Connect with us

गावागावातुन

धामणीच्या खंडोबा मंदिरात “सदानंदाचा येळकोट”चंपाषष्ठीला दर्शनासाठी व पाच नामाच्या जागरणासाठी भाविकांची अलोट मांदीयाळी …..

Published

on

Share

मंचर (प्रतिनिधी)
:सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडारा खोबरे उधळून हजारो भाविकांनी धामणी ( तालुका आंबेगांव)येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले.पुणे.नाशिक व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या येथील म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात शनिवारी (दिं.७) स्कंद षष्ठी मार्तंड भैरवोत्थापन चंपाषष्ठीच्या भल्या पहाटे चार वाजता श्री खंडोबाच्या भव्य मूर्तीसमोरील खालच्या भागात असलेल्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक चंपाषष्ठी उत्सव मंडळाचे मच्छिंद्र वाघ आणि परंपरागत सेवेकरी तांबे व भगत यांंनी केल्यानंतर पहाटे साडेचार वाजता स्वयंभू सप्तशिवलिंगावर साधारण दोन फूट उंच व दिड फूट रुंद व्यासाची सर्वांगसुंदर पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात येऊन खंडोबाच्या मुखवट्याला आणि पूर्वमुखी श्री म्हाळसाकांत खंडोबा.म्हाळसाई बाणाई व उत्तरमुखी असलेल्या खंडोबाच्या मानलेल्या बहिणीच्या जोगेश्वरीच्या विशाल देखण्या मूर्तीना वस्रालंकार घालण्यात येऊन त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास सेवेकरी धोंडीबा भगत.दादाभाऊ भगत.सुभाष तांबे.प्रभाकर भगत.शांताराम भगत.राजेश भगत.राहूल भगत.नामदेव भगत.ज्ञानेश्वर जाधव.सिताराम जाधव.देवानंद जाधव.दिनेश जाधव.नामदेव पवार.सुरेश पवार या सेवेकरी मंडळीच्या व भाविकांच्या उपस्थितीत विधीवत पूजा व महाआरती करण्यात आली.

त्यानंतर या सेवेकर्‍यांनी गाभार्‍यात सप्तशिवलिंगावर “सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडार उधळला. देवस्थानांच्या तांबे.भगत सेवेकरी मंडळीनी आणलेल्या पुरणपोळी.साजूक तूप.दूध.व खसखशीची खीर. सार.भात कुरडई व पापडी या पंचपक्वानांचा आणि वांग्याचे भरित,रोडग्याचा नैवेद्य सप्तशिवलिंगाला अर्पण करण्यात आला त्यानंतर दर्शन घेण्यासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. पहाटे दर्शनासाठी महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती .भाविकांच्या गर्दीने मंदिरात व परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.

यावेळी धामणी.लोणी.खडकवाडी गावडेवाडी महाळुंगेपडवळ तळेगांव ढमढेरे अवसरी खुर्द संविदणे येथील मानकरी व सेवेकरी ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवस्थानातील पारंपारिक धार्मिक विधी पार पडल्यानंतर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली.शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने पुणे.मुंबई भोसरी.पिंपरी चिंचवड शहरातील व परिसरातील भाविक सकाळपासून दर्शनाला येत होते. मंदिर परिसरात भंडारा खोबरे व पेढे विक्रीची व फुलाची दुकाने दिसत होती खाद्यपदार्थाच्या व कटलरी विक्रेत्याची दुकाने थाटलेली दिसत होती.मंदिराच्या शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती मंदिराच्या आवारात भाविकांची पांचनामाची जागरणे सुरु होती वाघेमंडळी वीर मंडळी जागरणाचे घटापुढे खंडोबाचा पांचनामाचा गजर करताना दिसत होते.

पंचक्रोशीच्या गावांमधील भाविक सहकुटुंब देवघरातील टाकाचे देव ताम्हणात आणून खंडोबाचा भंडारा व खोबरे उधळून भक्तिभावाने सदानंदाचा येळकोट करुन तळीभंडार करत होती दुपारी बारा नंतर देवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या मंदिराच्या हाँलमध्ये सकाळी नऊ वाजता ह.भ.प.प्रणितीताई यादव आळंदीकर यांचे काल्याचे किर्तन झाले.या किर्तन सोहळ्याला लोणी खडकवाडी.जारकरवाडी.आळंदी येथील वारकरी मंडळीनी पखवाज वीणा व टाळमृदुंगाची साथ दिली. किर्तनाची व्यवस्था सुभाष तांबे.अविनाश बढेकर व सेवेकरी मंडळीनी केली. दुचाकी व चारचाकी वाहानाने येणार्‍याची संख्या मोठी दिसत होती.चंपाषष्ठीला पाच नामाची जागरणे पार पडल्यानंतर महिला भाविक आनंद व्यक्त करताना दिसत होते.

