Connect with us

गावागावातुन

पोंदेवाडीचा विकास कौतुकास्पद – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील.

Published

on

Share

निरगुडसर प्रतिनिधी-( राजु देवडे)

पोंदेवाडी ( ता.आंबेगाव ) येथील ग्रामस्थांनी केलेली विकास कामे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काढले.
शनिवार ( दि.२० ) रोजी पोंदेवाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ वळसे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.

यावेळी जि.प.माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील,बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, शिवाजी ढोबळे, मनोज रोडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश थोरात, सहाय्यक बि.डी.ओ.अर्चना कोल्हे,खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, बाळासाहेब घुले, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर,ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, थोरांदाळे़ सरपंच जे.डी. टेमगिरे पारगावचे सरपंच श्वेता ढोबळे, मांदळेवाडी सरपंच उज्वला आदक,काठापुर सरपंच अशोक करंडे, लाखणगाव सरपंच प्राजक्ताताई रोडे पाटील,पोंदेवाडी सरपंच निलम वाळुंज, सोसायटी चेअरमन विठ्ठल मखर, उपसरपंच महेंद्र पोखरकर, संदीप पोखरकर, निलेश पडवळ,अमोल वाळुंज, सचिन टाव्हरे, राजु सिनलकर, मयूर सरडे, संकेत वायकर ,प्रतिक जाधव,शिराम वाळूंज महेंद्र वाळुंज पोंदेवाडी ग्रामपंचायत सर्व सदस्य, सोसायटी सर्व सदस्य व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वळसे पाटील आपल्या भाषणात म्हटले की, केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याची काम केले पाहिजे. गेली तीस ते पस्तीस वर्षे या परिसरात विकासाची कामे केल्याने तुम्ही मला या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. यापूर्व काळात अनेक काळात अनेक कार्यकर्त्यांना विविध संस्थेवर काम करण्याची संधी दिली. आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला शेतीविषयक धोरण ठरवावे लागणार आहे. पोंदेवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पोंदेवाडी बैलगाडा घाटासाठी वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. वळसे पाटील यांनी बैलगाडा घाटासाठी निधी उपलब्ध करून देत असताना शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे असून पालकांनी विद्यार्थ्याकडे लक्ष ठेवले पाहिजे. असे यावेळी सांगितले. येणाऱ्या काळात राजकारणात उलटा पालट घडण्याची शक्यता वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.सर्व उपस्थितीतांचे स्वागत व केलेल्या कामाची माहिती यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी दिली.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

व्हर्लपूल ऑफ इंडिया लि च्या वरिष्ठ व्यस्थापक यांची केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई येथील जल संसाधन विकास उपक्रमांना सदिच्छा भेट

Published

on

Share

शिरूर / आंबेगाव: उपजीविका विकासासाठी जल संसाधन विकास ह्या प्रकल्पा अंतर्गत शिरूर तालुक्यात लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन व व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 07 गावा मध्ये तसेच इलीका पी बी व्हर्लपूल आप्लायन्सेस प्रा. लि अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील 06 गावा मध्ये सिमेंट नाला बंधारा, माती बंधारा दुरुस्ती व गाळ काढणे, सूक्ष्म व तुषार सिंचन व रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवणे असे उपक्रम राबविले जात आहेत

व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापक सुश्री श्वेता श्रीवास्तव व लुपीन फाउंडेशन चे वर्क साईड हेड श्री वेंकटेश सर यांनी शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील जल संसाधन विकास प्रकल्पातील केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई या गावातील विविध उपक्रमांना भेट दिली. गावातील शेतकरी व ग्राम पंचायत सदस्य यांच्याशी संवाद साधून उपक्रमांच्या माध्यमातून होणाऱ्या व झालेल्या परिणामांना समजावून घेण्यात आले तसेच त्यांनी मार्गदर्शन केले.

सुश्री श्वेता यांनी समुदायाच्या मजबूत सहभागाबद्दल आणि लाभार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात लुपिन फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

सदर भेटी दरम्यान केंदूर च्या विद्यमान सरपंच सौ. मंगलताई पऱ्हाड, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, माजी सरपंच सूर्यकांत थिटे, भाऊसाहेब थिटे, लोणीचे माजी सरपंच उद्धव लंके, अशोक आदक, बाळशीराम वाळुंज तसेच शेतकरी उपस्थित होते.

सदर प्रकल्प भेटीचे नियोजन लुपिन फाउंडेशन चे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनात शिरूर,आंबेगाव व जुन्नर चे तालुका व्यवस्थापक प्रताप मोटे व बाळासाहेब बोराडे यांनी केले.

Continue Reading

गावागावातुन

भीमाशंकरचा एफ.आर.पी.नुसार रु. ३,२७३/- प्रती मे.टन दर

Published

on

Share

दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. रक्कम रु. ३२७२.१४ येत असून त्यानुसार रु. ३२७३/- प्रती मे.टन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन पंधरवड्याकरीता अदा केलेला प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे.टन वजा जाता उर्वरित रु. १७३/- प्रती मे.टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार शेतक-यांच्या बँक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, मा. उच्च न्यायालय व शासनाचे निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे. त्यानुसार गाळप हंगाम २०२५-२६ करीता देय एफ.आर.पी. रु.३२७२.१४ प्रती मे.टन येत आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसास प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे. टनाप्रमाणे अदा केलेला आहे. प्रथम हप्ता अदा करतेवेळी रक्कम उपलब्धतेनुसार एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार इथेनॉल विक्री, इथेनॉल व्याज परतावा व आयकर परताव्याची रक्कम जमा झाल्याने एफ.आर.पी.चे उर्वरित पेमेंटसाठी रक्कम उपलब्ध झाली आहे.


गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर २ लाख १२ हजार ५८६ मे.टन ऊस गाळप झाले असून रु. १७३/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बॅंक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असून यापुढे होणारे पंधरवडा ऊस पेमेंट रु. ३२७३/- प्रती मे.टन प्रमाणे वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे. तरी उस उत्पादक शेतक-यांनी आपला उत्पादित केलेला ऊस भीमाशंकर कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada