गावागावातुन
आंबेगाव तालुक्यात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार अनेकांना होतोय नाहक त्रास, पत्रकारांचा उपोषणाचा इशारा
मंचर (प्रतिनिधी)
आंबेगाव तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने अनेक सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत. रीडिंग न घेता विज बिल देणे नादुरुस्त मीटर असताना त्याची दुरुस्ती न करणे .मीटर बदलून न देणे करणाऱ्या तक्रार करणाऱ्या ग्राहकाला नाहक त्रास देणे. वीजजोडणी मिळावी यासाठी अर्ज करून वीजजोडणी न देणे. एंजटा मार्फत कामे करणे.त्यामुळे आंबेगाव तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या कारभाराला सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत.
स्थानिक अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. चुकीच्या आलेल्या बिलाची दुरुस्ती करून न देता ग्राहकाची वीज तोडणीकडे कंपनीचे कर्मचारी लक्ष देत आहेत.
विधानसभेच्या निवडणुका संपतात महावितरणचे कर्मचारी वीजजोडणी तोडण्याच्या मोडवर आले आहेत . गेल्या आठ दिवसात अनेक सर्वसामान्य नागरिकांची वीज कनेक्शन तोडले आहेत. अनेक कुटुंब त्यामुळे अंधारात दिवस काढत आहेत नवीन वीज जोडणी मिळावी म्हणून अनेक ग्राहक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे मारूनही थकले आहेत
मीटर नादुरुस्त असताना पत्रकारांची वीजजोडणी तोडली कुटुंब अंधारात, पत्रकारांचा महावितरण वर आरोप
आंबेगाव तालुक्यात वीज वितरण चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे .मीटरमध्ये फॉल्ट असतानाही पंधरा हजार रुपये बील दिले गेले . बील दुरुस्त करून द्या बील भरतो अशी विनंती केली असता.बील दुरुस्त करुन न देता वीज बील भरले नाही…असे सांगत गावडेवाडी ता आंबेगाव येथील पत्रकार मधुकर गायकवाड यांची घरगुती वीजजोडणी शनिवारी (ता . ३० )रोजी संध्याकाळी सहा वाजता तोडण्यात आली आहे .
वारकरी सांप्रदायात असलेले हे कुटुंब आळंदी वारीवरुन घरी आले असता. त्यांच्या समोरच वीजजोडणी तोडली आहे. सदर कर्मचार्याला विनंती करुनही त्यांने गायकवाड यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.त्यामुळे या कुटुंबाला नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. अंधारातच रात्र घालवावी लागली आहे.
गायकवाड कुटुंबाचा वीज वितरण कंपनीच्या विरोधात उपोषणाचा इशारा
.मंचर येथील वीजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर व अवसरी खुर्द येथील कनिष्ठ अभियंता बी. एस ‘ शिंदे , गावडेवाडी येथील वायरमन यांना सदर वीज मीटर नादुरुस्त आहे.तो बदलुन द्या व वीज बील दुरुस्त करून द्या मी बील भरतो अशी विनंती करुनही बील दुरुस्त करून न देता.
वीजजोडणी तोडणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करुन सेवेतून बडतर्फ करावे अन्यथा वीज वितरण कंपनीच्या मंचर येथील कार्यालयाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा गायकवाड कुटुंबाने दिला आहे.
याबाबत वास्तव मराठीला गायकवाड यांनी दिलेली माहिती अशी की आठ नऊ महिन्यापूर्वी आधीचा वीज मीटर खराब असल्याने नवीन मीटर पत्रकार मधुकर गायकवाड यांना दिला मात्र हा नवीन मीटरही चुकीचे रीडिंग दाखवत आहे. ही गोष्ट अवसरी खुर्द येथील कनिष्ठ अभियंता बी. एस .शिंदे यांच्या कानावर घातली तेव्हा वायरमनला पाठवतो मीटर दुरुस्त करून देतो. असे सांगितले परंतु दर महिन्याला रिडींग न पडता बिल चालूच होते अंदाजे बिल चालूच होते

शनिवारी (ता ३० )दुपारी शिंदे यांनी गायकवाड यांना फोन करून सांगितले तुमचे आठ नऊ महिन्यांचे बिल थकले असून आम्ही तुमच्या घरगुती वीजपुरवठा तोडणार आहोत गायकवाड यांनी विनंती करूनही शिंदे यांनी ऐकले नाही.
मागील दोन महिन्यापूर्वी म टा मध्ये विरोधात बातमी छापली म्हणून स्थानिक वायरमनला सांगून शनिवारी संध्याकाळी सहा वाजता वीजपुरवठा खंडित केला .
