देशविदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी..ताप मात्र भाजपाला
मुंबई (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सातारा जिल्ह्यातील दरेगाव गावी विश्रांती घेण्यासाठी गेले होते. तिकडेच ते आजारी पडले मग त्यांना बरे करण्यासाठी मुंबईमधुन आरोग्य यंत्रणा हलली मग शिंदेंना बरे वाटू लागले .नंतर ते ठाण्यात आले . पुन्हा आजारी पडले शिंदे आजारी पडल्याने महायुतीच्या सर्व बैठका रद्द झाल्या. शिवाय शिंदेंच्या शिवसेनेची बैठक रद्द झाली आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी आणि ताप मात्र भाजपाला चढल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागली आहे .
साधेसुधे भोळे वाटणारे एकनाथ शिंदे यांनी मात्र महायुतीला बहुमत मिळाले असतानाही आपण कसे कसलेले राजकारणी आहोत..? हे दाखवून दिले आहे.
भाजपा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विरोधकांचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. झालेल्या या दारून-पराभवातून महाविकास आघाडी अजून सावरतच आहे. तेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले आहेत.भाजपा महायुतीलाही चक्कर येऊ लागली असल्याची चर्चा आहे.
आजारपणाचे कारण जरी असले तरी एकनाथ शिंदे यांनी भाजपाला सत्तेत आणण्यासाठी घेतलेल्या कष्ट आपल्या राजकीय जीवनात घेतलेला मोठा निर्णय पहाता एकनाथ शिंदे यांना भाजपा सन्मान जनक राजकीय वजन देत नसण्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
अजित पवारांची सत्तेसाठी वाट्टेल ती भूमिका एकनाथ शिंदे यांची अडचण
2019 नंतर महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत सुरू होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री बनले होते.अगदी सहजतेने देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेणारे अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंबरोबरही रुजली होती.महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री असताना त्यांच्याकडून शिवसेनेच्या आमदारांची कोंडी केल्याची चर्चा झाली.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्वभावाला न साजेशी भूमिका घेत भाजपासोबत जाणे पसंत केले .एकनाथ शिंदे यांनी ही भूमिका घेतल्याने भाजपा सत्तेत आली.अशी स्थिती असली तरी अजित पवारांना सत्तेची उब सुटली नाही. अजित पवारही एकनाथ शिंदे यांनी तयार केलेल्या सरकारमध्ये सहभागी झाले.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पद मिळवले. या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांनी कोणताही विरोध न करता अडीच वर्षे भाजपासोबत चांगले काम केले परिणामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला भरपुर यश मिळाले मिळाले .
एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी केली आहे का?
भाजपा महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे .एकनाथ शिंदेंच्या शिवसेने शिवाय महायुतीची सत्ता स्थापन होऊ शकते. अशी समीकरणे असताना राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्याने एकनाथ शिंदे यांनी काय भूमिका घ्यायची ..?त्यांना कोणती मंत्रिपदे भेटणार..? याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेला वजनदार खाती मिळणार ..? की भाजपा देणार त्याच मंत्रीपदावर समाधान मानावे लागणार ..?अशी परिस्थिती सध्या राजकारणाची दिसत आहे
त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आजारपणातही राजकीय डाव टाकला आहे.आपला राजकीय अनुभव पणाला लावला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे आजारी असले तरी ताप मात्र पुढच्या दोन दिवसात भाजपाला येईल अशी परिस्थिती तरी सध्या दिसत आहे.
देशविदेश
दूध दरवाढ आणि भेसळीविरोधात खा. लंके आक्रमक शेतकरी आणि ग्राहकांशी निगडीत प्रश्नावर संसदेत आंदोलन
अहिल्यानगर : प्रतिनिधी
दूध हे शेतकऱ्यांसाठी केवळ उत्पादन नसून जोडधंदा आणि जीवन जगण्याचा अविभाज्य घटक आहे.मात्र आज दुधाला योग्य भाव मिळत नाही, उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे दुधात भेसळ करणारे लोक सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करत आहेत. या शेतकरी आणि ग्राहकांशी निगडित प्रश्नांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी संसद भवनासमोर आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. दुधाची दरवाढ आणि भेसळीविरोधात खासदार नीलेश लंके यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारने दोन्ही प्रशनावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली.
या आंदोलनात खासदार नीलेश लंके इंडिया आघाडीचे खासदार नामदेव किरसान, शोभाताई बच्छाव, बळवंतराव वानखेडे, छत्रपती शाहू महाराज, धैर्यशील मोहिते पाटील, श्याम बर्वे, संजय देशमुख, प्रियंका चतुर्वेदी, वर्षा गायकवाड, बजरंगबप्पा सोनवणे,अरविंद सावंत, डॉ.कल्याण काळे आदी सहभागी झाले होते.
खासदार नीलेश लंके व इतर खासदारांनी संसद भवनात आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी दूध भेसळीचा प्रतिकात्मक प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
या आंदोलनादरम्यान खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुधाचे बाजारभाव वाढले पाहिजेत, दुधाचे दर उत्पादन खर्चाच्या आधारे ठरवले गेले पाहिजेत,भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचे योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशी घोषणाबाजी करत खासदारांनी संसद भवन परिसर दणाणून सोडला.

आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार नीलेश लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा लढा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी व सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी आहे. दुधाला बाजारभाव नसल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहेत. महाराष्ट्रात दुधाला प्रतिलिटर ४० ते ४२ रुपये उत्पादन खर्च येतो. याचा विचार करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाले पाहिजेत ही आमची आग्रही मागणी आहे. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असून, भेसळीमुळे विशेषतः लहान मुलांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शासन झाले पाहिजे.
गावागावातुन
जिल्ह्यातील दिंड्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणार -ना. विखे पाटील
दिंडीच्या नोंदणीसाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात स्वतंत्र कक्ष
अहिल्यानगर, दि.२६ प्रतिनिधी
जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याचे प्रमुख, वारकरी व प्रशासन यांच्यातील योग्य समन्वयातून जिल्ह्यातील दिंड्याना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून,या मंगलमय उत्सवातून हरीतवारी निर्मलवारीचा संदेश मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच, वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिंड्याची नोंदणी तहसिल कार्यालयात करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सूरू करण्याची सूचना त्यांनी जिल्हा प्रशासानातील अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन बैठकीत पालकमंत्री श्री.विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, ह.भ.प.अशोक सावंत आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, आपल्या जिल्ह्यातून २६० दिंड्या करमाळा मार्ग सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ होतात. संत निवृत्तीनाथ पालखी मार्ग निर्हेण ते शेगुड पर्यंत रस्त्यांचे खड्डे बुजविण्यात यावे. साईड पट्ट्या दुरूस्त कराव्यात. दिंडी मार्गावरील पारेगाव येथे मुलभूत सुविधा पुरवाव्यात. संपूर्ण पालखी मार्गावर रूग्णवाहिका तयार ठेवण्यात यावेत. दिंड्याच्या नोंदणीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयात शिबिर आयोजित करण्यात यावे.
यावर्षी पालखीच्या सुरूवातीलाच पाऊस होत आहे, त्यामुळे वारकऱ्यांची सुरक्षा म्हणून यापुढे पावसाचे अंदाज वर्तविणारी अद्यावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या २६० दिंड्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी – कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक दिंडीत पुरेसे औषधे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

श्री.विखे पाटील म्हणाले, ज्या गावात अथवा शहरामध्ये या दिंड्या मुक्कामी थांबणार आहेत त्या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालयामध्ये वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात येणार असून त्याठिकाणी शुद्ध पिण्याचे, पाणी, अखंडितपणे वीज, आरोग्य व शौचालयाची व्यवस्थाही केली जाणार आहे. मागील वर्षीच्या दिंडीतील वारकऱ्यांच्या अडचणी यावर्षी दूर केल्या जातील. वारकऱ्यांच्या सूचनांची दखल घेतली जाईल.
