Connect with us

महाराष्ट्र

नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी ६ ऑक्टोबरला मुंबईत सोडत होणार

Published

on

Share

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्रातील २५७ नगरपरिषद व ३७५ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने सोडतीचे आयोजन केले आहे. ही सोडत येत्या सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे पार पडणार आहे.

नगर विकास विभागाच्या वतीने यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले असून, सर्व राजकीय पक्षांना या सोडतीसाठी दोन प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयात प्रवेशासाठी मर्यादित व्यक्तींनाच परवानगी असेल.

नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, आरक्षणाच्या सोडतीदरम्यान पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रत्येक पक्षाने आपल्या दोन प्रतिनिधींची नावे सचिवांना पाठवावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगराध्यक्ष पदांचे आरक्षण ठरविण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आल्याने अनेक इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

पुणे विभागीय स्पर्धेत मंचर येथील महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे घवघवीत यश

Published

on

Share


पुणे (प्रतिनिधी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा परिषद, पुणे आयोजित पुणे विभागीय मैदानी स्पर्धा बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाली या स्पर्धेत महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कूल मंचरचा विद्यार्थी कु.संग्राम शीतल साईनाथ लोंढे याने 400 मीटर व 600 मीटर रनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवले. त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे .

यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल विठ्ठल गांजाळे यांनी परिश्रम घेतले व शाळेच्या मुख्यधपिका चित्रा अरविंद बांगर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व स्थानिक स्कूल समिती यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Continue Reading

गावागावातुन

पारनेर, कान्हूर मंडळातील शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवा राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांना मागणी

Published

on

Share

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान न दिल्यास आक्रोश मोर्चाचा इशारा

पारनेर : प्रतिनिधी

 सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही, पारनेर महसूल मंडळ आणि कान्हूर पठार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीबाबतचे अनुदान न देणे हा अन्यायकारक निर्णय असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, यांच्या वतीने शुक्रवारी महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की “तालुक्यातील इतर महसूल मंडळांप्रमाणेच पारनेर व कान्हूर पठार महसूल मंडळांमध्येही अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, शासनाच्या निकषांनुसार या दोन विभागांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, हे अन्यायकारक आहे.”

  निवेदनात तहसील प्रशासनाने शासन दरबारी सकारात्मक अहवाल पाठवून, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच “जर आठ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तर तहसील कार्यालयावर मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल,” असा इशाराही देण्यात आला आहे.

 यावेळी उपस्थित युवा शेतकऱ्यांनी सांगितले की, पारनेर व कान्हूर पठार भागात सलग पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, भुईमूग, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, पावसाच्या निकषांच्या चुकीच्या गणनेमुळे या भागातील शेतकरी शासन मदतीपासून वंचित राहिले आहेत.

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि नीलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी पुढाकार घेतला गेला आहे. “शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला मदत मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे, दया नाही,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.

 जर पुढील काही दिवसांत शासनाकडून ठोस निर्णय झाला नाही, तर पारनेर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोठा आक्रोश मोर्चा नेण्यात येणार असून, तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

 यावेळी मारुती रेपाळे, दीपक लंके,जितेश सरडे,संदीप गाडेकर,योगेश मते, भूषण शेलार, अर्जुन भालेकर, बापू चत्तर,चंद्रभान ठुबे,दीपक पाडळकर, किरण ठुबे, सुभाष रेपाळे, मोहन रेपाळे, बबन डमरे, राहुल चेडे,प्रसाद नवले, विनोद उदार, नीलेश दुश्मन,  प्रशांत बोरुडे, हिरामण  चेडे,शहाजी थोरात, सुरेश झगडे, एकनाथ पवार, मयूर गायकवाड, प्रमोद वाखारे, शिवाजी शिंदे, सुहास साळवे, भाऊसाहेब शिंदे, सुरेश पवार,  प्रवीण थोरात, प्रशांत साळवे,  राजेंद्र शेरकर, अंकुश शेरकर, शरद खोडदे,  प्रसन्ना मोरे, सागर जपे, नंदू सोनवणे, दादाभाऊ ठोंबरे, बाळू लोंढे, दत्तात्रय गुंड, भाऊसाहेब गुंड,  सरदार शेख, गणेश तांबे, धनंजय व्यवहारे, सुभाष नवले, अभिजीत झावरे, अमित जाधव, सावकार शिंदे, विजय शेरकर, नवनाथ वाळुंज, सचिन औटी, दत्तात्रय निमसे, बाळासाहेब नगरे, कारभारी पोटघन,दादाभाऊ चेडे आदी उपस्थित होते.

