुरी मिळाली यात मोठे समाधान आहे. 

खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य

Continue Reading

देशविदेश

संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी धार्मिक कार्यक्रमात तरुणांचा सहभाग महत्त्वाचा – माजी मंत्री दिलीप वळसे पाटील

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी गावागावात मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम होत असून आपल्या निरगुडसर गावातही मोठ्या उत्साहात अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे.

या सप्ताहात ज्येष्ठांची संख्या भरपूर आहे काही प्रमाणात तरुण देखील आहेत. मात्र गावातील धार्मिक कार्यक्रमात तरुणाची सहभाग घेतल्यास कार्यक्रमाला अधिक शोभा येईल असे मत राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

श्री धर्मराज बीज यात्रा उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह समाप्तीचे दिवशी काल्याचे किर्तन संपन्न झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी वळसे पाटील पुढे बोलताना म्हणाले की निरगुडसर गावात गेले सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. शेवटच्या दिवशी ह भ प धनंजय महाराज चव्हाण यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.

त्यांनी त्यांच्या कीर्तनात श्रीकृष्ण यांच्या लीला सांगितल्या समाजाला विविध उपदेश दिले. मात्र कीर्तन ऐकण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी, युवकांनी याचा बोध घेऊन किर्तन ऐकून घरी जात असताना कीर्तनातील चांगल्या गोष्टीं आत्मसात करून त्याचे आचरण आपल्या आयुष्यात करणे गरजेचे आहे. आपल्या गावातील श्री महादेवाच्या मंदिराचे काम सुंदर झाले.

असुन पुढील काही दिवसात या मंदिर उत्सवाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. असेही वळसे पाटील म्हणाले,

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे ,शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, निरगुडसरचे सरपंच रवींद्र वळसे पाटील, उपसरपंच नितीन टाव्हरे, आनंदराव वळसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश टाव्हरे, प्रमोद वळसे, रामदास थोरात, भाऊसाहेब वळसे,सुनील टाव्हरे, उर्मिला वळसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुवर्णा शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Continue Reading

गावागावातुन

एस टी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा आंबेगाव तालुक्यातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांना फटका

Published

on

Share


मंचर ( प्रतिनिधी)

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात एस.टी. महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. एस टीच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

या बाबत पूर्व भागातील अनेक ग्रामपंचायतींनी वारंवार राजगुरूनगर‌ एस टी आगार, मंचर एस टी आगार यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे .त्यावरही कोणत्याही उपाययोजना झाल्या नसल्याने आंबेगाव तालुक्यातील पुर्व भागातील प्रवासी वैतागले आहेत.


ग्रामीण भागातील अनेक लोक आजही एस.टी. च्या प्रवासावर अवलंबून आहेत. परंतु वेळेवर एस टी बस येत नसल्याने शिरदाळे,धामणी,पहाडदरा, लोणी,मांदळेवाडी परिसरातील प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याबाबत धामणीच्या सरपंच रेश्मा अजित बोऱ्हाडे,शिरदाळेच्या सरपंच सुप्रिया तांबे यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. तरीही एस टी महामंडळाचा कारभार सुधारला नाही.


धामणी लोणी परिसरातील अनेक विद्यार्थी रोज एस.टी. ची वाट पाहत असतात. मात्र वेळेव कोणतीच एस टी बस येत नाही.एक दिवस बस आली तर दोन दिवस येत नाही.नादुरस्त बस पाठवल्या जातात.त्या रस्त्यामध्येच बंद पडत आहेत.त्यामळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. असे शालेय विद्यार्थ्यांचे पालक देविदास रणपिसे यांनी सांगितले.

तर काही एस.टी.बस खेड वरून वाफगाव गुळानी मार्गे आल्या तर जाताना पाबळ मार्गे जात आहेत त्यामुळे त्याचा त्रासही मोठ्या प्रमाणावर असल्याचे प्रवासी बाळासाहेब कारभारी तांबे,तान्हाजी महाराज तांबे यांनी सांगितले. एस.टी.बस मोजक्या सोडा पण त्या वेळेवरती सोडा त्यामुळे प्रवाशांना त्यावर अवलंबून राहता येईल तसेच जेष्ठ प्रवासीसंख्या जास्त असेल तर वाहक आणि चालक त्यांच्याशी देखील चांगले वागत नाहीत. शिवाय त्यांना जर फ्री प्रवास असेल तर त्यांच्याशी बोलण्याची भाषा चांगली व सरळ नसते अशी तक्रार प्रवासी करत आहेत.

एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची आदराने वागावे – मयुर सरडे

आज जरी एस.टी. ने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी असली तरी ग्रामीण भागात अनेक लोक एसटी च्या प्रवासावर अवलंबून असतात. त्यामुळे महामंडळाने कमीत कमी वेळेवरती जर गाड्या सोडल्या तर त्याचा त्रास प्रवासी आणि विद्यार्थी यांना होणार नाही. त्यात एसटी ने भाडेवाढ केली आहे मग आपण सुविधा तरी योग्य द्या.त्यात जेष्ठ प्रवासी असतील त्यांच्याशी आदराने व्यवहार करा. ते फुकट जरी प्रवास करत असले तरी त्यांना शासनाने दिलेली ती सुविधा आहे.

Continue Reading
Advertisement

Trending