वारकरी पायी चालत असलेल्या मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दिंड्यासोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. दिंड्या ज्याठिकाणी मुक्कामी राहतील तेथेही पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पालखीमार्गावर आवश्यक साधनांसह तात्पुरते आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, श्रीक्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वर देवस्थानाचा ७०० कोटींचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे, मागील वर्षाप्रमाणे यावर्षी प्रत्येक दिंडीला २० हजार रूपये अनुदान व प्रत्येक वारकऱ्यास पाच लाख रूपयांचा विमा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेकवेळा मुक्कामाच्या ठिकाणी अशुद्ध पाणी पिल्याने अनेक वारकरी आजारी पडतात. त्यामुळे प्रत्येक दिंड्यातील वारकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. ज्या दिंड्याकडे स्वतःचे पाणी टँकर आहेत, त्यांच्या टँकरमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून देण्याची व्यवस्था करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
दिंडीमध्ये अस्वच्छता होऊ नये यासाठी ‘हरित वारी – निर्मल वारी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
आमदार शिवाजीराव कर्डीले, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ यांनीही वारीच्या नियोजनाच्या दृष्टीने सूचना केल्या.
याबैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील ७६ दिंडीचे प्रमुख तसेच वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
गावागावातुन
मतदार संघात मल्टीमोडल लॉजिस्टिक हब हवा खासदार नीलेश लंके यांची आग्रही मागणी
अहिल्यानगर : प्रतिनिधी
नगर-श्रीगोंदे-कर्जत परिसरात मल्टीमोडल लॉजिस्टक हब स्थापन करून पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ देण्याची आग्रही मागणी खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी केंद्रीय नौवहन, बंदर व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे केली. खा. लंके यांनी मंत्री सोनोवाल यांना या मागणीचे निवेदनही सादर केले.
खा. लंके यांनी यासंदर्भात मंत्री सोनोवाल यांची भेट घेत शेती, उद्योग आणि रोजगाराला गती मिळेल याकडे लक्ष वेधत लॉजिस्टिक हबमुळे स्थानिक शेतकऱ्यांना थेट बंदर संपर्क, प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोअरेज, लघुउद्योगांना चालना मिळून रोजगार निर्मितीस मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. स्थानिक बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणार असून युवकांसाठीही रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होतील असा विश्वास खा. लंके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

शेतकऱ्यांना फायदा, रोजगार निर्मिती
खासदार नीलेश लंके यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार लॉजिस्टिक हबमुळे स्थानिक शेतकऱ्यांना थेट बंदर संपर्क, प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोअरेज, लघुउद्योग यांना चालना मिळून रोजगार निर्मितीस मोठा फायदा होणार आहे. स्थानिक बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होणार असून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होतील.
आवष्यक जमीन व स्थानिकांचा पाठींबा
या हबसाठी या परिसरात आवष्यक जमीन उपलब्ध असून स्थानिकांचा सक्रीय पाठींबा या प्रस्तावास लाभला असल्याचे खा. लंके यांनी मंत्री सोनोवाल यांच्या निदर्शनास आणून दिले. सागरमाला योजनेचा उद्देश म्हणजे बंदरांना राज्याच्या आतील भागांशी जोडणे हा आहे त्यामुळे हे क्षेत्र त्यासाठी अत्यंत योग्य असल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारने या मागणीची दखल घेऊन नगर-श्रीगोंदे-कर्जत हबला सागरमाला प्रकल्पात समाविष्ट करावे अशी मागणी करतानाच हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रगतीची नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास खा. लंके यांनी व्यक्त केला.
निर्यातक्षम शेतीचे उत्तम केंद्र
नगर, श्रीगोंदे व कर्जत तालुके हे जेएनपीटी बंदरांशी रेल्वेने थेट जोडलेले असून एम.एच.१६० महामार्ग शिर्डी, पुणे विमानतळ आदी दळणवळणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. या भागात द्राक्षे, डाळिंब, कांदा, उस, गहू, जैविक उत्पादने मोठया प्रमाणात उत्पादीत होत असून निर्यातक्षम शेतीचे उत्तम केंद्र म्हणून या भागाकडे पाहिले जात असल्याचे खा. लंके यांनी यावेळी मंत्री सोनोवाल यांच्या निदर्शनास आणून दिले
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन1 year agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन1 year agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक10 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