Continue Reading

गावागावातुन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना एकत्र..?

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या असून अनेक नवीन राजकीय समीकरणे जुळत आहेत. असेच समीकरण पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जुळू पाहत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख यांनी एकत्रित येऊन गुप्तगु केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना एकत्रित लढण्याची चर्चा सुरू झाली आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये महायुती व महाविकास आघाडीमध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या सरळ लढती झाल्या. यामध्ये शिंदेंची शिवसेना व उद्धव ठाकरेंची शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढल्या त्याचा तोटाही या दोन्ही शिवसेना यांना सोसावा लागला आहे.

म्हणूनच की काय उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे यांची शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रितपणे लढवणार असल्याची चर्चा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू झाली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. नुकतेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजाराम बाणखेले ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन भालेराव आणि शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर तालुकाप्रमुख प्रवीण थोरात पाटील युवा सेना तालुकाप्रमुख वैभव पोखरकर यांनी एकत्रित येत आंबेगाव विधानसभेच्या राजकीय गणितांची आखणी केल्याची चर्चा आहे.

त्यामुळे राज्यात दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत असल्या तरी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना काहीतरी नवीन राजकीय गणित जुळवत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

या दोन्ही शिवसेना एकत्रित येण्याला निमित्त ठरले आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला मेळावा. त्या मेळाव्यामध्ये झालेल्या टीकेला दोनही पक्षातील शिवसेनेने गंभीरतेने घेतले असून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुका एकत्रित लढवण्यासाठीची चाचपणी सुरू केली आहे. या दोन्ही शिवसेनेतील वाटाघाटी सकारात्मक रित्या पुढे गेल्यास शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय ,वंचित बहुजन आघाडी, बिरसा बिग्रेड, भारतीय किसान सभा असे राजकीय पक्ष व संघटनांना एकत्रित करून आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढण्याची रणनीती तयार केली असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन नेते माजी मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकत्रित येऊन लढण्याची रणनीती तयार केली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

एकंदरीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राजकारण पाहता 2004 साली तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुका अध्यक्ष उद्योगपती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना पक्षात प्रवेश केला होता . त्यानंतर शिवसेना पक्षातून तीन वेळा खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला. नंतर झालेल्या राजकीय स्थितांतरामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. येथे काही काळ राहिल्यानंतर 2024 ची लोकसभा निवडणूक ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून महायुतीकडुन लढले या निवडणुकीत त्यांचा पराभव महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला. त्यानंतर आढळराव पाटील यांनी माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना विधानसभेत निवडून आणण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आढळराव पाटील,व वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरवण्याची तयारी करत असताना. आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केलेले भाषण त्यामध्ये विरोधकांना दिलेली कौरवांची उपमा यामुळे दोन्ही शिवसेनेतील नेते शिवसैनिक आढळराव पाटील व वळसे पाटील यांच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका विरोधकांना एकत्रित घेऊन लढतील.आणि दोन्ही नेत्यांपुढे राजकीय आव्हान उभे करतील अशी सूत्रांची माहिती आहे .

आगामी काळात दोन्ही शिवसेनेने एकत्रित येऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्याचे दिलेले संकेत वरिष्ठ पातळीवर त्याला कशी संमती मिळणार यावरच ठरतील ..? की वरिष्ठांचे आदेश झुगारून आंबेगाव तालुक्यात अनोखी आघाडी जन्माला येईल हे आगामी काळाच ठरवेल

Continue Reading
Advertisement

Trending

cb6
Replica Watches Canada