शनिवार रविवार जोडून सुट्टी येत असल्याचे माहिती असूनही फक्त त्रास देण्याच्या हेतूने शिंदे यांनी हे कृत्य केले आहे. असा आरोप गायकवाड कुटुंबाचा आहे.गायकवाड यांनी कार्यकारी अभियंता शांताराम बांगर यांचेशी संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल तर शिंदे यांनी तुम्हाला काय करायचे ते करा असे गायकवाड यांना सांगितले. या मुजोर अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी गायकवाड कुटुंबाने केली आहे
पिंपरखेड येथील विधवा महीलेला दोन वर्षे वीजजोडणीसाठी हेलपाटे मारुनही जोडणी मिळेना
पिंपरखेड ता शिरूर येथील एक विधवा महीलेने निरगुडसर व मंचर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात वीजजोडणी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. दोन वेळा अर्ज देऊनही तो गहाळ झाला आहे. त्याबाबत त्या महीलेला समाधानकारक उत्तर मिळत नाही. आणि वीजजोडणीही मिळत नाही. अनेक वेळा रोजगार बुडवून ती या कार्यालयात गेली आहे. तीची कोणीच दखल घेत नसल्याने ही विधवा महीला मेटाकुटीला आली आहे.
वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क नाही
या प्रकरणी मंचर येथील कार्यकारी अभियंता बांगर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
गावागावातुन
व्हर्लपूल ऑफ इंडिया लि च्या वरिष्ठ व्यस्थापक यांची केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई येथील जल संसाधन विकास उपक्रमांना सदिच्छा भेट
शिरूर / आंबेगाव: उपजीविका विकासासाठी जल संसाधन विकास ह्या प्रकल्पा अंतर्गत शिरूर तालुक्यात लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन व व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 07 गावा मध्ये तसेच इलीका पी बी व्हर्लपूल आप्लायन्सेस प्रा. लि अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील 06 गावा मध्ये सिमेंट नाला बंधारा, माती बंधारा दुरुस्ती व गाळ काढणे, सूक्ष्म व तुषार सिंचन व रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवणे असे उपक्रम राबविले जात आहेत
व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापक सुश्री श्वेता श्रीवास्तव व लुपीन फाउंडेशन चे वर्क साईड हेड श्री वेंकटेश सर यांनी शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील जल संसाधन विकास प्रकल्पातील केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई या गावातील विविध उपक्रमांना भेट दिली. गावातील शेतकरी व ग्राम पंचायत सदस्य यांच्याशी संवाद साधून उपक्रमांच्या माध्यमातून होणाऱ्या व झालेल्या परिणामांना समजावून घेण्यात आले तसेच त्यांनी मार्गदर्शन केले.
सुश्री श्वेता यांनी समुदायाच्या मजबूत सहभागाबद्दल आणि लाभार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात लुपिन फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
सदर भेटी दरम्यान केंदूर च्या विद्यमान सरपंच सौ. मंगलताई पऱ्हाड, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, माजी सरपंच सूर्यकांत थिटे, भाऊसाहेब थिटे, लोणीचे माजी सरपंच उद्धव लंके, अशोक आदक, बाळशीराम वाळुंज तसेच शेतकरी उपस्थित होते.
सदर प्रकल्प भेटीचे नियोजन लुपिन फाउंडेशन चे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनात शिरूर,आंबेगाव व जुन्नर चे तालुका व्यवस्थापक प्रताप मोटे व बाळासाहेब बोराडे यांनी केले.
गावागावातुन
भीमाशंकरचा एफ.आर.पी.नुसार रु. ३,२७३/- प्रती मे.टन दर
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. रक्कम रु. ३२७२.१४ येत असून त्यानुसार रु. ३२७३/- प्रती मे.टन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन पंधरवड्याकरीता अदा केलेला प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे.टन वजा जाता उर्वरित रु. १७३/- प्रती मे.टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार शेतक-यांच्या बँक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, मा. उच्च न्यायालय व शासनाचे निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे. त्यानुसार गाळप हंगाम २०२५-२६ करीता देय एफ.आर.पी. रु.३२७२.१४ प्रती मे.टन येत आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसास प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे. टनाप्रमाणे अदा केलेला आहे. प्रथम हप्ता अदा करतेवेळी रक्कम उपलब्धतेनुसार एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार इथेनॉल विक्री, इथेनॉल व्याज परतावा व आयकर परताव्याची रक्कम जमा झाल्याने एफ.आर.पी.चे उर्वरित पेमेंटसाठी रक्कम उपलब्ध झाली आहे.
गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर २ लाख १२ हजार ५८६ मे.टन ऊस गाळप झाले असून रु. १७३/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बॅंक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असून यापुढे होणारे पंधरवडा ऊस पेमेंट रु. ३२७३/- प्रती मे.टन प्रमाणे वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे. तरी उस उत्पादक शेतक-यांनी आपला उत्पादित केलेला ऊस भीमाशंकर कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले
गावागावातुन
फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर दि.१४ प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.
निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन1 year agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन1 year agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक10 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