पूर्वापार भाविक भक्त कुलस्वामी खंडेरायाला त्यांच्या काही अडीअडचणी दूर करण्यासाठी नवस बोलले जायचे त्यानंतर ज्यांच्या अडीअडचणी दूर झाल्या त्या भाविक भक्तांनी नवसाची पूर्तता करण्यासाठी चंपाषष्ठीला पाच नामाची जागरणे घालण्याची परंपरा  सुरु झाली असल्याचे भगत.वाघे मंडळीकडून सांगण्यात आले त्यानंतर त्या विविध आडनावांच्या कुळांच्या वारसांनी ही परंपरा आजतागायत जतन करुन ठेवलेली आहे म्हणून धामणीचा खंडोबा हे जागृत देवस्थान मानले जाते  चंपाषष्ठीला पाचनामाची जागरणे करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केलेली होती.

वाघे व वीर मंडळीची प्रत्येक घटासमोर पाच नामाचा येळकोट करण्यासाठी धावपळ होत असताना दिसत होती.मंदिरात पाच नामाची जागरणे सुरु असताना खंजिरी.तुणतुणे. व टाळाचा तसेच कासवाजवळील इतिहासकालीन घंटेचा सुमधुर आवाज मंदिरात ऐकायला मिळत होता.दरवर्षीप्रमाणे चंपाषष्ठी उत्सव मंडळाच्या वतीने कवड्या गव्हाच्या भरड्याचा व सेंद्रीय गुळाचा.व गावठी तुपाचा वापर करुन तयार केलेल्या केशरमिश्रीत सुंगधी लापशीचे व वांग्याच्या रस्सा भाजीच्या महाप्रसादाचे आयोजन केलेले होते.दुपारी एक वाजेपर्यत चार हजाराहून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला असल्याचे सांगण्यात आले भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था कुलस्वामी हाँल व मंदिरासमोरील फरशीच्या ओट्यावर करण्यात आलेली होती.महाप्रसादाची व वाढपाची उत्कृष्ठ व्यवस्था मच्छिंद्रनाथ वाघ.किसनराव रोडे.आण्णा पाटील जाधव.डाँ पाटीलबुवा जाधव.नामदेवराव जाधव.सुभाषराव काचोळे.सुभाषराव सोनवणे.प्रकाशनाना विष्णू जाधव.प्रकाशराव वरे.पंढरीनाथ खुडे.यांनी व ग्रामस्थांनी पाहिली

                                  निस्सीम सेवाभक्ती करणार्‍या तांबेबाबा भक्ताच्या प्रेमाखातर कुनाडीच्या डोंगरावरुन माघ शुध्द पौर्णिमेला पहाटेच्या सुमारास आता जे मंदिर उभे आहे त्या ठिकाणच्या काळ्या पाषाणाच्या कपारीतील निवडुंगाच्या बेटात खंडोबा वाघाच्या रूपात बसून दृष्ट्रान्त देऊन लुप्त झाल्यानंतर त्याठिकाणी सप्तशिवलिंगे आढळली ती सप्तशिवलिंग म्हणजे खंडोबाचा परिवार समजला जातो त्यामध्ये प्रामुख्याने म्हाळसाई बाणाई हेगडी प्रधानघोडा.कुत्रा.काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी हे असल्याचे मानले जाते त्यामुळे चंपाषष्ठीला.माघ पोंर्णिमा व चैत्र पौंणिमेला भाविक श्रध्देने आवर्जुन येतात असे सेवेकरी मंडळीनी सांगितले चंपाषष्ठी श्री म्हाळसाकांत खंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव.श्री मल्हारी मार्तंडाचे षड:रात्रोत्सोवाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासूर दैत्यांचा संहार केला.

