गावागावातुन
गणेशनगर मेंगडेवाडी येथील नवसाला पावणारा स्वयंभू श्री गणेश
शब्दांकन -पत्रकार श्री.ह.भ.प. मधुकर महाराज गायकवाड गावडेवाडी
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या मंचर शिरूर मार्गावर मंचर पासून पूर्वेला असलेल्या बारा किलोमीटरच्या अंतरावर साधारणपणे दोन हजार लोकवस्तीचे अतिशय सुंदर व छोटेसे खेडे मेंगडेवाडी . ( गणेशनगर )
. या गावात असलेल्या गणपतीच्या मंदिरातील स्वयंभू श्री गणेश मूर्तीमुळे मेंगडेवाडी गणेशनगर हे छोटेसे गाव आंबेगाव तालुक्यासह महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आहे या गावात श्री गणेश चतुर्थी व श्री गणेश जयंतीला भव्य गणेशोत्सव साजरा केला जातो त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम ठेवले जातात त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीला प्रवचन भजन पालखी सोहळा व मिरवणुकीचे आयोजन केले जाते या कार्यक्रमासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक गणेश भक्त गणेशनगर, मेंगडेवाडी येथे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येतात . तसेच नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी असलेले मेंगडेवाडी गावातील नागरिक तरुण गणेशोत्सवाला दरवर्षी गावी येऊन श्री गणेशाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतात.

‘ प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गावात घरोघरी श्री गणेशाची पूजा करून उपवास धरला जातो . तसेच या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फराळ देखील वाटप केला जातो दरवर्षी होणाऱ्या गणेश देवाच्या कार्यक्रमात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांच्याकडून प्रबोधन केले जाते .तसेच आठ दिवस पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते अंगारकी चतुर्थीला कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते ही सर्व व्यवस्था समस्त ग्रामस्थ गणेशनगर मेंगडेवाडी व श्री गणेश देवस्थानच्या माध्यमातून केली जाते

नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती
या स्वयंभू गणपती पुढे मनातील मनोकामना सांगितल्यास हा गणपती ती मनोकामना पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे येथे भाविकांची सदैव गर्दी असते . गणेशोत्सवाच्या काळात येथील एकाही घरी गणपतीची प्रतिष्ठापना केलीजात नाही त्यामुळे एक गाव एक गणपती ही संकल्पना या गावातून पुढे उदयास आली.

आख्यायिका
मेंगडेवाडी येथीलजुने जाणते वयोवृद्ध भक्त सांगतात की हे मंदिर प्रथम कोणी व केव्हा बांधलेले आहे हे सांगता येणे कठीण आहे मात्र जुन्या पिढीतील लोकांच्या म्हणण्यानुसार तुळजापूर येथील कदमांची पाटी असलेले काही कदम मंडळी उपजविका करण्यासाठी निरगुडसर या गावी आले ते निरगुडसर येथे वास्तव्य करीत होते त्यावेळी गावचा बराचसा परिसर उजाड माळरान होता गावच्या उत्तरेस घोड नदी तर दक्षिणेस गण्या डोंगर अशी निसर्गरम्य डोंगराची उंच माळराने होती या डोंगराच्या आजूबाजूच्या परिसरात शेती जिरायत असल्यामुळे माळरानावर जनावरे शेळ्या जाण्यासाठी कदम मंडळी जात होती या छोट्याशा डोंगरावर एक गणेशाचे छोटे खानी कवलारूमंदिर होते त्या मंदिरात एक शेंदूर लावलेला दगड होता लोक त्याला मनोभावेगणपती म्हणून पुजत होते . कदम हे मेंढ्यांचा व्यवसाय करत. मेंढपाळ असून मेंढ्यांचा व्यवसाय करीत आहेत पुढे मेंडक्यांची वाडी म्हणजेच मेंगडेवाडी असाशब्दप्रयोग रूढ झाला. कदम यांनी आपले आडनाव बदलून मेंगडे हे आडनाव धारण केले . काही काळानंतर डोंगरावर जाता येईना तेव्हा त्यांच्या पूजा अर्चेत खंड पडू लागला तेव्हा गणेशाने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की तुम्ही जवळच्या अंतरावर जाऊन तेथे जमीन खोदा म्हणजे मी सापडेल जमीन खोदली असता तेथे स्वयंभू गणेशाची मूर्ती मिळाली . तिची प्रतिष्ठापना केली हेच ते गणेशनगर मेंगडेवाडी . आजूबाजूच्या परिसरातून तरुण आबाल वृद्ध या गणेशाचे दर्शन घेण्यास येतात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून या ठिकाणी अतिशय भव्य असा मंडप उभारलेला आहे या मंडपात तीन ते चार हजार लोक एका वेळेला बसू शकतात या भागात येण्यासाठी रस्ते अतिशय चांगले आहेत दळवणाच्या सोयी अतिशय चांगल्या आहेत तरीही पूर्व भागात असल्याने हे स्थान दुर्लक्षित आहे एसटी महामंडळाच्या एसटी बस नसल्याने या ठिकाणी सामान्य भाविकांना येताना त्रास होतो .मात्र लोकप्रतिनिधींचे बारकाईने लक्ष या तीर्थक्षेत्रावर आहे लोकप्रतिनिधींच्या भरीव विकास निधीमुळे या भागाचा कायापालट झालेला आहे .
गावागावातुन
व्हर्लपूल ऑफ इंडिया लि च्या वरिष्ठ व्यस्थापक यांची केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई येथील जल संसाधन विकास उपक्रमांना सदिच्छा भेट
शिरूर / आंबेगाव: उपजीविका विकासासाठी जल संसाधन विकास ह्या प्रकल्पा अंतर्गत शिरूर तालुक्यात लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन व व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 07 गावा मध्ये तसेच इलीका पी बी व्हर्लपूल आप्लायन्सेस प्रा. लि अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील 06 गावा मध्ये सिमेंट नाला बंधारा, माती बंधारा दुरुस्ती व गाळ काढणे, सूक्ष्म व तुषार सिंचन व रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवणे असे उपक्रम राबविले जात आहेत
व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापक सुश्री श्वेता श्रीवास्तव व लुपीन फाउंडेशन चे वर्क साईड हेड श्री वेंकटेश सर यांनी शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील जल संसाधन विकास प्रकल्पातील केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई या गावातील विविध उपक्रमांना भेट दिली. गावातील शेतकरी व ग्राम पंचायत सदस्य यांच्याशी संवाद साधून उपक्रमांच्या माध्यमातून होणाऱ्या व झालेल्या परिणामांना समजावून घेण्यात आले तसेच त्यांनी मार्गदर्शन केले.
सुश्री श्वेता यांनी समुदायाच्या मजबूत सहभागाबद्दल आणि लाभार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात लुपिन फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
सदर भेटी दरम्यान केंदूर च्या विद्यमान सरपंच सौ. मंगलताई पऱ्हाड, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, माजी सरपंच सूर्यकांत थिटे, भाऊसाहेब थिटे, लोणीचे माजी सरपंच उद्धव लंके, अशोक आदक, बाळशीराम वाळुंज तसेच शेतकरी उपस्थित होते.
सदर प्रकल्प भेटीचे नियोजन लुपिन फाउंडेशन चे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनात शिरूर,आंबेगाव व जुन्नर चे तालुका व्यवस्थापक प्रताप मोटे व बाळासाहेब बोराडे यांनी केले.
गावागावातुन
भीमाशंकरचा एफ.आर.पी.नुसार रु. ३,२७३/- प्रती मे.टन दर
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. रक्कम रु. ३२७२.१४ येत असून त्यानुसार रु. ३२७३/- प्रती मे.टन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन पंधरवड्याकरीता अदा केलेला प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे.टन वजा जाता उर्वरित रु. १७३/- प्रती मे.टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार शेतक-यांच्या बँक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, मा. उच्च न्यायालय व शासनाचे निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे. त्यानुसार गाळप हंगाम २०२५-२६ करीता देय एफ.आर.पी. रु.३२७२.१४ प्रती मे.टन येत आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसास प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे. टनाप्रमाणे अदा केलेला आहे. प्रथम हप्ता अदा करतेवेळी रक्कम उपलब्धतेनुसार एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार इथेनॉल विक्री, इथेनॉल व्याज परतावा व आयकर परताव्याची रक्कम जमा झाल्याने एफ.आर.पी.चे उर्वरित पेमेंटसाठी रक्कम उपलब्ध झाली आहे.
गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर २ लाख १२ हजार ५८६ मे.टन ऊस गाळप झाले असून रु. १७३/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बॅंक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असून यापुढे होणारे पंधरवडा ऊस पेमेंट रु. ३२७३/- प्रती मे.टन प्रमाणे वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे. तरी उस उत्पादक शेतक-यांनी आपला उत्पादित केलेला ऊस भीमाशंकर कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले
गावागावातुन
फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर दि.१४ प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.
निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन1 year agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन1 year agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक10 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
