मनोरंजन
पोंदेवाडी येथील गडदादेवी यात्रा उत्साहात संपन्न. ३१५ बैलगाडा मालकांचा शर्यतीत सहभाग.
निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री गडदादेवी यात्रा उत्साहात संपन्न झाली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत एकुण ३१५ बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. यात्रेच्या पहिल्या दिवशी फळीफोड बैलगाडा नयन वळसे ( निरगुडसर) दुसरा दिवस बाळासाहेब भागाजी टेमगिरे यांचा गाडा फळीफोड ठरला तर घाटाचा राजा पहिला दिवस ज्ञानेश्वर लक्ष्मण पोंदे तर दुसरा दिवस आशिष संतोष बिरदवडे यांनी पटकावला
द्वितीय क्रमांकात प्रथम पंकज म्हातारभाऊ वाळुंज पोंदेवाडी,व भीमराव लंघे ,तृतीय क्रमांकात प्रथम
चक्रधर मित्र मंडळ पारगाव व हर्षद शरद पोखरकर तर फायनलमध्ये प्रथम क्रमांक टू व्हीलरचे मानकरी कृष्णाजी विजय मेरगळ जांबुत व विशाल कोंडीबा खटाके हे गाडे आले.फायनल द्वितीय क्रमांक नयन दिपक वळसे निरगुडसर व संदेश नरहरी गांजवे वळती,फायनल तृतीय क्रमांक साई विवेक पडवळ , शिवाजी महिपती टाकवे जुगलबंदी व सावता महाराज बैलगाडा संघटना शिंगवे यांनी पटकावले.
प्रथम क्रमांक ५४,द्वितीय क्रमांकात१०४ तर,तृतीय क्रमांकात ७९ बैलगाडे आले.
यात्रेची व्यवस्था खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, उपसरपंच महेंद्र पोखरकर, संदीप पोखरकर, जयसिंग पोंदे, सुशांत रोडे ,अमोल वाळुंज ,आनंदा पोंदे , नानाभाऊ पोखरकर , संतोष पोखरकर, नितीन पोंदे ,विशाल जाधव. संदेश डुकरे, निलेश दौंड, प्रमोद पोंदे , अमित दौंड यांसह ग्रामस्थांनी पाहिली.
गावागावातुन
पोंदेवाडी येथे खरीप हंगाम पिक मेळावा संपन्न.
मंचर
पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथे खरीप पूर्व हंगाम शेतकरी मेळावा
( दि. 12 ) रोजी संपन्न झाला. कृषी संकल्प अभियान अंतर्गत खरीप हंगाम पिक नियोजन व शेतकरी मेळावा कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. यावेळी खरीप हंगाम पीक नियोजन व प्रमुख पीक व भाजीपाला पिक विषयक मार्गदर्शन, माती परीक्षण व खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, एकात्मिक कीड व खत व्यवस्थापन बायोचार विषयक मार्गदर्शन के व्ही के नारायणगावचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे सर , राष्ट्रीय द्राक्ष अनु साधन केंद्राच्या शास्त्रज्ञ कविता मॅडम यांनी केले.

तसेच महात्मा गांधी रोगार हमी योजना, अग्रोस्टिक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढणे, पी एम किसान, आणि इतर कृषी विषयक योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी प्रसन्न जाधव यांनी दिली. यावेळी मा. सरपंच संदीप पोखरकर, महेंद्र पोखरकर कृषिविभागाचे सहाय्यक कृषि अधिकारी शेळके निशा व गावांतील शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
गावागावातुन
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची देवदत्त निकम यांनी केली पहाणी
मंचर, प्रतिनिधी २७ मे २०२५ – आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. २६ मे रोजी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर, खडकवाडी आणि पोंदेवाडी या गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

या परिस्थितीची माहिती मिळताच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी २७ मे रोजी सकाळी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर आणि खडकवाडी या गावांचा दौरा केला. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निकम यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची विनंती केली.

अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे, फळबागांचे आणि तरकारी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, विजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
या पाहणी दौऱ्यात लोणीचे माजी सरपंच दिलीप वाळुंज, दीपक वाळुंज, अविनाश वाळुंज, नवनाथ वाळुंज, पंढरीनाथ गोपाळे, अर्जुन वाळुंज आणि राजेश वाळुंज उपस्थित होते.

या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
गावागावातुन
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची देवदत्त निकम यांनी केली पहाणी
मंचर, २७ मे २०२५ – आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. २६ मे रोजी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर, खडकवाडी आणि पोंदेवाडी या गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या परिस्थितीची माहिती मिळताच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी २७ मे रोजी सकाळी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर आणि खडकवाडी या गावांचा दौरा केला. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निकम यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची विनंती केली.

अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे, फळबागांचे आणि तरकारी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, विजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

या पाहणी दौऱ्यात लोणीचे माजी सरपंच दिलीप वाळुंज, दीपक वाळुंज, अविनाश वाळुंज, नवनाथ वाळुंज, पंढरीनाथ गोपाळे, अर्जुन वाळुंज आणि राजेश वाळुंज उपस्थित होते.
या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन1 year agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन1 year agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक10 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
