Connect with us

सामाजिक

जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांना पैसे देण्यास केंद्र सरकारचा नकार..? कंत्राटदार अडचणीत

Published

on

Share

पुणे प्रतिनिधी

: जलजीवन महत्वकांक्षी योजनांचे कामांस निधी देण्याचे केंद्र सरकारने हात झटकले केंद्र सरकारचा धक्कादायक निर्णय काम केलेले कंत्राटदार हवालदिल राज्यांप्रमाणे केंद्राची ही आर्थिक परिस्थिती बिकट आहे काय महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना चा सवाल

राज्यात २०२० पासुन गाजत असलेल्या प्रत्येक गावात जलजीवन मिशन अंतर्गत हर घर‌ नळावाटे पाणी मिळावे यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती सदर योजनेचा एवढा मोठा गाजावाजा करण्यात आला. जवळपास मागील तीन चार वर्षात जवळपास या योजनेसाठी २ लाख कोटी खर्च केले आहेत असे परिपत्रक मध्ये केंद्र शासनाने म्हटले आहे.

प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित करण्याचे ठरले तेव्हा या सर्व कामांचे ठोकळ पद्धतीने प्रायव्हेट कन्सल्टन्सी यांनी घरात बसुन अंदाजपत्रक तयार केले होते ,कोणत्याही गावांचा प्रत्यक्ष पाहणी व सर्व्ह न करता चुकीचे अंदाजपत्रक सदर कंपनीने स्वताच्या कार्यालयात बसुन गुगल मॅप द्वारे तयार केले होते. कारण योजना महत्वकांक्षी होती तातडीने अंमलबजावणी करायची होती . यामुळेच सर्व अंदाजपत्रक चुकीचे पद्धतीने तयार‌ केले‌ गेले.

यामुळेच सदर योजना साठी कामे प्रत्यक्षात सुरू असतानाच सुधारीत अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. राज्यात कंत्राटदार यांनी कामे केली उर्वरित भरपूर कामे केलेल्या कामांचे निधी मिळत नसल्याने कामे थांबली अशातच सदर कामांचे सगळे अंदाजपत्रक चुकीचे होते, यामुळे सुधारित अंदाजपत्रक यामुळे परत प्रचंड निधी सदर योजनेसाठी लागत होता ,तो आता कुठेही देऊ शकत नाही,अशी सध्याची परीस्थिती आहे सदर कामासाठी ५० टक्के निधी केंद्र सरकारने व ५० टक्के राज्य सरकारने द्यायचे असे योजना मंजुर करताना ठरले होते .

आता राज्यात जवळपास १२ हजार कोटींची देयके अथवा त्यापेक्षा जास्तच रकमेची प्रलंबित आहेत यापैकी ५० टक्के केद्रांचा वाटा आहे आता केंद्र सरकारने निधी उपलब्ध होणार नाही राज्य सरकारनै आपपल्या माध्यमातून काय ते योजनाचै बघुन घ्यावे असा स्पष्ट आदेश दिले आहेत यामुळे आता राज्यातील कंत्राटदार यांना केलेल्या कामांचा निधी मिळणे फार अवघड झाले आहे ही एक फार मोठी फसवणूक कंत्राटदार यांची राज्य व केंद्र सरकार कडून झाली आहे तसेच राज्य सरकार प्रमाणे केंद्र सरकार ही आर्थिक अडचणीत आहे काय ❓ असा स्पष्ट आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना चे राज्य पदाधिकारी व स़चालक यांनी या पत्रकाद्वारे केला आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक अध्यक्षपदी विशाल वाबळे

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी खडकी ( ता. आंबेगाव) येथील विशाल वाबळे यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद गोतारणे यांनी हे निवडीचे पत्र विशाल वाबळे यांना दिले .मंचर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष मेळाव्यात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, युवक अध्यक्ष प्रमोद सिंह गोतारणे, दामु घोडे व आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर निवडीचे पत्र दिले आहे.

यावेळी सत्काराला उत्तर देताना विशाल वाबळे म्हटले की आंबेगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देवुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम मी करणार आहे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे घराघरात पोहचवणार असल्याचे विशाल वाबळे यांनी निवडीनंतर सांगितले.

विशाल वाबळे यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ अमोल कोल्हेच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासोबत ते सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असतात ‌. विशाल वाबळे यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरात उन अभिनंदन होत आहे.

Continue Reading

गावागावातुन

पारगावच महसूल कार्यालय मोजतोय अखेरच्या घटका

Published

on

Share

मंचर

आंबेगाव च्या पूर्व भागातील पारगाव कारखाना येथील तलाठी व महसूल मंडलाधिकारी कार्यालय शेवटच्या घटका मोजत आहे. दोन्ही कार्यालयाची इमारत नादुरुस्त झाल्याने पारगाव जारकरवाडी तलाठी कार्यालय पारगाव ग्रामपंचायत खोलीमध्ये चालू आहे तर महसूल मंडलाधिकारी कार्यालय खाजगी जागेत चालू आहे. पूर्वीची इमारत चाळीस वर्षाहून अधिक झाली आहे. सदर इमारत जीर्ण स्वरूपाची झाली असून कौलारु इमारत आहे. या इमारतीला तडे गेले असून धोकादायक बनली आहे .