व भूतलावरील अरिष्ट टाळले. या विजयोत्सोवामध्ये देवगणांनी मार्तंडभैरवावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याच्या फुलांची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशिर्ष शुध्द षष्ठीला “चंपाषष्ठी ” असे नाव मिळाले. खंडोबाच्या कुलधर्माचे वेळी भाविकाच्या घरातील देवघरात बसविलेल्या घटाला पुरणपोळीच्या नैवैद्याबरोबर ठोंबरा (जोंधळे शिजवून त्यामध्ये दही व मीठ घालून करण्यात येतो)कणकेचा रोडगा.वांग्याचे भरीत.पातीचा कांदा.व लसून याचाही नैवेद्य खंडोबाच्या घटाला दाखवण्यात येतो.त्यानंतर तळीभंडार विधी करण्यात येतो एका ताम्हणात विड्यांची पाच पाने. व त्यावर पाच नाणी व पाच सुपार्‍या ठेवतात त्याचप्रमाणे खोबर्‍याच्या वाट्या व भंडार ठेवून मग घरातील पाच.सात.अशा संख्येमध्ये घरातील मंडळी ताम्हण वर उचलून”सदानंदाचा येळकोट”भैरवनाथाचे चांगभले”व अंबाबाईचा उदेउदे” असा पुकारा करीत ते ताम्हण तीनवेळा उचलून झाल्यानंतर खाली ठेवतात व ताम्हणातील भंडार सर्वाना लावण्यात येतो व तो देवाचा भंडार घरात व घराच्या परिसरात श्रध्देने उधळण्यात येतो.सर्वाना पानसुपारी.दक्षिणा.खोबरे देऊन त्यानंतर दिवटीबुधली घेऊन खंडोबाची आरती करतात यालाच “तळीभरणे”असे म्हणतात असे यावेळी खंडोबाचे सेवेकरी भगत.वाघे मंडळीनी यावेळी सांगितले

जिर्णोध्दाराचा रौप्यमहोत्सव

धामणी (तालुका आंबेगांव) येथील पुरातन खंडोबा मंदिराचा जिर्णोध्दार शुभारंभ देवदिपावली (सन १९९९)ला ह.भ,प. प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते झालेला आहे.नुकतेच अंमळनेरकर पायी दिंडी आळंदीहून अंमळनेरकडे जाताना धामणीच्या खंडोबा मंदिरात देवदिपावलीला (२डिंसेबर२४)आलेली असताना “जयविजय” शिल्पाचे अनावरण कार्यक्रमात अमळनेरकर महाराजांनी खंडोबा देवस्थान मंदिराच्या जिर्णोध्दार संकल्पाला २५ वर्षे पूर्ण झाली त्याप्रित्यर्थ म्हाळसाकांत खंडोबा सर्वांगसुंदर मूर्तीजवळ चांदीचे खडग (तलवार) बसवण्याची व मंदिर परिसरात “भक्ति शक्तीचे” प्रतिक म्हणून जगतगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे भेटीचे एकत्रित संगमरवरी शिल्प बसवण्याची सूचना ग्रामस्थांना केलेली होती चंपाषष्ठी उत्सव सोहळ्यासाठी आलेल्या दोन भाविकांनी अनुक्रमे रुपये एक लाख व रुपये अडीच लाख किंमतीचे खंडोबा मूर्तीजवळ ठेवण्यासाठी चांदीचे खडग(तलवार) व भक्तीशक्ती संगमरवरी शिल्प देण्याचे व येणार्‍या माघ पोर्णिमेच्या यात्रेपूर्वी (दिं.१२ फेब्रुवारी २४)शिल्पाची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे मान्य केले असल्याचे ग्रामस्थांनी व सेवेकर्‍यांनी सांगितले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सलग चौथा बिबट्या जेरबंद

Published

on

Share

वळती प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात वनविभागाने मोठी कारवाई करत महिनाभरात सलग चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पवार मळा परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील प्रसिद्ध थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेकडील पवार मळा परिसरात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एक मादी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एक बछडा पिंजऱ्यात अडकला. पुढे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री आणखी एक मादी जेरबंद झाली. तर २ मार्च रोजी अंदाजे १५ महिन्यांचा नर बछडा देखील पिंजऱ्यात सापडला. या सर्व घटनांची माहिती नागापूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला दिली होती.


मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी फुलमाळी व वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी संबंधित बिबट्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून नागापूर परिसरात जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सलग चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading

गावागावातुन

दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.

Published

on

Share

पारनेर दि.१० प्रतिनिधी

जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.

अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.

तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.

आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada