Connect with us

मनोरंजन

भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे आज निधन ,दिल्ली येथील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Published

on

Share

दिल्ली प्रतिनिधी
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज दिल्ली येथे एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला ते 92 वर्षाचे होते. एक अर्थतज्ञ म्हणून डॉ मनमोहन सिंग यांची जागतिक स्तरावर ख्याती होती भारताचे पंतप्रधान म्हणून काम करताना त्यांनी देशासमोर असणारी अनेक संकटे पेलवत भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले

काँग्रेस पक्षातील मितभाषी नेते म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची ओळख होती . भारताचे माजी गव्हर्नर, नियोजन आयोगाचे अध्यक्ष, पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.भारतीय राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेस पक्ष उभा करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचा चेहरा म्हणून स्वतःला सिद्ध केले.

सयमी नेता , अर्थतज्ञ, भारताचा काँग्रेसचा चेहरा व भारताचे पंतप्रधान म्हणून डॉ मनमोहन सिंग यांचे नाव नेहमीच स्मरणात राहील .

एम्स रुग्णालयात कॉग्रेसचे नेते दाखल

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर रुग्णालयात राजकीय नेत्यांची धाव घेतली काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, कॉग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी यांनी एम्स रुग्णालयात धाव घेतली असून ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणार आहेत.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मनोरंजन

२०० प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकरीचा लाभ, खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नांना यश

Published

on

Share

नगर : प्रतिनिधी

राहुरी कृषि विद्यापीठासाठी जमिनी अधिगृहीत करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचा मार्ग शासन निर्णयामुळे मोकळा झाला असून या निर्णयामुळे राहुरी व परिसरातील २०० तरूणांना नोकरीचा लाभ मिळणार आहे. याप्रकरणी खा. नीलेश लंके हे गेल्या दोन वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते.


या प्रकल्पग्रस्तांनी दाखल्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी शाहूराव मोरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जाचक अटी लादून प्रकल्पग्रस्तांचे दाखल फेटाळून लावले होते. दोन वर्षांपूर्वी राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर प्रभाकर पवार, विकास भिंगारदे, भूषण शेंडगे, जगदीश अडसुरे,कुणाल कर्डक, आरबाज शेख, रवींद्र गिरगुणे आदींनी तत्कालीन आमदार नीलेश लंके यांच्याकडे या प्रश्नाचे गाऱ्हाणे मांडले.

लंके यांनी याप्रश्नी तात्काळ तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रश्नावर तोडगा काढण्याचे साकडे घातले होते. खा. लंके यांच्या पाठपुराव्यादरम्यान या प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र शासन आदेश काढावा लागेल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते.

राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर खा. नीलेश लंके यांनी नव्या सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्याशी चर्चा करून या प्रश्नात तोडगा काढण्याची मागणी केली होती. मंत्री जाधव पाटील यांना तसे निवेदनही खा. लंके यांनी सादर केले होते.

या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी शासन निर्णय पारीत केला असून त्यामुळे राहुरी व परिसरातील सुमारे दोनशे प्रकल्पग्रस्तांना आता नोकरीची संधी मिळणार आहे.
या प्रकल्पग्रस्तांना मिळाले दाखले !

खा. नीलेश लंके यांच्या प्रयत्नानंतर शासन निर्णय पारीत झाल्यानंतर दिपक भिंगारदे, विकास भिंगारदे, असिफ शेख, भुषण शेंडगे, शुभम गायकवाड, सोमनाथ मगर, कुणाल कर्डक, नितीन ताकटे, ॠषीकेश देशमुख, विशाल पवार, शैलेश धोंडे, खेडेकर, श्रीकांत पवार, दादासाहेब भिंगारदे, बाळू भिंगारदे, दर्शन गाढवे, प्रविण देठे, दिनेश शेंडगे, प्रविण गिरगुणे, अमोल गिरगुणे.

Continue Reading

गावागावातुन

पारनेर तालुक्यात विक्रमी ४ हजार १४७ घरकुले मंजुर !खासदार नीलेश लंके यांची माहिती

Published

on

Share

पारनेर : प्रतिनिधी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यात विक्रमी ४ हजार १४७ घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा क्र. ३ मध्ये ७९९ व टप्पा क्र.४ मध्ये ३ हजार ५२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून ३०० घरकुले मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.

आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या गरजू नागरीकांचे घराचे स्वप्न घरकुले मंजुर झाल्याने होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या कुटूंबाला घर मिळवून देणे, दारित्रय रेषेखालील कुटूंबांना स्थिर आणि सुरक्षित घरांची सुविधा पुरविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे खा. नीलेश लंके यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यात घरकुलांची मोठया प्रमाणावर मागणी होती. यापूर्वी काही घरकुलांना मंजुरी मिळाली. यावर्षी मोठया प्रमाणावर घरकुलांना मंजुरी मिळाल्याने हजारो कुटूंबांच्या घरकुलाचे स्वप्न आता दृष्टीपथात आले असून त्यांचे जीवन साकार होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. त्यांच्या जीवनात स्थैर्य येणार आहे यात समाधान असल्याचे लंके यांनी सांगितले.

एकूण मंजुर घरकुलांपैकी ३०० घरकुले मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील, इतर काही अडचणी असतील तर आपल्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन खा. लंके यांनी केले आहे.

पारनेर तालुक्यातील सर्व सरपंच, लाभार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, गृहनिर्माण अभियंता, पंचायत समितीमधील सर्व संगणक चालक, विस्तार अधिकारी यांनी या घरकुलांच्या मंजुरीसाठी परीश्रम घेतले.

प्रथमच ४ हजारांवर घरकुले !

दुष्काळी पारनेर तालुक्यात घरकुलांची मागणी मोठी असणे साहाजिक असून आजवर मोठया प्रमाणावर घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली नव्हती. घरकुलांबाबत केंद्र सरकारने धोरण घेतल्यानंतर आपण प्रत्येक ग्रामपंचायतीशी संपर्क करून घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आपल्या संपर्क कार्यालयाकडूनही वारंवार घरकुलांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत विविध ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करण्यात येत होता. एकत्रीत प्रयत्नांतून तालुक्यात प्रथमच तब्बल ४ हजारांवर घरकुलांना मंजुरी मिळाली यात मोठे समाधान आहे. 

खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य

Continue Reading

देशविदेश

संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी धार्मिक कार्यक्रमात तरुणांचा सहभाग महत्त्वाचा – माजी मंत्री दिलीप वळसे पाटील

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी गावागावात मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम होत असून आपल्या निरगुडसर गावातही मोठ्या उत्साहात अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे.

या सप्ताहात ज्येष्ठांची संख्या भरपूर आहे काही प्रमाणात तरुण देखील आहेत. मात्र गावातील धार्मिक कार्यक्रमात तरुणाची सहभाग घेतल्यास कार्यक्रमाला अधिक शोभा येईल असे मत राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

श्री धर्मराज बीज यात्रा उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह समाप्तीचे दिवशी काल्याचे किर्तन संपन्न झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी वळसे पाटील पुढे बोलताना म्हणाले की निरगुडसर गावात गेले सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. शेवटच्या दिवशी ह भ प धनंजय महाराज चव्हाण यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.

त्यांनी त्यांच्या कीर्तनात श्रीकृष्ण यांच्या लीला सांगितल्या समाजाला विविध उपदेश दिले. मात्र कीर्तन ऐकण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी, युवकांनी याचा बोध घेऊन किर्तन ऐकून घरी जात असताना कीर्तनातील चांगल्या गोष्टीं आत्मसात करून त्याचे आचरण आपल्या आयुष्यात करणे गरजेचे आहे. आपल्या गावातील श्री महादेवाच्या मंदिराचे काम सुंदर झाले.

असुन पुढील काही दिवसात या मंदिर उत्सवाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. असेही वळसे पाटील म्हणाले,

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे ,शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, निरगुडसरचे सरपंच रवींद्र वळसे पाटील, उपसरपंच नितीन टाव्हरे, आनंदराव वळसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश टाव्हरे, प्रमोद वळसे, रामदास थोरात, भाऊसाहेब वळसे,सुनील टाव्हरे, उर्मिला वळसे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुवर्णा शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Continue Reading
Advertisement

Trending