तलाठी सजेसाठी पारगाव जारकरवाडी ही गावे असून महसूल मंडलाधिकारी कार्यालयसाठी एकुण सतरा गावे आहेत त्यामध्ये पारगाव, जारकरवाडी, शिंगवे, वळती, भागडी, काठापूर बुद्रुक, लाखणगाव, पोंदेवाडी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी, खडकवाडी, रानमळा, वाळुंज नगर. ही गावे येत असल्याचे माहिती मिळत आहे. सदर इमारतीचे काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी पोंदेवाडीचे माजी सरपंच अनिल वाळुंज व जारकरवाडीचे उपसरपंच सचिन टाव्हरे यांनी केली आहे.

Continue Reading

गावागावातुन

TNS इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आयटीआयमध्ये २०० तासांचे प्रशिक्षण व कॅम्पस मुलाखती यशस्वीपणे संपन्न

Published

on

Share

“ITI विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारा ‘C2IC’ प्रकल्प यशस्वी रित्या पूर्ण”

अहिल्यानगर (ता. नगर):
TNS इंडिया फाउंडेशन (TNSIF), मुंबई आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी, अहिल्यानगर यांच्यात दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानुसार (MoU) विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास, रोजगार संधी आणि उद्योगसज्जतेसाठी “Campus to Industrial Careers (C2IC)” हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत संस्थेतील १०३ विद्यार्थ्यांनी एकूण २०० तासांचे सखोल प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.या प्रशिक्षणामध्ये वैयक्तिक, व्यावसायिक व पर्यावरणपूरक ग्रीन स्किल्स चा समावेश होता. सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.प्रशिक्षणामध्ये समाविष्ट घटक:
योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन व आत्ममूल्यांकन,CV तयार करणे, अर्ज प्रक्रिया व मुलाखतीसाठी तयारी,सहकारी व ग्राहकांशी संवाद कौशल्ये,ईमेल शिष्टाचार, कार्यस्थळी वर्तन व नोकरीतील नैतिकताग्रीन स्किल्स प्रशिक्षण:इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान,EV बॅटरी व इलेक्ट्रिक मोटर कार्यप्रणाली,सौर पीव्ही मॉड्यूल्स व त्यांची स्थापना,नूतनीकरणीय ऊर्जा, टिकाऊ विकास व पर्यावरण संरक्षण
प्रशिक्षणानंतर दि. २० जून २०२५ रोजी, संस्थेमध्ये पुढील नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखती आयोजित करण्यात आल्या UKB Electronics Pvt. Ltd., रांजणगाव MIDC,Bajaj Electricals Ltd., महाळुंगे इंगळे, तळेगाव-चाकण रोड या मुलाखतींमधून एकूण ३९ विद्यार्थ्यांची थेट निवड करण्यात आली,ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्वरित रोजगाराच्यासंधी उपलब्ध झाल्या.
याउपक्रमामुळेविद्यार्थ्यांमध्ये:आत्मविश्वासात लक्षणीय वाढ,संवाद कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास,उद्योग क्षेत्रातील वास्तव समज,पर्यावरणपूरक विचारसरणी व आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख,यामुळे विद्यार्थी स्पर्धात्मक नोकरीच्या बाजारात अधिक आत्मविश्वासाने सहभागी होऊ लागले आहेत.

कार्यक्रमाच्या यशाबद्दल मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा मंत्री व संस्था अध्यक्ष ,डॉ. सुजय विखे पाटील – मुख्य कार्यकारी अधिकारी,डॉ. पी. एम. गायकवाड – डायरेक्टर जनरल (प्रशासन),श्री. सुनील कोल्हापुरे – डायरेक्टर (टेक्निकल),डॉ. अभिजीत दिवटे – डायरेक्टर (मेडिकल),प्राचार्य श्री. ए. व्ही. सूर्यवंशी, उपप्राचार्य श्री. काकडे,गटनिदेशक श्री. पठारे व श्री. भुसे,प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी श्री. अरुण म्हस्के,TNSIF प्रतिनिधी श्री. प्रणव गोडले संपूर्ण शिक्षक व ITI टीमचे अभिनंदन केले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ एक प्रशिक्षण प्रक्रिया नव्हे, तर कौशल्य, रोजगार आणि औद्योगिक सज्जतेचा व्यापक आराखडा ठरला आहे. उद्योगाभिमुख उपक्रम,आधुनिक तंत्रज्ञान. प्रशिक्षण,इंटरनशिप व प्लेसमेंट एकत्रित योजना या माध्यमातून Industry-Academia Interface सशक्त करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार आहे.हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शिक्षण आणि उद्योग यामधील दुवा अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे.

Continue Reading
Advertisement

Trending